शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्ज परतफेडीसाठी जुलैअखेर मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : शासनाने शेतकऱ्यांना पीक कर्ज परतफेडीसाठी जुलैअखेर मुदतवाढ दिली आहे. शासनाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना परतफेडीसाठी अवधी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : शासनाने शेतकऱ्यांना पीक कर्ज परतफेडीसाठी जुलैअखेर मुदतवाढ दिली आहे. शासनाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना परतफेडीसाठी अवधी प्राप्त झाल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात आंबा उत्पादन ६५ हजार तर काजू उत्पादन ९० हजार हेक्टर क्षेत्रावर आहे. आंबा, काजू उत्पादन घेणारे बहुतांश शेतकरी पीक कर्ज घेतात. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या माध्यमातून पीक कर्जाचा पुरवठा केला जातो. मात्र, पीक कर्ज परतफेडीची मुदत ही जूनअखेर असते. या मुदतीत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना डाॅ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ मिळतो. प्रोत्साहनपर व्याज सवलतीमुळे विकास संस्था व बॅंकांची वसुली चांगली होते.

कोरोनामुळे एप्रिल व मे महिन्यात लाॅकडाऊन घोषित करण्यात आले होते. यावर्षी हवामानातील बदलामुळे आंबा पीक धोक्यात आले होते. त्यातच मे महिन्यात झालेल्या ताैक्ते वादळामुळे शेवटच्या टप्प्यातील आंबा पीक जमिनीवर आल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले. एकूणच आंबा पीक कमी त्यातच विक्री व्यवस्थेत निर्माण झालेल्या अडचणी, वादळामुळे पिकाचे झालेले नुकसान यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकरी पीक कर्जाची जून अखेरीस परतफेड करू शकले नव्हते. त्यामुळे बॅंकांच्या वसुलीवर परिणाम झाला आहे.

पीक कर्ज परतफेड करण्यासाठी जुलै २०२१ अखेर मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या वाढीव मुदतीत पीक कर्जाची परतफेड करणारे शेतकरी सरकारच्या डाॅ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ मिळण्यास पात्र असणार आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.