शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

प्रत्येक बाधित घटकाला मदत मिळावी, यासाठी मायक्रो प्लानिंग : डाॅ. बी. एन. पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : चिपळूण आणि खेड तालुक्यातील अतिवृष्टीने बाधित झालेल्या सर्वच घटकांपर्यंत मदत जावी, यादृष्टीने मायक्रो प्लानिंग ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : चिपळूण आणि खेड तालुक्यातील अतिवृष्टीने बाधित झालेल्या सर्वच घटकांपर्यंत मदत जावी, यादृष्टीने मायक्रो प्लानिंग करण्यात आले आहे, अशी माहिती रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डाॅ. बी. एन. पाटील यांनी शुक्रवारी ‘लोकमत’ला दिली. सर्व लोकप्रतिनिधी, पालकमंत्री, जिल्ह्यातील सर्व आमदार आणि विविध सामाजिक संस्था यांच्या एकजुटीमुळेच जिल्हा प्रशासनाला मदतकार्यात अडचण आली नाही, असेही यावेळी जिल्हाधिकारी यांनी आवर्जून सांगितले.

दि. २१ रोजी झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे तसेच पुरामुळे चिपळूण, खेडमध्ये घरे, गाेठे, सार्वजनिक मालमत्ता, पाळीव जनावरे, शेती यांची अपरिमित हानी झाली. अनेकजण बेघर झाले. कित्येक भागात दरडी कोसळून अनेकांचे मृत्यू झाले. या पावसामुळे वित्तहानीबरोबरच प्राणहानीही झाली. सध्या पाऊस थांबल्याने जिल्हा प्रशासनाच्या मदतकार्याला वेगात सुरूवात झाली आहे. यासाठी दोन गोदामे अन्नधान्ये तसेच अन्य मदतीच्या वस्तूंनी भरलेली आहेत. वस्तू संकलनासाठी चिपळूण शहरात पाच संकलन केंद्र सुरू करण्यात आली आहेत. संकलनाच्या व्यवस्थेसाठी एनसीसी, होमगार्ड, शिक्षक, सरपंच, ग्रामसेवक यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. दरदिवशी दोन्हीवेळेला २० हजार शिवभोजन थाळ्यांची सोय चिपळूण आणि खेर्डी या भागात करण्यात आली असल्याची माहितीही जिल्हाधिकारी डाॅ. पाटील यांनी दिली.

जिथे संपर्क होत नाही, अशांची यादी तयार करून अन्नधान्यांसह इतर जीवनावश्यक वस्तू तसेच औषधे, पाण्याच्या बाटल्या असे साहित्य संकलित करून प्रत्येक गावाला या सामानाचा एक ट्रक पाठविण्यात येत आहे. पूरपरिस्थितीमुळे या भागात रोगराईचा तसेच कोरोनाचा संभाव्य धाेका लक्षात घेऊन परिसरात मुंबई, ठाणे, नवी मुंबई आदी भागातून १२० डाॅक्टरांचे पथक दाखल झाले आहे. तसेच जिल्ह्यातील तालुका वैद्यकीय अधिकारी तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांचे निम्मे पथक चिपळुणात दाखल झाले आहे. बाहेरून मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅन दाखल झाल्या आहेत. हे पथक घरोघरी जाऊन वैद्यकीय तपासणी करत आहे. पुरवठा विभागाकडूनही मुबलक प्रमाणात अन्नधान्य उपलब्ध केले असून, त्याचेही नियोजनबद्ध वाटप सुरू असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.