शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

असगोलीला वगळल्याने भाजपचा जोर वाढला

By admin | Updated: September 23, 2016 00:38 IST

गुहागर नगरपंचायत : विनय नातू यांच्या प्रयत्नांना यश

संकेत गोयथळे -- गुहागर नगरपंचायतीतून असगोली गाव वगळण्याच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वाक्षरी केली असून, लवकरच याची अधिसूचना जारी होण्याची शक्यता आहे. या बदलामुळे राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपमधील राजकीय वादामध्ये पहिल्यांदाच भाजपने जोर मारला असून, पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीत याचे पडसाद उमटतील, अशी चर्चा रंगू लागली आहे.नगरपंचायत स्थापनेसाठी गुहागर शहराची लोकसंख्या कमी पडत असल्याने दोन हजार लोकसंख्या असलेले लगतचे असगोली गाव नगरपंचायतीला जोडण्याचा प्रस्ताव तत्कालीन नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी मांडला. मंत्रीपदाच्या जोरावर ६ आॅक्टोबर २०१२ रोजी गुहागर नगरपंचायत स्थापन झाली. याचवेळी असगोली गावामध्ये येणाऱ्या मांडके बिल्डर्सच्या प्रोजेक्टसाठी नगरपंचायत स्थापन होत असल्याची चर्चा होती. याला ग्रामस्थांनी कडाडून विरोधही केला. अखेर नगरपंचायत स्थापन होऊन असगोली गावाचाही त्यात समावेश करण्यात आला. भाजपनेही राजकीय खेळी करत असगोलीमधून माजी सरपंच गजानन वेल्हाळ यांच्यासह गुहागर शहरातील उमेदवार देऊन राष्ट्रवादीवर उलटी खेळी करण्याचा प्रयत्न केला. यानंतरही ग्रामस्थांनी विरोध करत लोकवर्गणी जमा करुन मुंबई उच्च न्यायालयात रिटपिटीशन दाखल केले, याची अद्याप सुनावणी झालेली नाही. सत्ता बदलानंतर माजी आमदार भाजपचे प्रदेश चिटणीस डॉ. विनय नातू यांनी वरच्या स्तरावर हालचाली सुरु केल्या. अखेर याला यश आले आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रस्तावावर सही केली आहे. आता हा प्रस्ताव नगरविकास खात्याकडे जाऊन याबाबतची अधिसुचना लवकरच जारी होईल, असे सांगितले जात आहे. काही भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तर असगोलीमध्ये घराघरामध्ये जाऊन हे आम्ही करुन दाखवले, असे सांगून राजकीय श्रेय घेण्याची सुरुवातही केली आहे.भविष्यात काही महिन्यांवर गुहागर पंचायत समितीची निवडणूक होणार आहे. नगरपंचायत स्थापन झाल्याने शहरातील जनतेच्या नियमांच्या गुंत्यामुळे वाढलेला प्रशासकीय अडचणी लक्षात घेता भाजपला याचा फायदा होईल, असे वाटत आहे. यातच भाजपचा एकतर्फी वर्चस्व असलेल्या असगोली गावाच्या मतदानाचा पंचायत समितीच्या निवडणुकीतही फायदा होईल, असे राजकीय गणित आहे. भविष्यात या बदलत्या घडामोडीमुळे प्रत्यक्ष कोणाला फायदा होईल, ही नंतरची प्रक्रिया असली तरी तत्कालीन नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी नगरपंचायत स्थापनेसाठी असगोली गावाचा समावेश करून चांगलीच बाजी मारली. मंत्रीपदी असताना नगरपंचायत स्थापन झाल्याने आपल्या अधिकारात स्थापनेपूर्वी व त्यानंतर काही कोटींचा निधी मंजूर केला. याचवेळी तालुक्याचे ठिकाण असलेल्या शहरांना नगरपंचायतीचा दर्जा देण्याचे प्रस्तावित होते. मात्र, यानुसार गुहागर नगरपंचायत स्थापन होण्यासाठी आणखी काही वर्षाचा कालावधी लागला असता व त्यावेळी मंत्रीपद असेल नसेल हा विचार करुन आधीच नगरपंचायत स्थापन करुन एकप्रकारे राजकीय बाजी मारली. गेली काही वर्षे मूग गिळून गप्प बसलेले डॉ. विनय नातू व भाजप मंडळींना गुहागर नगरपंचायतीमधून असगोली गाव वगळल्याने सत्तेचा राजकीय रिचार्ज मिळून पंचायत समिती निवडणुकीवर याचे पडसाद उमटताना दिसतील.