शहरं
Join us  
Trending Stories
1
Pooja Khedkar Mother: नवी मुंबईतून ट्रक चालकाचं अपहरण, पुण्यातील घरात ठेवले डांबून; पूजा खेडकरच्या आईचा प्रताप
2
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
3
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
4
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
5
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन
6
Navratri 2025: आई तुळजाभवानीची घोर मंचकी निद्रा प्रारंभ; आता दर्शन थेट घटस्थापनेला!
7
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
8
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
9
Stock Markets Today: आठवड्याची सुस्त सुरुवात, ६० अंकांनी वधारला सेन्सेक्स; रियल्टी, मेटल शेअर्समध्ये खरेदी
10
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केलेली ती चूक भोवणार? टीम इंडियावर कारवाई होणार?
11
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?
12
युद्ध स्फोटक वळणावर, रशियन ड्रोन्स रोमानियात; युक्रेनचा रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला
13
राहुल गांधींवर आरोप करण्याऐवजी त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा
14
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
15
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
16
ट्रम्प अन् निर्बंधांमुळे रशियन तेल मिळवण्यात भारताला अडचणी; जहाज कंपन्यांनी दिला नकार
17
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
18
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
19
‘एआय सायकोसिस’ ही स्थिती नेमकी काय आहे? Ai विचारांवर किंवा भावनांवर नियंत्रण ठेवत
20
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक

लाॅकडाऊनमध्येही बेफिकिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:38 IST

शासनाने शेतकऱ्यांना निविष्ठा खरेदीसाठी परवानगी दिली आहे. परंतु शेतकऱ्यांना वाहनात इंधन देण्यास पंपचालक नकार दर्शवित आहेत. काही पंपचालक मात्र ...

शासनाने शेतकऱ्यांना निविष्ठा खरेदीसाठी परवानगी दिली आहे. परंतु शेतकऱ्यांना वाहनात इंधन देण्यास पंपचालक नकार दर्शवित आहेत. काही पंपचालक मात्र किसान क्रेडिट कार्ड किंवा साताबारा पाहून इंधन देत आहेत. वास्तविक शेतकऱ्यांना शेती निविष्ठा खरेदीसाठी परवानगी दिली असतानाच इंधनासाठी परवानगी देणे गरजेचे होते. यांत्रिक अवजारांसाठी इंधन लागते; परंतु इंधनच उपलब्ध होत नसल्याने शेतीची कामे खोळंबत आहेत. काही पंपचालक कायद्यावर बोट ठेवत आहेत तर काही समजूतदारपणा दाखवून सातबारा ग्राह्य धरून इंधन देत आहेत. एकीकडे निकड भासताना कायदा आड येतो तर दुसरीकडे बेफिकीर वृत्तीमुळे कायद्याचा दंडुका झेलावा लागत आहे.

जिल्ह्यातील कोरोना रुग्णवाढीमुळे प्रशासनावर ताण आला आहे. ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत लाॅकडाऊन, कडक संचारबंदी जारी करण्यात येते, तेव्हा जिल्ह्यातील कोरोना पळवून लावत जनतेच्या आरोग्याची सूरक्षा हाच एकमेव उद्देश आहे. त्यासाठी प्रत्येकाने साथ देणे गरजेचे आहे. थोडेसे सामंजस्य मोलाचे आहे. शासन वारंवार ‘स्टे होम, स्टे सेव्ह’, मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंग राखा, हात धुवा असे वारंवार बजावत आहे. मात्र, गेले वर्षभर अशा प्रकारच्या सूचना एकूण कंटाळा आला असल्याने घराबाहेर हिंडणारे अधिक आहेत. मास्क तोंडला नाही तर हनुवटीला अडकून महाभाग फिरत असतात, त्यामुळे थोडीशी सावधानता सर्वांनीच बाळगणे गरजेचे आहे.

जिल्ह्यातील लाॅकडाऊन येत्या दोन दिवसांत संपणार आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार चाैथ्या टप्प्यात अनलाॅक होणार आहे. अनलाॅकमुळे हळूहळू सर्व व्यवहार रूळावर येणार आहेत. अनलाॅक झाल्यानंतरही शासकीय नियमावलींची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. लाॅकडाऊन सुरू असतानाही गेल्या पाच दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या कमी झालेली नाही. अनलाॅक घोषित केले जाणार आहे. मात्र, कोरोनाची भीती न बाळगता, प्रत्येकांने योग्य खबरदारी घेतली तर नक्कीच रुग्णसंख्येचा वाढता आलेख खाली येण्यास मदत होणार आहे.

गोरगरीब, गरजू व्यक्तींवर सध्या नोकरी, व्यवसाय नसल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे या व्यक्तींचे बाजारात खरेदीसाठी जाणे बहुधा टाळले जाते. मात्र, काही हाैशे गवशे नाहक बाजारात गर्दी करून संक्रमण फैलावण्यास मदत करतात. बेफिकीर वृत्तीमुळे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह ज्या-ज्या व्यक्तींच्या संपर्कात येतील त्यांना त्रास होतो. त्यामुळे शासनाच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. तिसरी लाट येणार असून सध्या लहान मुले बाधित होण्याचे प्रकार वाढत आहे. त्यामुळेच सावधानता तसेच योग्य खबरदारी गरजेची आहे.

- मेहरून नाकाडे