शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
2
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
3
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
4
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
5
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
6
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
7
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
8
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
9
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
10
'ठरलं तर मग'मध्ये पूर्णा आजींच्या भूमिकेत कोण दिसणार? सुचित्रा बांदेकर म्हणाल्या, "आम्हाला..."
11
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
12
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
13
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
14
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
15
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
16
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
17
Mumbai Rains: मुंबईत अतिवृष्टीचा धोका; पालकमंत्री लोढांकडून आपत्ती विभागाला सज्ज राहण्याचे निर्देश
18
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
19
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
20
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा

पीक कर्ज परतफेडीसाठी जुलैअखेर मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : शासनाने शेतकऱ्यांना पीक कर्ज परतफेडीसाठी जुलैअखेर मुदतवाढ दिली आहे. शासनाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना परतफेडीसाठी अवधी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : शासनाने शेतकऱ्यांना पीक कर्ज परतफेडीसाठी जुलैअखेर मुदतवाढ दिली आहे. शासनाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना परतफेडीसाठी अवधी प्राप्त झाल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात आंबा उत्पादन ६५ हजार तर काजू उत्पादन ९० हजार हेक्टर क्षेत्रावर आहे. आंबा, काजू उत्पादन घेणारे बहुतांश शेतकरी पीक कर्ज घेतात. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या माध्यमातून पीक कर्जाचा पुरवठा केला जातो. मात्र, पीक कर्ज परतफेडीची मुदत ही जूनअखेर असते. या मुदतीत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना डाॅ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ मिळतो. प्रोत्साहनपर व्याज सवलतीमुळे विकास संस्था व बॅंकांची वसुली चांगली होते.

कोरोनामुळे एप्रिल व मे महिन्यात लाॅकडाऊन घोषित करण्यात आले होते. यावर्षी हवामानातील बदलामुळे आंबा पीक धोक्यात आले होते. त्यातच मे महिन्यात झालेल्या ताैक्ते वादळामुळे शेवटच्या टप्प्यातील आंबा पीक जमिनीवर आल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले. एकूणच आंबा पीक कमी त्यातच विक्री व्यवस्थेत निर्माण झालेल्या अडचणी, वादळामुळे पिकाचे झालेले नुकसान यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकरी पीक कर्जाची जून अखेरीस परतफेड करू शकले नव्हते. त्यामुळे बॅंकांच्या वसुलीवर परिणाम झाला आहे.

पीक कर्ज परतफेड करण्यासाठी जुलै २०२१ अखेर मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या वाढीव मुदतीत पीक कर्जाची परतफेड करणारे शेतकरी सरकारच्या डाॅ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ मिळण्यास पात्र असणार आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.