शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

जैविक विविधता समित्या स्थापणार

By admin | Updated: February 2, 2015 00:06 IST

मुख्य कार्य म्हणजे स्थानिक लोकांशी विचारविनिमय करुन लोक जैविक विविधता नोंदवही तयार करणे,

रत्नागिरी : जैवविविधता जपण्यासाठी ग्राम ते जिल्हास्तरावर जैविक विविधता व्यवस्थापन समित्यांची स्थापना करण्यात येणार आहे़ त्यादृष्टीने जिल्ह्यात ८६५ समित्या गठीत करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे़ जैवविविधता व्यवस्थापन समितीचे मुख्य कार्य म्हणजे स्थानिक लोकांशी विचारविनिमय करुन लोक जैविक विविधता नोंदवही तयार करणे, स्थानिक जैविक संसाधनांची माहिती व उपलब्धता, त्यांचा वैद्यकीय किंवा कोणताही दुसरा उपयोग याची बहुव्यापक माहिती या नोंदवहीत ठेवण्यात येणार आहे़ तसेच स्थानिक वैद्य, वैदू, हकीम, पारंपरिक आरोग्याची काळजी घेणाऱ्या लोकांची माहिती आणि शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, शासकीय संस्था, अशासकीय संस्था, पीक वनस्पती प्रजाती, फळ झाडे प्रजाती, लोक जीवन, पिकांवरील कीड प्रजाती, भूमी रचना, औषधी वनस्पती प्रजाती, पाळीव प्राणी, मत्स्य संवर्धन प्रजाती, शोभेच्या वनस्पती, झाडे, झुडुपे, कंद, गवत, वेल, सागर किनारा, सागरी वनस्पती, वन्य प्राणी, सामाजिक आर्थिक रुपरेखा आदींची माहिती घेण्यात येणार आहे़ कीटकांचे निरीक्षण आणि त्यांचा संग्रह करणे, गोळा केलेल्या कीटक नमुन्यांची ओळख, त्यांची वैशिष्ट्ये, औषधोपयोगी सर्व्हेक्षण, जैविक वनस्पती धार्मिक कृत्यात आणि सामाजिक कार्यात वापर आदींची माहिती या समितीच्या वतीने नोंद करण्यात येणार आहे़ यामध्ये ८६५ व्यवस्थापन समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. (शहर वार्ताहर)