शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

पावसाची उघडीप; पाच दिवसानंतर घडले सूर्यदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:25 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात पाच दिवसानंतर पावसाने उघडीप दिली. त्यामुळे शुक्रवारी दुपारी नागरिकांना सूर्यदर्शन घडले. दरम्यान, गेल्या २४ तासात ...

रत्नागिरी : जिल्ह्यात पाच दिवसानंतर पावसाने उघडीप दिली. त्यामुळे शुक्रवारी दुपारी नागरिकांना सूर्यदर्शन घडले. दरम्यान, गेल्या २४ तासात एकूण ९६६.२० (सरासरी १०७.३६) मिलिमीटर पावसाची नोंद जिल्हा नियंत्रण कक्षाकडे झाली आहे. सर्वाधिक १६९.१० मिलिमीटर पाऊस रत्नागिरी तालुक्यात झाला असून, त्याखालोखाल गुहागर ११८, लांजा ११४.८०, संगमेश्वर १११, मंडणगड १०० मिलिमीटर पाऊस झाला आहे.

जिल्हा नियंत्रण कक्षाकडून सकाळी १० वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार, दापोली तालुक्यातील भोपण येथील मेहमुद्दीन इब्राहीम अमुळे यांच्या घरात पाणी शिरल्याने अंशत: ३ हजार रुपये नुकसान झाले. पांगरी तर्फ हवेली येथील मधुकर जाधव यांच्या घराजवळ दरड कोसळून अंशत: नुकसान झाले. रघुनाथ जाधव यांच्या घराचे पावसामुळे अंशत: नुकसान झाले.

चिपळूण तालुक्यात वीरवाडी येथील सार्वजनिक पाण्याची विहीर पावसामुळे कोसळली आहे. दहिवली येथील खासगी शाळा दहिवली खुर्द ३ ची पडीक इमारत कोसळून २४ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले आहे.

गुहागर तालुक्यातील मळवळी येथील दत्ताराम रामचंद्र डाफळे यांच्या घराचे अंशत: ५ हजार रुपये नुकसान झाले. वामन गोविंद पालशेतकर यांच्या घराचे अंशत: १ लाख २५ हजार रुपये नुकसान झाले. सुरेखा सुरेश तांदळे यांच्या घराचे अंशत: ३ हजार रुपये नुकसान झाले.

संगमेश्वर तालुक्यातील आंबवली येथील वसंत शिवराम चव्हाण यांच्या घराजवळ रस्त्याची मोरी खचल्याने घरात पाणी शिरले आहे. हातीव येथील हरी तातू शिगवण यांच्या घराचे अंशत: ४० हजार रुपये नुकसान झाले. डावखोल येथील सुरेश आत्माराम शिंदे यांच्या घराचे अंशत: २० हजार नुकसान झाले. कांटे येथील गजानन शिवराम बाणे यांच्या घराचे अंशत: २ हजार रुपये नुकसान झाले.

रत्नागिरी तालुक्यात गावखडी येथील अमेय जनार्दन कातळकर यांच्या शेतात पावसामुळे विजेचे खांब पडले आहेत.