शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
6
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
7
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
8
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
9
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
10
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
11
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
12
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
13
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
14
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
15
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
16
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
17
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
18
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
19
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
20
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू

लबाड लांडग्यांच्या टोळ्यांना हद्दपार करा

By admin | Updated: January 1, 2017 23:11 IST

भास्कर जाधवांचा टोला : योग्य नियोजन नसल्यानेच रत्नागिरी जिल्हा सर्व क्षेत्रात मागे

सावर्डे : गेली २० वर्षे सत्तेत असणाऱ्या शिवसेनेने जिल्हा परिषदेची अवस्था एखाद्या कोंडवाड्यासारखी केली आहे. एकही पाणी योजना गेल्या दोन वर्षात झालेली नाही. पालकमंत्री नुसतेच रस्त्याचे नारळ फोडत सुटले आहेत. जिल्ह््याचा नियोजित आराखडा नसल्याने शिक्षण, आरोग्य याबाबत जिल्हा पिछाडीवर आहे. लोकहितकारक योजनांचा बट्ट्याबोळ झालाय. यासाठी अशा लबाड लांडग्यांच्या टोळ्यांना हद्दपार करुन एकदिलाने एकजुटीने काम करुन जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीची सत्ता आणूया, असे प्रतिपादन जिल्हाप्रभारी भास्कर जाधव यांनी केले.आज (रविवारी) राष्ट्रवादी पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत ते बोलत होते.यावेळी जिल्हा पक्षनिरीक्षक संदेश कोंडविलकर, जिल्हाध्यक्ष शेखर निकम, आमदार संजय कदम, माजी राज्यमंत्री रवींद्र माने, माजी आमदार मुसा मोडक, जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजी चोरगे, बाबाजी जाधव, युवकचे प्रदेश उपाध्यक्ष अजित यशवंतराव, कुमार शेट्ये, बशीर मुर्तुझा, महिलाध्यक्ष चित्रा चव्हाण, जिल्हा परिषदेचे गटनेते अजय बिरवटकर, युवक जिल्हाध्यक्ष राजू आंब्रे, सुभाष मोहिते, सिकंदर जसनाईक आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. भास्कर जाधव पुढे म्हणाले की, पक्षाने जिल्ह््याची जबाबदारी दिल्यानंतर जून महिन्यात मी राजापूरपासून मंडणगडपर्यंत मेळावे घेऊन विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाला आलेली मरगळ झटकल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली होती. त्यामुळे आपल्यावर अनेक खोटेनाटे आरोप करण्यात आले, असे ते म्हणाले.काही विरोधी पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी माझ्या संपर्कातदेखील होते. परंतु, मध्यंतरी नगरपंचायत निवडणुकीत माशी शिंकली आणि पक्षाने अन्य व्यक्तीच्या हातात सुत्रे दिली. मात्र, तरीही मी पक्षाचे काम करत राहिलो. १७ वर्षे ज्या पक्षात गटातटाला सामोरे जावे लागले. जिथे पक्षाचे काही नव्हते तेथेही आपण शाखा निर्माण केली. सत्ता नसताना जो पक्षासाठी काम करतो तोच कार्यकर्ता प्रामाणिक असतो आणि अशा कार्यकर्त्यांना ताकद देणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.आघाडीबाबत बोलताना जाधव म्हणाले की, जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांना सन्मानपूर्वक आघाडी होत असेल तरंच बोलणी करा, असे सांगितले आहे. तसेच तालुकाध्यक्षांना विश्वासात घेऊन यावर योग्य निर्णय घेतला जाईल. (वार्ताहर)