शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

महामारीत हजारो लोकांचे पाेट भरले; अनुदानाची वाट न बघता काम सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:20 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोना काळात आर्थिक दुर्बल घटक उपाशी राहून नये, या हेतूने शासनाने दहा रुपयात सुरू ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोना काळात आर्थिक दुर्बल घटक उपाशी राहून नये, या हेतूने शासनाने दहा रुपयात सुरू केलेली शिवभोजन थाळी आता मोफत दिली जात आहे. शासनाकडून ही थाळी देणाऱ्या केंद्रांना अनुदान दिले जाते. मात्र, मे महिन्याचे अनुदान अजूनही मिळाले नसल्याने हे केंद्रधारक या महिन्याच्या अनुदानाची प्रतीक्षा करीत आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत. या काळात राज्यातील कोणीही गरजू माणूस उपाशी राहू नये म्हणून शिवभोजन केंद्रात मोफत थाळी सुविधा देण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यात सध्या २२ केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. मात्र, त्यातील २१ केंद्रे सुरू असून, एक बंद आहे. शासनाने शिवभोजन थाळी २६ जानेवारी २०२० रोजी सुरू केली. जिल्ह्यात सुरुवातीला ही थाळी १० रुपयांमध्ये मिळत होती आणि प्रतिथाळी ४० रुपये केंद्रचालकाला अनुदान म्हणून मिळत होते. सध्या ही थाळी गरजू नागरिकांना मोफत दिली जात आहे. या योजनेचा १५ जून २०२१ पर्यंत तब्बल ९ लाख ५९ हजार ७४३ गरजुंनी लाभ घेतला आहे.

परंतु जिल्ह्यात या केंद्रचालकांचे मे महिन्याचे अनुदान मिळालेले नाही.

केंद्रचालक म्हणतात...

शिवभोजन थाळी केंद्राचे अनुदान नियमित होते.

मे महिन्याचे अनुदान काही कारणास्तव अडकले होते. मात्र, आता त्याची प्रक्रिया जिल्हा पुरवठा शाखेकडून सुरू आहे. आम्हाला पंधरा - पंधरा दिवसांचे अनुदान दिले जात आहे.

- शिल्पा सुर्वे, रत्नागिरी

काही महिन्यांपूर्वी अनुदान कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे मिळाले नव्हते. मात्र, आता अनुदान नियमित मिळत आहे. मे महिन्याचे अनुदान काही कारणास्तव निघाले नव्हते. मात्र, ते आता थोड्याच दिवसांत मिळणार आहे.

- गणेश धुरी, रत्नागिरी

काही ठिकाणी बाेगस लाभार्थी

शिवभोजन थाळी आता मोफत मिळू लागली आहे. त्यामुळे वारंवार एकच व्यक्ती याचा लाभ घेत असल्याचे काही ठिकाणी निदर्शनास आले आहे. त्यामुळे या योजनेत पारदर्शकता येण्यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून प्रत्येक केंद्रांवर शिवभोजन थाळीचा लाभ घेणारी व्यक्ती एकच आहे का, याचा शहानिशा करूनच केंद्रचालकांना अनुदान दिले जाते.

प्रतिथाळी ५० रुपयेे अनुदान

शासनाने गरजू, कष्टकरी, कामगार वर्गाची उपासमार टाळण्यासाठी २०२० मध्ये शिवभोजन थाळी १० रुपयांत सुरू केली. त्यासाठी केंद्र चालकांना प्रतिथाळी ४० रुपये अनुदान दिले जात आहे. सध्या ही थाळी मोफत दिली जात आहे. त्यामुळे केंद्र

चालकांना आता पुन्हा ५० रुपये प्रतिथाळी असे अनुदान दिले जात आहे.

थाळी संख्या घटली...

शासनाने १० रुपयांत शिवभोजन थाळी सुरू केली. मात्र, कोरोना काळात लाॅकडाऊन असल्याने कोरोना संसर्ग टाळण्यासाठी शासनाने प्रत्यक्ष केंद्रात बसून खाण्याऐवजी पार्सल सुविधा सुरू ठेवण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे लाॅकडाऊन काळात अनेक गरजूंना बाहेर पडता येत नसल्याने थाळ्यांची संख्याही कमी झाली आहे. त्यामुळे आता सर्वच शिवभोजन केंद्रांवरील थाळ्यांची संख्या घटली आहे.

अनुदान देताना थाळी घेणाऱ्यांची संख्या आणि त्यांचे फोटो, याची पडताळणी करावी लागते. बोगस लाभार्थी वगळण्यासाठी ही खबरदारी घ्यावी लागते. यासाठी वेळ अधिक लागतो. या प्रक्रियेमुळे मे महिन्याचे अनुदान निघाले नव्हते. परंतु आता थोड्याच दिवसात तेही निघेल.

- ऐश्वर्या काळुसे,

जिल्हा पुरवठा अधिकारी, रत्नागिरी