शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

लाॅकडाऊनमध्येही बेफिकिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:38 IST

शासनाने शेतकऱ्यांना निविष्ठा खरेदीसाठी परवानगी दिली आहे. परंतु शेतकऱ्यांना वाहनात इंधन देण्यास पंपचालक नकार दर्शवित आहेत. काही पंपचालक मात्र ...

शासनाने शेतकऱ्यांना निविष्ठा खरेदीसाठी परवानगी दिली आहे. परंतु शेतकऱ्यांना वाहनात इंधन देण्यास पंपचालक नकार दर्शवित आहेत. काही पंपचालक मात्र किसान क्रेडिट कार्ड किंवा साताबारा पाहून इंधन देत आहेत. वास्तविक शेतकऱ्यांना शेती निविष्ठा खरेदीसाठी परवानगी दिली असतानाच इंधनासाठी परवानगी देणे गरजेचे होते. यांत्रिक अवजारांसाठी इंधन लागते; परंतु इंधनच उपलब्ध होत नसल्याने शेतीची कामे खोळंबत आहेत. काही पंपचालक कायद्यावर बोट ठेवत आहेत तर काही समजूतदारपणा दाखवून सातबारा ग्राह्य धरून इंधन देत आहेत. एकीकडे निकड भासताना कायदा आड येतो तर दुसरीकडे बेफिकीर वृत्तीमुळे कायद्याचा दंडुका झेलावा लागत आहे.

जिल्ह्यातील कोरोना रुग्णवाढीमुळे प्रशासनावर ताण आला आहे. ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत लाॅकडाऊन, कडक संचारबंदी जारी करण्यात येते, तेव्हा जिल्ह्यातील कोरोना पळवून लावत जनतेच्या आरोग्याची सूरक्षा हाच एकमेव उद्देश आहे. त्यासाठी प्रत्येकाने साथ देणे गरजेचे आहे. थोडेसे सामंजस्य मोलाचे आहे. शासन वारंवार ‘स्टे होम, स्टे सेव्ह’, मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंग राखा, हात धुवा असे वारंवार बजावत आहे. मात्र, गेले वर्षभर अशा प्रकारच्या सूचना एकूण कंटाळा आला असल्याने घराबाहेर हिंडणारे अधिक आहेत. मास्क तोंडला नाही तर हनुवटीला अडकून महाभाग फिरत असतात, त्यामुळे थोडीशी सावधानता सर्वांनीच बाळगणे गरजेचे आहे.

जिल्ह्यातील लाॅकडाऊन येत्या दोन दिवसांत संपणार आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार चाैथ्या टप्प्यात अनलाॅक होणार आहे. अनलाॅकमुळे हळूहळू सर्व व्यवहार रूळावर येणार आहेत. अनलाॅक झाल्यानंतरही शासकीय नियमावलींची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. लाॅकडाऊन सुरू असतानाही गेल्या पाच दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या कमी झालेली नाही. अनलाॅक घोषित केले जाणार आहे. मात्र, कोरोनाची भीती न बाळगता, प्रत्येकांने योग्य खबरदारी घेतली तर नक्कीच रुग्णसंख्येचा वाढता आलेख खाली येण्यास मदत होणार आहे.

गोरगरीब, गरजू व्यक्तींवर सध्या नोकरी, व्यवसाय नसल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे या व्यक्तींचे बाजारात खरेदीसाठी जाणे बहुधा टाळले जाते. मात्र, काही हाैशे गवशे नाहक बाजारात गर्दी करून संक्रमण फैलावण्यास मदत करतात. बेफिकीर वृत्तीमुळे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह ज्या-ज्या व्यक्तींच्या संपर्कात येतील त्यांना त्रास होतो. त्यामुळे शासनाच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. तिसरी लाट येणार असून सध्या लहान मुले बाधित होण्याचे प्रकार वाढत आहे. त्यामुळेच सावधानता तसेच योग्य खबरदारी गरजेची आहे.

- मेहरून नाकाडे