शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
3
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
4
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
5
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
8
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
9
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
10
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
11
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
12
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
13
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
14
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
15
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
16
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
17
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
18
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
19
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
20
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
Daily Top 2Weekly Top 5

महामारीत हजारो लोकांचे पाेट भरले; अनुदानाची वाट न बघता काम सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:20 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोना काळात आर्थिक दुर्बल घटक उपाशी राहून नये, या हेतूने शासनाने दहा रुपयात सुरू ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोना काळात आर्थिक दुर्बल घटक उपाशी राहून नये, या हेतूने शासनाने दहा रुपयात सुरू केलेली शिवभोजन थाळी आता मोफत दिली जात आहे. शासनाकडून ही थाळी देणाऱ्या केंद्रांना अनुदान दिले जाते. मात्र, मे महिन्याचे अनुदान अजूनही मिळाले नसल्याने हे केंद्रधारक या महिन्याच्या अनुदानाची प्रतीक्षा करीत आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत. या काळात राज्यातील कोणीही गरजू माणूस उपाशी राहू नये म्हणून शिवभोजन केंद्रात मोफत थाळी सुविधा देण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यात सध्या २२ केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. मात्र, त्यातील २१ केंद्रे सुरू असून, एक बंद आहे. शासनाने शिवभोजन थाळी २६ जानेवारी २०२० रोजी सुरू केली. जिल्ह्यात सुरुवातीला ही थाळी १० रुपयांमध्ये मिळत होती आणि प्रतिथाळी ४० रुपये केंद्रचालकाला अनुदान म्हणून मिळत होते. सध्या ही थाळी गरजू नागरिकांना मोफत दिली जात आहे. या योजनेचा १५ जून २०२१ पर्यंत तब्बल ९ लाख ५९ हजार ७४३ गरजुंनी लाभ घेतला आहे.

परंतु जिल्ह्यात या केंद्रचालकांचे मे महिन्याचे अनुदान मिळालेले नाही.

केंद्रचालक म्हणतात...

शिवभोजन थाळी केंद्राचे अनुदान नियमित होते.

मे महिन्याचे अनुदान काही कारणास्तव अडकले होते. मात्र, आता त्याची प्रक्रिया जिल्हा पुरवठा शाखेकडून सुरू आहे. आम्हाला पंधरा - पंधरा दिवसांचे अनुदान दिले जात आहे.

- शिल्पा सुर्वे, रत्नागिरी

काही महिन्यांपूर्वी अनुदान कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे मिळाले नव्हते. मात्र, आता अनुदान नियमित मिळत आहे. मे महिन्याचे अनुदान काही कारणास्तव निघाले नव्हते. मात्र, ते आता थोड्याच दिवसांत मिळणार आहे.

- गणेश धुरी, रत्नागिरी

काही ठिकाणी बाेगस लाभार्थी

शिवभोजन थाळी आता मोफत मिळू लागली आहे. त्यामुळे वारंवार एकच व्यक्ती याचा लाभ घेत असल्याचे काही ठिकाणी निदर्शनास आले आहे. त्यामुळे या योजनेत पारदर्शकता येण्यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून प्रत्येक केंद्रांवर शिवभोजन थाळीचा लाभ घेणारी व्यक्ती एकच आहे का, याचा शहानिशा करूनच केंद्रचालकांना अनुदान दिले जाते.

प्रतिथाळी ५० रुपयेे अनुदान

शासनाने गरजू, कष्टकरी, कामगार वर्गाची उपासमार टाळण्यासाठी २०२० मध्ये शिवभोजन थाळी १० रुपयांत सुरू केली. त्यासाठी केंद्र चालकांना प्रतिथाळी ४० रुपये अनुदान दिले जात आहे. सध्या ही थाळी मोफत दिली जात आहे. त्यामुळे केंद्र

चालकांना आता पुन्हा ५० रुपये प्रतिथाळी असे अनुदान दिले जात आहे.

थाळी संख्या घटली...

शासनाने १० रुपयांत शिवभोजन थाळी सुरू केली. मात्र, कोरोना काळात लाॅकडाऊन असल्याने कोरोना संसर्ग टाळण्यासाठी शासनाने प्रत्यक्ष केंद्रात बसून खाण्याऐवजी पार्सल सुविधा सुरू ठेवण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे लाॅकडाऊन काळात अनेक गरजूंना बाहेर पडता येत नसल्याने थाळ्यांची संख्याही कमी झाली आहे. त्यामुळे आता सर्वच शिवभोजन केंद्रांवरील थाळ्यांची संख्या घटली आहे.

अनुदान देताना थाळी घेणाऱ्यांची संख्या आणि त्यांचे फोटो, याची पडताळणी करावी लागते. बोगस लाभार्थी वगळण्यासाठी ही खबरदारी घ्यावी लागते. यासाठी वेळ अधिक लागतो. या प्रक्रियेमुळे मे महिन्याचे अनुदान निघाले नव्हते. परंतु आता थोड्याच दिवसात तेही निघेल.

- ऐश्वर्या काळुसे,

जिल्हा पुरवठा अधिकारी, रत्नागिरी