शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
2
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
3
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
4
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
5
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
6
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
7
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
8
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
9
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
10
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
11
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन
12
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
13
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
14
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
15
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
16
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
17
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
18
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
19
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
20
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान

केमिकल झोनविरोधात पर्यावरणवाद्यांचा एल्गार

By admin | Updated: September 24, 2015 23:56 IST

४0 संस्था एकवटल्या : सर्व राजकीय पक्षांना एकत्र आणणार

रत्नागिरी : कोकणातील प्रस्तावित केमिकल झोनला जिल्ह्यातील ४० पर्यावरण संस्थांनी एकत्रित विरोध दर्शवला आहे. कोकणवर लादलेला व कोकणवासीयांना विश्वासात न घेता घोषणा केलेला हा झोन म्हणजे जुलूमशाही आहे. त्यामुळे पर्यावरणाची प्रचंड हानी होईल. शासनाच्या या जुलूमशाहीविरोधात तीव्र आंदोलन उभारले जाईल. या झोनला विरोध करणाऱ्या राजकीय पक्षांनाही पर्यावरण संस्थांच्या फेडरेशनद्वारे एकत्र आणले जाणार असल्याची घोषणा पर्यावरणविषयी संस्था फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी आज गुरूवारी पत्रकार परिषदेत केली. यावेळी फेडरेशनचे प्रतिनिधी युयुत्सू आर्ते, संजीव अणेराव व प्रशांत परांजपे उपस्थित होते. फेडरेशनतर्फे केमिकल झोनला विरोध असल्याचे निवेदन आज (गुरुवार) त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. कोकणातील रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे परशुराम या औद्योगिक वसाहतीत रासायनिक उद्योगांमुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास झाल्याची उदाहरणे समोर असताना आता केंद्राच्या धोरणानुसार कोकणात २५ हजार हेक्टर्स क्षेत्रात ‘पेट्रोलियम, केमिकल, पेट्रोकेमिकल गुंतवणूक क्षेत्र’ अर्थात केमिकल झोन उभारला जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच नागपूरमधील कार्यक्रमात केली होती. त्याचे तीव्र पडसाद कोकणात उमटले आहेत. भाजपवगळता सर्वच पक्षांनी या झोनला तीव्र विरोध दर्शवला आहे. याबाबत पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चाही केली जाणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात फेडरेशनने म्हटले आहे की, कोकणात उद्योग उभारण्यास आमचा विरोध नाही. परंतु केमिकल झोन माथी मारला जाऊ नये, अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्यामुळे येथील फलोत्पादन, कृषी पर्यटन, मत्स्य व्यवसाय संपुष्टात येतील. येथे आय. टी. झोन, इंजिनिअरिंग क्षेत्र, प्रक्रिया उद्योग, वैद्यकीय उद्योग अशा प्रकारचे प्रदूषणविरहीत उद्योग, व्यवसाय उभारले जावेत. केमिकल झोन रद्द करावा. याबाबत आवश्यक तर कोकणवासीयांचे सार्वमत घ्यावे. कोकणातील सध्याच्या अतिप्रदूषण करणाऱ्या कारखान्यांवर बंदी आणावी, प्रदूषण नियंत्रण कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी, प्रदूषित नद्या, खाड्यांचे सर्वेक्षण करून त्यांना नवसंजीवनी देण्यासाठी तातडीचे उपाय करावेत. कोकणातील चारही जिल्हे पर्यटन हब म्हणून घोषित करावे. आय. टी. हब व पर्यटन हब म्हणून कोकणचे चारही जिल्हे घोषित करावेत, अशा मागण्याही करण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)गेल्या महिनाभरापासून कोकणात केमिकल झोनचा विषय तापत चालला आहे. अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयाची घोषणा केली अन कोकणातील चारही जिल्ह्यात त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. सर्वप्रथम केमिकल झोनविरोधात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी रणशिंग फुंकले. खासदार विनायक राऊत यांनी कोकणात हा झोन होऊ देणार नसल्याची घोषणा केली. त्यापाठोपाठ राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनीही कोकणात केमिकल झोनला कडाडून विरोध असल्याचे स्पष्ट केले. कॉँग्रेस, मनसेनेही विरोधाची भूमिका घेतली. त्यामुळे केमिकल झोन चांगलाच तापला आहे.