शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

माणसंं मेली तरी चालतील, आम्ही भांंडतच राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:35 IST

कोरोना महामारीमध्ये अनेक माणसं मेली. अनेक कुटुंबीयांचे होत्याचं नव्हतं झालं. कुणाचा पती गेला, कुणाचा मुलगा गेला, कुणाची मुलगी ...

कोरोना महामारीमध्ये अनेक माणसं मेली. अनेक कुटुंबीयांचे होत्याचं नव्हतं झालं. कुणाचा पती गेला, कुणाचा मुलगा गेला, कुणाची मुलगी गेली तर कुणाचे आई-वडील गेले. तर अनेक ठिकाणी अख्खे कुटुंबच कोरोनामुळे बळी गेले. त्यामुळे आज प्रत्येक गावात कोरोनामुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत. आई-वडिलांचे छत्र हरपल्याने त्या मुलांच्या भवितव्याचे काय, असे अनेक प्रश्न डोळ्यासमोर उभे राहतात. काही कुटुंबीयांची अशीही परिस्थिती आहे की वडील गेल्याची मुलाला कल्पना नाही तर पती गेल्याची त्यांच्या पत्नीला कल्पनाच नाही, अशी भयानक स्थिती आज पहावयास मिळत आहे. रत्नागिरीतील एका कुटुंबात तर आई, वडील, मुलगा आणि मुलगी अशी चारही माणसं कोरोनाने हिरावून घेतल्याने त्या कुटुंबाने करावयाचे काय. कल्पनाच करता येणार नाही, अशी परिस्थिती अनेक कुटुंबीयांवर ओढवली आहे. हे दु:ख कोणाला सांगणार. माणसं मेली तरी त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करायला नातेवाईकही पुढे येत नाहीत. प्रसंग कधी तरी आपल्यावरही येईल, असा विचारही करायला कोणी तयार नाहीत. कोरोनामुळे माणुसकीही हरवली आहे, असेच म्हणावे लागत आहे.

कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या संपूर्ण कुटुंबीयांची तर त्यापेक्षा भयानक परिस्थिती आहे. वडील कोरोनाने पॉझिटिव्ह झालेले असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर मुलगा, सून अचानक आजारी पडतात. त्यानंतर होणारी ससेहोलपट ही फार वाईट असते. कारण वडील रुग्णालयात, त्यांची सेवा करणाऱ्या चिरंजीवालाही कोरोनाची लागण झाल्याने त्याच्या मदतीसाठी कोण धावणार. तसेच त्या वडिलांना जेवण घेऊन जाणाराच जागेवर पडल्याने त्या कुटुंबाची काय अवस्था असेल ही परिस्थिती विचार करण्यापलीकडची आहे. त्यामुळे कोरोनामुळे फार दयनीय अवस्था निर्माण झाली आहे, हे न सांगण्यासारखे सत्य आहे. याची जाणीव राजकारण्यांना व्हायला पाहिजेत. कारण ते लोक जीव गमवावत असतानाच हे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात गुंतले आहेत. सर्वांनाच असे म्हणता येणार नाही. पण जास्तीत जास्त राजकीय मंडळी कुरघोड्या करण्यापलीकडे काही करीत नाहीत, असे चित्र पहावयास मिळत आहे.

कोरोना महामारी, चक्रीवादळ या गोष्टी काही राजकारण्यांसाठी नव्या राहिलेल्या नाहीत. यामध्ये राजकारण आणून केवळ आरोप-प्रत्यारोप करण्यापलीकडे काहीही काम करीत नाहीत. काही राजकारणी या महामारीमध्येही खालच्या थराचे राजकारण करीत आहेत. आपण स्वत: काही करायचं नाही आणि दुसरा कोणी काम करीत असेल त्याच्या तंगड्या खेचण्यातच धन्यता मानणाऱ्यांची संख्याही कमी नाही. त्यामुळे लोक मरताहेत, त्यांना वाचविण्यासाठी काही करण्याऐवजी घरी बसून नुसताच तमाशा पहावयाचा आणि नंतर त्याचा बाऊ करायचा, असा काहीसा प्रकार सुरू आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असतानाच रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या रुग्णांसाठी काहीतरी करावे, त्यांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात पुढे करावा तसेच त्या रुग्णांना चांगली सेवा देण्याची धडपड करण्याची गरज आहे. पण परिस्थिती उलट आहे. लोक मेले तरी चालतील, पण आपण भांडतच राहू, आरोप करू, त्यातून काही निष्पन्न नाही झाले तरी चालेल, याला काय म्हणावे. माणुसकी मेली की जिवंत आहे?