शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
3
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
4
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
5
देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
6
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
7
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
8
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
9
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
10
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
11
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
12
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
13
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
14
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
15
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
16
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
17
पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे १८ मंडल, प्रांत अध्यक्ष नाराज; शिंदेसेनेसोबत युती नको, स्वबळावर लढू द्या
18
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
19
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
20
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

लबाड लांडग्यांच्या टोळ्यांना हद्दपार करा

By admin | Updated: January 1, 2017 23:11 IST

भास्कर जाधवांचा टोला : योग्य नियोजन नसल्यानेच रत्नागिरी जिल्हा सर्व क्षेत्रात मागे

सावर्डे : गेली २० वर्षे सत्तेत असणाऱ्या शिवसेनेने जिल्हा परिषदेची अवस्था एखाद्या कोंडवाड्यासारखी केली आहे. एकही पाणी योजना गेल्या दोन वर्षात झालेली नाही. पालकमंत्री नुसतेच रस्त्याचे नारळ फोडत सुटले आहेत. जिल्ह््याचा नियोजित आराखडा नसल्याने शिक्षण, आरोग्य याबाबत जिल्हा पिछाडीवर आहे. लोकहितकारक योजनांचा बट्ट्याबोळ झालाय. यासाठी अशा लबाड लांडग्यांच्या टोळ्यांना हद्दपार करुन एकदिलाने एकजुटीने काम करुन जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीची सत्ता आणूया, असे प्रतिपादन जिल्हाप्रभारी भास्कर जाधव यांनी केले.आज (रविवारी) राष्ट्रवादी पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत ते बोलत होते.यावेळी जिल्हा पक्षनिरीक्षक संदेश कोंडविलकर, जिल्हाध्यक्ष शेखर निकम, आमदार संजय कदम, माजी राज्यमंत्री रवींद्र माने, माजी आमदार मुसा मोडक, जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजी चोरगे, बाबाजी जाधव, युवकचे प्रदेश उपाध्यक्ष अजित यशवंतराव, कुमार शेट्ये, बशीर मुर्तुझा, महिलाध्यक्ष चित्रा चव्हाण, जिल्हा परिषदेचे गटनेते अजय बिरवटकर, युवक जिल्हाध्यक्ष राजू आंब्रे, सुभाष मोहिते, सिकंदर जसनाईक आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. भास्कर जाधव पुढे म्हणाले की, पक्षाने जिल्ह््याची जबाबदारी दिल्यानंतर जून महिन्यात मी राजापूरपासून मंडणगडपर्यंत मेळावे घेऊन विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाला आलेली मरगळ झटकल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली होती. त्यामुळे आपल्यावर अनेक खोटेनाटे आरोप करण्यात आले, असे ते म्हणाले.काही विरोधी पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी माझ्या संपर्कातदेखील होते. परंतु, मध्यंतरी नगरपंचायत निवडणुकीत माशी शिंकली आणि पक्षाने अन्य व्यक्तीच्या हातात सुत्रे दिली. मात्र, तरीही मी पक्षाचे काम करत राहिलो. १७ वर्षे ज्या पक्षात गटातटाला सामोरे जावे लागले. जिथे पक्षाचे काही नव्हते तेथेही आपण शाखा निर्माण केली. सत्ता नसताना जो पक्षासाठी काम करतो तोच कार्यकर्ता प्रामाणिक असतो आणि अशा कार्यकर्त्यांना ताकद देणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.आघाडीबाबत बोलताना जाधव म्हणाले की, जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांना सन्मानपूर्वक आघाडी होत असेल तरंच बोलणी करा, असे सांगितले आहे. तसेच तालुकाध्यक्षांना विश्वासात घेऊन यावर योग्य निर्णय घेतला जाईल. (वार्ताहर)