शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

लाॅकडाऊनमध्येही बेफिकिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:38 IST

शासनाने शेतकऱ्यांना निविष्ठा खरेदीसाठी परवानगी दिली आहे. परंतु शेतकऱ्यांना वाहनात इंधन देण्यास पंपचालक नकार दर्शवित आहेत. काही पंपचालक मात्र ...

शासनाने शेतकऱ्यांना निविष्ठा खरेदीसाठी परवानगी दिली आहे. परंतु शेतकऱ्यांना वाहनात इंधन देण्यास पंपचालक नकार दर्शवित आहेत. काही पंपचालक मात्र किसान क्रेडिट कार्ड किंवा साताबारा पाहून इंधन देत आहेत. वास्तविक शेतकऱ्यांना शेती निविष्ठा खरेदीसाठी परवानगी दिली असतानाच इंधनासाठी परवानगी देणे गरजेचे होते. यांत्रिक अवजारांसाठी इंधन लागते; परंतु इंधनच उपलब्ध होत नसल्याने शेतीची कामे खोळंबत आहेत. काही पंपचालक कायद्यावर बोट ठेवत आहेत तर काही समजूतदारपणा दाखवून सातबारा ग्राह्य धरून इंधन देत आहेत. एकीकडे निकड भासताना कायदा आड येतो तर दुसरीकडे बेफिकीर वृत्तीमुळे कायद्याचा दंडुका झेलावा लागत आहे.

जिल्ह्यातील कोरोना रुग्णवाढीमुळे प्रशासनावर ताण आला आहे. ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत लाॅकडाऊन, कडक संचारबंदी जारी करण्यात येते, तेव्हा जिल्ह्यातील कोरोना पळवून लावत जनतेच्या आरोग्याची सूरक्षा हाच एकमेव उद्देश आहे. त्यासाठी प्रत्येकाने साथ देणे गरजेचे आहे. थोडेसे सामंजस्य मोलाचे आहे. शासन वारंवार ‘स्टे होम, स्टे सेव्ह’, मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंग राखा, हात धुवा असे वारंवार बजावत आहे. मात्र, गेले वर्षभर अशा प्रकारच्या सूचना एकूण कंटाळा आला असल्याने घराबाहेर हिंडणारे अधिक आहेत. मास्क तोंडला नाही तर हनुवटीला अडकून महाभाग फिरत असतात, त्यामुळे थोडीशी सावधानता सर्वांनीच बाळगणे गरजेचे आहे.

जिल्ह्यातील लाॅकडाऊन येत्या दोन दिवसांत संपणार आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार चाैथ्या टप्प्यात अनलाॅक होणार आहे. अनलाॅकमुळे हळूहळू सर्व व्यवहार रूळावर येणार आहेत. अनलाॅक झाल्यानंतरही शासकीय नियमावलींची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. लाॅकडाऊन सुरू असतानाही गेल्या पाच दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या कमी झालेली नाही. अनलाॅक घोषित केले जाणार आहे. मात्र, कोरोनाची भीती न बाळगता, प्रत्येकांने योग्य खबरदारी घेतली तर नक्कीच रुग्णसंख्येचा वाढता आलेख खाली येण्यास मदत होणार आहे.

गोरगरीब, गरजू व्यक्तींवर सध्या नोकरी, व्यवसाय नसल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे या व्यक्तींचे बाजारात खरेदीसाठी जाणे बहुधा टाळले जाते. मात्र, काही हाैशे गवशे नाहक बाजारात गर्दी करून संक्रमण फैलावण्यास मदत करतात. बेफिकीर वृत्तीमुळे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह ज्या-ज्या व्यक्तींच्या संपर्कात येतील त्यांना त्रास होतो. त्यामुळे शासनाच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. तिसरी लाट येणार असून सध्या लहान मुले बाधित होण्याचे प्रकार वाढत आहे. त्यामुळेच सावधानता तसेच योग्य खबरदारी गरजेची आहे.

- मेहरून नाकाडे