शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना महामारीवर लिंबू, संत्री, मोसंब्याचा उतारा! दरही वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : संत्री, मोसंबी, लिंबूमध्ये असलेले ‘क’ जीवनसत्त्व रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यास मदत करते. या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : संत्री, मोसंबी, लिंबूमध्ये असलेले ‘क’ जीवनसत्त्व रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यास मदत करते. या फळांच्या सरबत सेवनामुळे अशक्तपणा दूर होतो. शरीरातील शक्ती वाढविण्यास फळे फायदेशीर तर ठरतातच, शिवाय त्वचा, केस, डोळे यासाठीही फायदेशीर ठरते. कोरोना रुग्णवाढीचा धसका नागरिकांनी घेतला असून रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी प्रत्येक व्यक्ती स्वपरीने प्रयत्न करीत आहे. त्यामुळे बाजारात सध्या मोसंबी, संत्री, लिंबूला सर्वाधिक मागणी होत आहे.

लिंबूवर्णिय फळांमधील अ‍ँटिबॅक्टेरियल व अ‍ॅटिऑक्सिडंट गुणधर्म रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करतात. शिवाय पोटासंबंधी समस्यांवर गुणकारी असून मोठ्या प्रमाणावर फायबर असल्याने या फळांचा वापर प्राचीन काळापासून सुरू आहे. ‘क’ जीवनसत्त्वामुळे अनेक रोगांचे निवारण होत असल्याने प्राधान्याने या प्रकारच्या फळांना मागणी वाढत आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचा धसका सामान्यांनी घेतला असल्यानेच फळांना मागणी होत आहे.

मुंबईतून आवक

रत्नागिरीत येणारी फळे ही बहुतांश वाशी मार्केट व कोल्हापूर येथून येत आहेत. संत्री, मोसंबी, लिंबू वाशी येथून येत असली तरी, कोल्हापुरातूनही लिंबाची आवक होत आहे. पुढच्या आठवड्यापासून रमजान मास सुरू होत असल्याने विक्रेत्यांनी मागणी वाढविली आहे.

थकवा दूर होण्यास मदत

संत्री, मोसंबी, लिंबू ही लिंबूवर्णिय फळे असून त्यामध्ये पॅक्टीन, ‘क’ जीवनसत्त्वाबरोबरच इतर पोषक तत्त्वे असल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलची मात्रा कमी करण्यासाठी मदत करतात. हृदयरोग होण्यापासून बचाव करत असल्याने यांचे सेवन फायदेशीर ठरत आहे. शिवाय वजन कमी करण्यासाठी मोसंबीचा फायदा होतो. थकवा घालवित असताना दिवसभर स्वत:ला ताजेतवाने ठेवण्यासाठी सकाळी उपाशीपोटी लिंबूपाणी सेवन करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे ताप आलेल्या रुग्णांना तरी मोसंबी ज्यूस आवर्जून दिला जातो. त्यामुळे या फळांचा विशेष खप होत आहे. कोरोना काळात तर सर्वाधिक मागणी होत आहे.

सर्दी, घसादुखी किंवा तत्सम् अ‍ॅलर्जी दूर करण्यासाठी ‘क’ जीवनसत्त्वावर भर दिला जातो. काहीवेळा ‘क’ जीवनसत्त्वाच्या गोळ्या रुग्णांना दिल्या जातात. मात्र गोळ्या खायला नको असणारे फळे खाऊन जीवनसत्त्वे मिळवितात.

- डॉ. निशिगंधा पोंक्षे

रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्याच्या नादात फळे खातानाही योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा योग्य मात्रा असलेली ‘क’ जीवनसत्त्वाची गोळीही फायदेशीर ठरते. आवडत असणारी फळे जरूर सेवन करावीत.

- डॉ. अनिरुध्द फडके