शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

हापूसची निर्यात २0 टक्केच

By admin | Updated: May 27, 2016 23:21 IST

फक्त १०० टन आंबाच परदेशी बाजारपेठेपर्यंत पोहोचला आहे. कमी पर्जन्यवृष्टीमुळे पुनर्मोहोर प्रक्रियेमुळे उत्पादन घटले.

रत्नागिरी : हवामानातील बदलामुळे यावर्षी आंबा उत्पादन घटले आणि त्याचा परदेशी निर्यातीला मोठा फटका बसला आहे. राज्यभरातून एक हजार टन आंबा उत्पादनाचे उद्दिष्ट असताना केवळ ६०० टन आंबा महाराष्ट्रातून पाठवण्यात आला. कोकणातून५०० टन हापूस निर्यातीचे उद्दिष्ट असताना फक्त १०० टन आंबाच परदेशी बाजारपेठेपर्यंत पोहोचला आहे.कमी पर्जन्यवृष्टीमुळे पुनर्मोहोर प्रक्रियेमुळे उत्पादन घटले. गतवर्षी अवकाळी पावसामुळे आंबा पिकावर परिणाम झाला होता. यावर्षी पीक चांगले होईल अशी अपेक्षा असताना आंबा बागायतदारांची निराशा झाली. खत व्यवस्थापनापासून आंबा बाजारात येईपर्यंत हवामानात सातत्याने बदल होत राहिले. पिकासाठी केलेला खर्च, त्या तुलनेत उत्पादनातील घट शिवाय कोसळलेले बाजारभाव यामुळे बागायतदार शेतकऱ्यांना पुन्हा आर्थिक झळ सोसावी लागणार आहे. गतवर्षीपासून शासनाकडून मँगोनेट प्रक्रिया राबविण्यात आली. युरोपिय देशांनी गतवर्षी आंबा निर्यातीची दारे उघडली असली तरी त्या निर्यातीसाठी गरजेची असलेली उष्णजल प्रक्रिया मात्र उशिरापर्यंत लागू झाली नाही. त्यासाठी बाष्पजल प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, ती प्रक्रिया केवळ वाशी (मुंबई) येथेच होते. आधीच आंबा कमी आणि त्यात ही प्रक्रिया करण्यासाठी वाशीला जावे लागणार असल्याने बागायतदारांनी त्याकडे बऱ्याचअंशी पाठ फिरवली. (प्रतिनिधी)अवकाळीने नुकसानमँगोनेटद्वारे आंबा निर्यातीसाठी ३१ निर्यातदार तयार होते. या अभियानांतर्गत एक हजार टन आंबा निर्यातीचे उद्दिष्ट होते. मात्र, ६०० टन आंबाच (सर्व प्रकारचा मिळून) निर्यात करण्यात आला आहे. कोकणातील हापूसला चांगली मागणी होती.