शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
2
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
3
"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं
4
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
5
भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी
6
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
7
बॉयफ्रेंडला धोका, उद्योगपतीशी लग्न... आता पतीपासून वेगळी राहते 'ही' बिग बॉस विनर?
8
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
9
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
10
पहिल्यांदाच शेअर वाटायची तयारी, दोन दिवसांत 40% हून अधिक वधारला हा शेअर, केलं मालामाल!
11
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी तरूणीला मारणारा गोकुळ झा, भाऊ रणजीत झा यांना २ दिवसांची पोलिस कोठडी
12
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
13
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
14
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
15
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
16
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
17
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
18
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
19
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
20
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर

रत्नागिरी जिल्ह्यातील १९ आरोग्यसेविकांना मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:31 IST

रत्नागिरी : कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त होत असतानाच जिल्ह्यातील १९ कंत्राटी आरोग्यसेविकांची पदे रद्द करण्यात आली ...

रत्नागिरी : कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त होत असतानाच जिल्ह्यातील १९ कंत्राटी आरोग्यसेविकांची पदे रद्द करण्यात आली होती. त्याचे पडसाद सर्वत्र उमटल्याने अखेर राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या अतिरिक्त संचालकांकडून या कंत्राटी आरोग्यसेविकांना सेवेतच ठेवण्यात आल्याचे जिल्हा परिषद आरोग्य विभागाला आदेश देण्यात आले आहेत.

एनआरएचएमअंतर्गत जिल्ह्यात १९ कंत्राटी आरोग्यसेविकांची नियुक्ती जिल्हा परिषदेकडून प्राथमिक आराेग्य केंद्रांमध्ये देण्यात आली होती. गेली १० ते १२ वर्षे या आरोग्यसेविका प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत आहेत. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये बाधितांची काळजी घेतली होती. तरीही शासनाकडून त्यांना अचानकपणे नोकरीवरुन कमी करण्यात येत असल्याचे आदेश देण्यात आले होते.

एनआरएचएम अंतर्गत काम करणाऱ्या या कंत्राटी आरोग्य सेविकांचे मानधनाची रक्कम केंद्र शासनाकडून आलेली नसल्याने अतिरक्त अभियान संचालकांकडून सर्व जिल्हा परिषदांना त्यांना दि. १ सप्टेंबरपासून कमी करण्याचे आदेश देण्यात आले होते. तरीही जिल्हा परिषदेकडून त्यांना काम थांबवण्याच्या कोणत्याही सूचना देण्यात आल्या नव्हत्या. मात्र, कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेकडून जाहीर करण्यात आलेले असतानाही शासनाकडून नोकरीतून कमी करण्याचे आदेश आल्याने त्या आरोग्यसेविकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती.

दरम्यान, आराेग्यसेविकांना अचानक कमी करण्याच्या आलेल्या आदेशामुळे जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांकडून तसेच जनतेमधूनही संताप व्यक्त करण्यात येत होता. सत्ताधाऱ्यांसह विरोधकांकडूनही नाराजीचा सूर उमटला होता. अखेर एनआरएचएम विभागाला आपले आदेश मागे घ्यावे लागले. त्यामुळे गणेशोत्सवाच्या कालावधीत त्यांना मुदतवाढ मिळाल्याने दिलासा मिळाला आहे.