शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
3
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
4
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
5
हत्तीचं ॲक्युपंक्चर, बिबट्याचं रूट कॅनल अन् ICU मधील माकड
6
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
7
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
8
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
9
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
10
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
11
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
12
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
13
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
14
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
15
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
16
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
17
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
18
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
19
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
20
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)

असगोलीला वगळल्याने भाजपचा जोर वाढला

By admin | Updated: September 23, 2016 00:38 IST

गुहागर नगरपंचायत : विनय नातू यांच्या प्रयत्नांना यश

संकेत गोयथळे -- गुहागर नगरपंचायतीतून असगोली गाव वगळण्याच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वाक्षरी केली असून, लवकरच याची अधिसूचना जारी होण्याची शक्यता आहे. या बदलामुळे राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपमधील राजकीय वादामध्ये पहिल्यांदाच भाजपने जोर मारला असून, पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीत याचे पडसाद उमटतील, अशी चर्चा रंगू लागली आहे.नगरपंचायत स्थापनेसाठी गुहागर शहराची लोकसंख्या कमी पडत असल्याने दोन हजार लोकसंख्या असलेले लगतचे असगोली गाव नगरपंचायतीला जोडण्याचा प्रस्ताव तत्कालीन नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी मांडला. मंत्रीपदाच्या जोरावर ६ आॅक्टोबर २०१२ रोजी गुहागर नगरपंचायत स्थापन झाली. याचवेळी असगोली गावामध्ये येणाऱ्या मांडके बिल्डर्सच्या प्रोजेक्टसाठी नगरपंचायत स्थापन होत असल्याची चर्चा होती. याला ग्रामस्थांनी कडाडून विरोधही केला. अखेर नगरपंचायत स्थापन होऊन असगोली गावाचाही त्यात समावेश करण्यात आला. भाजपनेही राजकीय खेळी करत असगोलीमधून माजी सरपंच गजानन वेल्हाळ यांच्यासह गुहागर शहरातील उमेदवार देऊन राष्ट्रवादीवर उलटी खेळी करण्याचा प्रयत्न केला. यानंतरही ग्रामस्थांनी विरोध करत लोकवर्गणी जमा करुन मुंबई उच्च न्यायालयात रिटपिटीशन दाखल केले, याची अद्याप सुनावणी झालेली नाही. सत्ता बदलानंतर माजी आमदार भाजपचे प्रदेश चिटणीस डॉ. विनय नातू यांनी वरच्या स्तरावर हालचाली सुरु केल्या. अखेर याला यश आले आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रस्तावावर सही केली आहे. आता हा प्रस्ताव नगरविकास खात्याकडे जाऊन याबाबतची अधिसुचना लवकरच जारी होईल, असे सांगितले जात आहे. काही भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तर असगोलीमध्ये घराघरामध्ये जाऊन हे आम्ही करुन दाखवले, असे सांगून राजकीय श्रेय घेण्याची सुरुवातही केली आहे.भविष्यात काही महिन्यांवर गुहागर पंचायत समितीची निवडणूक होणार आहे. नगरपंचायत स्थापन झाल्याने शहरातील जनतेच्या नियमांच्या गुंत्यामुळे वाढलेला प्रशासकीय अडचणी लक्षात घेता भाजपला याचा फायदा होईल, असे वाटत आहे. यातच भाजपचा एकतर्फी वर्चस्व असलेल्या असगोली गावाच्या मतदानाचा पंचायत समितीच्या निवडणुकीतही फायदा होईल, असे राजकीय गणित आहे. भविष्यात या बदलत्या घडामोडीमुळे प्रत्यक्ष कोणाला फायदा होईल, ही नंतरची प्रक्रिया असली तरी तत्कालीन नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी नगरपंचायत स्थापनेसाठी असगोली गावाचा समावेश करून चांगलीच बाजी मारली. मंत्रीपदी असताना नगरपंचायत स्थापन झाल्याने आपल्या अधिकारात स्थापनेपूर्वी व त्यानंतर काही कोटींचा निधी मंजूर केला. याचवेळी तालुक्याचे ठिकाण असलेल्या शहरांना नगरपंचायतीचा दर्जा देण्याचे प्रस्तावित होते. मात्र, यानुसार गुहागर नगरपंचायत स्थापन होण्यासाठी आणखी काही वर्षाचा कालावधी लागला असता व त्यावेळी मंत्रीपद असेल नसेल हा विचार करुन आधीच नगरपंचायत स्थापन करुन एकप्रकारे राजकीय बाजी मारली. गेली काही वर्षे मूग गिळून गप्प बसलेले डॉ. विनय नातू व भाजप मंडळींना गुहागर नगरपंचायतीमधून असगोली गाव वगळल्याने सत्तेचा राजकीय रिचार्ज मिळून पंचायत समिती निवडणुकीवर याचे पडसाद उमटताना दिसतील.