शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

हापूसची निर्यात २0 टक्केच

By admin | Updated: May 27, 2016 23:21 IST

फक्त १०० टन आंबाच परदेशी बाजारपेठेपर्यंत पोहोचला आहे. कमी पर्जन्यवृष्टीमुळे पुनर्मोहोर प्रक्रियेमुळे उत्पादन घटले.

रत्नागिरी : हवामानातील बदलामुळे यावर्षी आंबा उत्पादन घटले आणि त्याचा परदेशी निर्यातीला मोठा फटका बसला आहे. राज्यभरातून एक हजार टन आंबा उत्पादनाचे उद्दिष्ट असताना केवळ ६०० टन आंबा महाराष्ट्रातून पाठवण्यात आला. कोकणातून५०० टन हापूस निर्यातीचे उद्दिष्ट असताना फक्त १०० टन आंबाच परदेशी बाजारपेठेपर्यंत पोहोचला आहे.कमी पर्जन्यवृष्टीमुळे पुनर्मोहोर प्रक्रियेमुळे उत्पादन घटले. गतवर्षी अवकाळी पावसामुळे आंबा पिकावर परिणाम झाला होता. यावर्षी पीक चांगले होईल अशी अपेक्षा असताना आंबा बागायतदारांची निराशा झाली. खत व्यवस्थापनापासून आंबा बाजारात येईपर्यंत हवामानात सातत्याने बदल होत राहिले. पिकासाठी केलेला खर्च, त्या तुलनेत उत्पादनातील घट शिवाय कोसळलेले बाजारभाव यामुळे बागायतदार शेतकऱ्यांना पुन्हा आर्थिक झळ सोसावी लागणार आहे. गतवर्षीपासून शासनाकडून मँगोनेट प्रक्रिया राबविण्यात आली. युरोपिय देशांनी गतवर्षी आंबा निर्यातीची दारे उघडली असली तरी त्या निर्यातीसाठी गरजेची असलेली उष्णजल प्रक्रिया मात्र उशिरापर्यंत लागू झाली नाही. त्यासाठी बाष्पजल प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, ती प्रक्रिया केवळ वाशी (मुंबई) येथेच होते. आधीच आंबा कमी आणि त्यात ही प्रक्रिया करण्यासाठी वाशीला जावे लागणार असल्याने बागायतदारांनी त्याकडे बऱ्याचअंशी पाठ फिरवली. (प्रतिनिधी)अवकाळीने नुकसानमँगोनेटद्वारे आंबा निर्यातीसाठी ३१ निर्यातदार तयार होते. या अभियानांतर्गत एक हजार टन आंबा निर्यातीचे उद्दिष्ट होते. मात्र, ६०० टन आंबाच (सर्व प्रकारचा मिळून) निर्यात करण्यात आला आहे. कोकणातील हापूसला चांगली मागणी होती.