शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

‘बेस्ट’ सेवेतून रत्नागिरी विभागाला वगळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : एस.टी. महामंडळाने सुरू केलेल्या बेस्ट वाहतुकीमध्ये सप्टेंबर २० ते मार्च २१ पर्यंत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : एस.टी. महामंडळाने सुरू केलेल्या बेस्ट वाहतुकीमध्ये सप्टेंबर २० ते मार्च २१ पर्यंत रत्नागिरी विभागाने सेवा बजावली होती. मात्र महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेच्या मागणीनुसार पालकमंत्री अनिल परब यांनी तातडीने कार्यवाही केली आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या ‘बेस्ट’ वाहतुकीसाठी रत्नागिरी विभागातील कर्मचाऱ्यांना घाटकोपर येथे बेस्ट वाहतुकीसाठी जाण्याची सक्ती केली जात होती, याबाबत महाराष्ट्र एस.टी. कामगार विभागीय संघटनेतर्फे राज्याचे उच्च तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे रत्नागिरी विभाग बेस्ट वाहतुकीमधून वगळण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार उदय सामंत यांनी याची दखल घेऊन परिवहनमंत्री व पालकमंत्री अनिल परब यांची भेट घेऊन रत्नागिरी विभागाला पुन्हा बेस्ट सेवेसाठी बोलविण्यात आले असल्याचे सांगून रत्नागिरी विभाग वगळण्यात यावा याबाबत चर्चा केली होती.

पालकमंत्री अनिल परब रत्नागिरी दौऱ्यावर आले असताना महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेचे विभागीय अध्यक्ष राजेश मयेकर, विभागीय सचिव संदेश सावंत आणि सहकारी यांनी भेट घेऊन रत्नागिरी विभाग बेस्ट वाहतुकीतून वगळण्याची विनंती केली. यावेळी पालकमंत्री परब यांनी याबाबत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री सामंत यांच्याशी चर्चा झाली असून, चार दिवसात निर्णय घेण्याचे, आश्वासन दिले होते. यावर तातडीने कार्यवाही करीत रत्नागिरी विभाग बेस्ट वाहतुकीतून वगळण्यात आल्याचे परिपत्रक महामंडळाने काढले आहे.