शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
3
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
4
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
5
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
6
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
7
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
8
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
9
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
10
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
11
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
12
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
13
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
14
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
15
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
16
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
17
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
18
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
19
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
20
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट

केमिकल झोनविरोधात पर्यावरणवाद्यांचा एल्गार

By admin | Updated: September 24, 2015 23:56 IST

४0 संस्था एकवटल्या : सर्व राजकीय पक्षांना एकत्र आणणार

रत्नागिरी : कोकणातील प्रस्तावित केमिकल झोनला जिल्ह्यातील ४० पर्यावरण संस्थांनी एकत्रित विरोध दर्शवला आहे. कोकणवर लादलेला व कोकणवासीयांना विश्वासात न घेता घोषणा केलेला हा झोन म्हणजे जुलूमशाही आहे. त्यामुळे पर्यावरणाची प्रचंड हानी होईल. शासनाच्या या जुलूमशाहीविरोधात तीव्र आंदोलन उभारले जाईल. या झोनला विरोध करणाऱ्या राजकीय पक्षांनाही पर्यावरण संस्थांच्या फेडरेशनद्वारे एकत्र आणले जाणार असल्याची घोषणा पर्यावरणविषयी संस्था फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी आज गुरूवारी पत्रकार परिषदेत केली. यावेळी फेडरेशनचे प्रतिनिधी युयुत्सू आर्ते, संजीव अणेराव व प्रशांत परांजपे उपस्थित होते. फेडरेशनतर्फे केमिकल झोनला विरोध असल्याचे निवेदन आज (गुरुवार) त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. कोकणातील रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे परशुराम या औद्योगिक वसाहतीत रासायनिक उद्योगांमुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास झाल्याची उदाहरणे समोर असताना आता केंद्राच्या धोरणानुसार कोकणात २५ हजार हेक्टर्स क्षेत्रात ‘पेट्रोलियम, केमिकल, पेट्रोकेमिकल गुंतवणूक क्षेत्र’ अर्थात केमिकल झोन उभारला जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच नागपूरमधील कार्यक्रमात केली होती. त्याचे तीव्र पडसाद कोकणात उमटले आहेत. भाजपवगळता सर्वच पक्षांनी या झोनला तीव्र विरोध दर्शवला आहे. याबाबत पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चाही केली जाणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात फेडरेशनने म्हटले आहे की, कोकणात उद्योग उभारण्यास आमचा विरोध नाही. परंतु केमिकल झोन माथी मारला जाऊ नये, अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्यामुळे येथील फलोत्पादन, कृषी पर्यटन, मत्स्य व्यवसाय संपुष्टात येतील. येथे आय. टी. झोन, इंजिनिअरिंग क्षेत्र, प्रक्रिया उद्योग, वैद्यकीय उद्योग अशा प्रकारचे प्रदूषणविरहीत उद्योग, व्यवसाय उभारले जावेत. केमिकल झोन रद्द करावा. याबाबत आवश्यक तर कोकणवासीयांचे सार्वमत घ्यावे. कोकणातील सध्याच्या अतिप्रदूषण करणाऱ्या कारखान्यांवर बंदी आणावी, प्रदूषण नियंत्रण कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी, प्रदूषित नद्या, खाड्यांचे सर्वेक्षण करून त्यांना नवसंजीवनी देण्यासाठी तातडीचे उपाय करावेत. कोकणातील चारही जिल्हे पर्यटन हब म्हणून घोषित करावे. आय. टी. हब व पर्यटन हब म्हणून कोकणचे चारही जिल्हे घोषित करावेत, अशा मागण्याही करण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)गेल्या महिनाभरापासून कोकणात केमिकल झोनचा विषय तापत चालला आहे. अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयाची घोषणा केली अन कोकणातील चारही जिल्ह्यात त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. सर्वप्रथम केमिकल झोनविरोधात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी रणशिंग फुंकले. खासदार विनायक राऊत यांनी कोकणात हा झोन होऊ देणार नसल्याची घोषणा केली. त्यापाठोपाठ राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनीही कोकणात केमिकल झोनला कडाडून विरोध असल्याचे स्पष्ट केले. कॉँग्रेस, मनसेनेही विरोधाची भूमिका घेतली. त्यामुळे केमिकल झोन चांगलाच तापला आहे.