शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

प्रत्येक बाधित घटकाला मदत मिळावी, यासाठी मायक्रो प्लानिंग : डाॅ. बी. एन. पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : चिपळूण आणि खेड तालुक्यातील अतिवृष्टीने बाधित झालेल्या सर्वच घटकांपर्यंत मदत जावी, यादृष्टीने मायक्रो प्लानिंग ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : चिपळूण आणि खेड तालुक्यातील अतिवृष्टीने बाधित झालेल्या सर्वच घटकांपर्यंत मदत जावी, यादृष्टीने मायक्रो प्लानिंग करण्यात आले आहे, अशी माहिती रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डाॅ. बी. एन. पाटील यांनी शुक्रवारी ‘लोकमत’ला दिली. सर्व लोकप्रतिनिधी, पालकमंत्री, जिल्ह्यातील सर्व आमदार आणि विविध सामाजिक संस्था यांच्या एकजुटीमुळेच जिल्हा प्रशासनाला मदतकार्यात अडचण आली नाही, असेही यावेळी जिल्हाधिकारी यांनी आवर्जून सांगितले.

दि. २१ रोजी झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे तसेच पुरामुळे चिपळूण, खेडमध्ये घरे, गाेठे, सार्वजनिक मालमत्ता, पाळीव जनावरे, शेती यांची अपरिमित हानी झाली. अनेकजण बेघर झाले. कित्येक भागात दरडी कोसळून अनेकांचे मृत्यू झाले. या पावसामुळे वित्तहानीबरोबरच प्राणहानीही झाली. सध्या पाऊस थांबल्याने जिल्हा प्रशासनाच्या मदतकार्याला वेगात सुरूवात झाली आहे. यासाठी दोन गोदामे अन्नधान्ये तसेच अन्य मदतीच्या वस्तूंनी भरलेली आहेत. वस्तू संकलनासाठी चिपळूण शहरात पाच संकलन केंद्र सुरू करण्यात आली आहेत. संकलनाच्या व्यवस्थेसाठी एनसीसी, होमगार्ड, शिक्षक, सरपंच, ग्रामसेवक यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. दरदिवशी दोन्हीवेळेला २० हजार शिवभोजन थाळ्यांची सोय चिपळूण आणि खेर्डी या भागात करण्यात आली असल्याची माहितीही जिल्हाधिकारी डाॅ. पाटील यांनी दिली.

जिथे संपर्क होत नाही, अशांची यादी तयार करून अन्नधान्यांसह इतर जीवनावश्यक वस्तू तसेच औषधे, पाण्याच्या बाटल्या असे साहित्य संकलित करून प्रत्येक गावाला या सामानाचा एक ट्रक पाठविण्यात येत आहे. पूरपरिस्थितीमुळे या भागात रोगराईचा तसेच कोरोनाचा संभाव्य धाेका लक्षात घेऊन परिसरात मुंबई, ठाणे, नवी मुंबई आदी भागातून १२० डाॅक्टरांचे पथक दाखल झाले आहे. तसेच जिल्ह्यातील तालुका वैद्यकीय अधिकारी तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांचे निम्मे पथक चिपळुणात दाखल झाले आहे. बाहेरून मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅन दाखल झाल्या आहेत. हे पथक घरोघरी जाऊन वैद्यकीय तपासणी करत आहे. पुरवठा विभागाकडूनही मुबलक प्रमाणात अन्नधान्य उपलब्ध केले असून, त्याचेही नियोजनबद्ध वाटप सुरू असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.