शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

वास्तवता स्पष्ट करणारे ‘काळोख देत हुंकार’

By admin | Updated: November 18, 2014 23:28 IST

राज्य नाट्य स्पर्धा : पोट पिळवटणारी गरिबी रंगमंचावर...

मेहरुन नाकाडे - रत्नागिरी --रोजगार मिळत नाही, त्यामुळे गरिबीने पोळलेल्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी भुकेने व्याकुळ झालेल्या मुलांना दोन घास खाऊ घालण्यासाठी स्वत:चे शील विकणारी महिला. रोजगार मिळावा, यासाठी पुलाला बळी देण्याकरिता स्वत:चे तान्हे मूल विकण्यासाठी तयार होणारे गरीब कुटुंब तसेच समाजातील मुकादमासारख्या लोकांच्या छळाने हैराण झालेल्या पीडित कुटुंबाचे किंबहुना समाजातील धगधगणारी वास्तवता ‘काळोख देत हुंकार’ या नाटकातून मांडण्याचा प्रयत्न महाकाली रंगविहार, नाणीजच्या कलाकारांनी केला. कलाकारांनी केलेले उत्कृष्ट सादरीकरण प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेणारे ठरले.रंगमंचाचा पुरेपूर वापर करून उभारलेल्या झोपड्या, झोपड्यातील गरिबीचे यथार्थ दर्शन दाखविण्यात येत होते. झोपड्यांच्या मागे पूल उभारण्याचे चित्रण सादर करण्यात आले. नेपथ्य, संगीत, प्रकाशयोजना, रंगभूषा, वेशभूषा आदी सर्व बाबतींत नाटक ठीकठाक होते. शिरमी व नारबा आणि भुत्या व तानी ही दारिद्र्यात खितपत पडलेली दोन कुटुंब. पुलाच्या कामावर जाणाऱ्या नारबा (दीपक कीर) आठवड्याला पगार झाल्यानंतर दारूवर पैसे उधळायचा. पत्नी (शिरमी) मात्र मुलांच्या शिक्षणाची, लग्नाची स्वप्ने पाहात नवऱ्याची वाट पाहते. दारू ढोसून आलेल्या नवऱ्याला चार गोष्टी समजावून स्वत:ला काम मिळवून देण्याची अपेक्षा व्यक्त करते. तानी (निर्मला टिकम) व भुत्या (प्रभाकर मयेकर) कुटुंबाला अपत्य नाही. पत्नीच्या आजारणासाठी पैसा हवा म्हणून कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करणारा भुत्या देवभोळा, तर तानी मात्र पुलाच्या बांधकामावर मजूरी करून पोट भरत असते. जुम्मन चाचा (नीलेश कोतवडेकर) हे पात्र मात्र दोन्ही कुटुंबातच नव्हे तर गावकऱ्यांच्या भल्यासाठी प्रार्थना करते. मुकादम (नीलेश कोतवडेकर) प्रत्येक मजुराच्या मजुरीतील पैसे कापून घेतो. गरिबांवर अन्याय करणारा, पुलासाठी बळी देण्याची भाषा करणारा, मजुरीची याचना करणाऱ्या शिरमीला गैरवर्तनासाठी भाग पडतो. राधी (भक्ती सुतार), नाम्या (स्वयंम् पोवार) ही छोटी बालके रंगमंचावर वावरताना दाखविली आहे. मुकादम शिरमीला रस्त्यावरच्या कुत्रीप्रमाणे अभिलेखतो. त्यावेळी तानीच्या प्रतिकाराची भाषा अप्रभावी वाटली. शिरमीचा अभिनय अजूनही प्रभावी होणे गरजेचे होते. शिवाय नारबादेखील पत्नीच्या अब्रूचे धिंदवडे काढणाऱ्या मुकादमासमोर गप्प बसणे मागाहून क्रोधीत होणेदेखील खटकले.प्रा. दिलीप परदेशी यांनी काळोख देत हुंकार या दोन अंकी नाटकात समाजाची वास्तवता मांडण्याचा प्रयत्न केला आहे. दीपक कीर यांनी दिग्दर्शन बऱ्यापैकी केले आहे. परंतु पूल पडल्यानंतर बराच वेळ रंगमंचावरील ‘ब्लॅकआऊट’चे कारण मात्र उमगले नाही. नाटक सुरू असताना वीजपुरवठा खंडित झाला. दहा ते बारा मिनिटानी वीजपुरठा सुरळीत झाला. परंतु कलाकारांनी लाईट आल्यानंतर अभिनय सुरू केला. मुलांना दोन घास मिळावेत, यासाठी बंगल्यावर काम करून स्वत:चे शरीर विकणाऱ्या शिरमीला धीर देणारी तानी, भुत्या व जुम्मन चाचादेखील परिस्थितीने गांजल्यामुळे घेतलेला निर्णय चुकीचा नसल्याचे सांगितले. अखेर गावाला रोजगार मिळावा, यासाठी स्वत:चे तान्हे बाळ तीन हजार रुपयांना विकण्यास शिरमी आणि नारबा तयार होतात. परंतु भुकेने आजारी पडलेले बाळ अखेर मुत्यूमुखी पडते. ‘काळोख देत हुंकार’ या नाटकातून समाजाचे वास्तव चित्रण मांडण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. तसेच रंगमंचावर नाटक सादर करण्यात संस्थेचा प्रयत्नही यशस्वी ठरला आहे.