शहरं
Join us  
Trending Stories
1
आणखी एका मंत्र्याचा आज राजीनामा?; वादामुळे महायुती सरकार बॅकफूटवर, अजित पवारांची कोंडी
2
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
3
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
4
Stock Market Today: ३२७ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; Zomato मध्ये बंपर तेजी, बँक आणि रियल्टीमध्ये तेजी
5
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
6
LIC चा ‘या’ स्कीममध्ये फक्त ४ वर्ष भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरंटी, आणखीही बेनिफिट्स मिळणार
7
चातुर्मासातील पहिली शिवरात्री: शिवपूजन कसे करावे? व्रताचरणाची सोपी पद्धत; मिळेल सुख-लाभ!
8
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
9
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
10
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
11
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
12
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
13
राज्य सरकार, तपासयंत्रणांना मोठा धक्का, गुन्हे सिद्ध करण्यात सरकारी वकील ठरले अपयशी : उच्च न्यायालय
14
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
15
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
16
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
17
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
18
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
19
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
20
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!

रत्नागिरी जिल्ह्यातील १९ आरोग्यसेविकांना मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:38 IST

रत्नागिरी : कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त होत असतानाच जिल्ह्यातील १९ कंत्राटी आरोग्यसेविकांची पदे रद्द करण्यात आली ...

रत्नागिरी : कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त होत असतानाच जिल्ह्यातील १९ कंत्राटी आरोग्यसेविकांची पदे रद्द करण्यात आली होती. त्याचे पडसाद सर्वत्र उमटल्याने अखेर राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या अतिरिक्त संचालकांकडून या कंत्राटी आरोग्यसेविकांना सेवेतच ठेवण्यात आल्याचे जिल्हा परिषद आरोग्य विभागाला आदेश देण्यात आले आहेत.

एनआरएचएमअंतर्गत जिल्ह्यात १९ कंत्राटी आरोग्यसेविकांची नियुक्ती जिल्हा परिषदेकडून प्राथमिक आराेग्य केंद्रांमध्ये देण्यात आली होती. गेली १० ते १२ वर्षे या आरोग्यसेविका प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत आहेत. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये बाधितांची काळजी घेतली होती. तरीही शासनाकडून त्यांना अचानकपणे नोकरीवरुन कमी करण्यात येत असल्याचे आदेश देण्यात आले होते.

एनआरएचएम अंतर्गत काम करणाऱ्या या कंत्राटी आरोग्य सेविकांचे मानधनाची रक्कम केंद्र शासनाकडून आलेली नसल्याने अतिरक्त अभियान संचालकांकडून सर्व जिल्हा परिषदांना त्यांना दि. १ सप्टेंबरपासून कमी करण्याचे आदेश देण्यात आले होते. तरीही जिल्हा परिषदेकडून त्यांना काम थांबवण्याच्या कोणत्याही सूचना देण्यात आल्या नव्हत्या. मात्र, कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेकडून जाहीर करण्यात आलेले असतानाही शासनाकडून नोकरीतून कमी करण्याचे आदेश आल्याने त्या आरोग्यसेविकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती.

दरम्यान, आराेग्यसेविकांना अचानक कमी करण्याच्या आलेल्या आदेशामुळे जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांकडून तसेच जनतेमधूनही संताप व्यक्त करण्यात येत होता. सत्ताधाऱ्यांसह विरोधकांकडूनही नाराजीचा सूर उमटला होता. अखेर एनआरएचएम विभागाला आपले आदेश मागे घ्यावे लागले. त्यामुळे गणेशोत्सवाच्या कालावधीत त्यांना मुदतवाढ मिळाल्याने दिलासा मिळाला आहे.