शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण रक्षण, कोरोनामुक्तीचे लक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:23 IST

‘पर्यावरण’ म्हणजे आपल्या आजूबाजूला असणारे वृक्ष, प्राणी, पक्षी, हवा, जमीन यासारख्या आपल्या जीवनावर परिणाम करणाऱ्या सर्व गोष्टी. पर्यावरणातून मानव ...

‘पर्यावरण’ म्हणजे आपल्या आजूबाजूला असणारे वृक्ष, प्राणी, पक्षी, हवा, जमीन यासारख्या आपल्या जीवनावर परिणाम करणाऱ्या सर्व गोष्टी. पर्यावरणातून मानव मूलभूत गरजांची पूर्तता करून जीवनावश्यक गोष्टी (फळे, फुले, अन्न, पाणी, लाकूड आणि इंधन इत्यादी) मिळवतो. तसे पाहिले तर मानव आणि पर्यावरण यांचा प्राचीन काळापासून संबंध आहे. प्राचीन काळापासून मानवाने प्लास्टिकसारख्या व इतर चैनीच्या वस्तू बनवून पर्यावरणाची हानी केली आहे. अमेरिकेतील शास्त्रज्ञांच्या मते कोरोनाचा हा विषाणू चिनी शास्त्रज्ञांनी ‘युहान’ येथील प्रयोगशाळेत तयार केला आहे. त्या शास्त्रज्ञांच्या मतानुसार हा विषाणू जर मानवनिर्मित असेल तर मात्र पृथ्वीवर मानवाप्रमाणे इतर प्राण्यांचा मृत्यू कोरोनाने झाल्याने पर्यावरणाची मोठी हानी या कोरोनाने सुद्धा झाली आहे. कोरोनामुळेच निसर्गप्रेमी असणाऱ्या बहुगुणा यांचाही मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आत्तापर्यंत महाराष्ट्रातील एक लाख, भारतामधील साडेतीन लाख तर जगामधील छत्त्तीस लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. या आकडेवारीनुसार जणू पृथ्वीवरील जीवसृष्टीच धोक्यात आली आहे.

पर्यावरणामध्ये मानव हाच सर्वात बुद्धिमान प्राणी आहे. असे असले तरीही पर्यावरणाची मोठी हानीसुद्धा मानवानेच केली आहे. यापूर्वी प्लेगसारख्या किंवा इतर अनेक महामारीने पर्यावरणाचा समतोल ढासळल्याचे मानवाने अनुभवले आहे. सध्या तर कोरोना महामारीने संपूर्ण विश्वातच थैमान घातले आहे. कोरोनाबाधित लोक ऑक्सिजन बेडअभावी आपले जीवन संपवताहेत. तसेच गंगा व यमुना नदीकिनारी फेकलेल्या कोरोनाबाधित प्रेतांमुळे पर्यावरणामध्ये दुर्गंधी पसरुन पर्यावरणाची हानी झाली आहे. त्याचप्रमाणे ग्लोबल वॉर्मिंग, मोठ्या प्रमाणात होत असलेली वृक्षतोड, विविध इंधनांचा अतिवापर, टॉक्सिक केमिकलने मरणारे कीटक व मधमाशा, समुद्रातील वाढत चाललेले प्रदूषण तसेच समुद्रातील नष्ट होणारी जैवविविधता या सर्व बाबींमुळे पर्यावरणाची मोठी हानी होत आहे.

आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने कोरोनामुक्ती करून पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करणे हे आपले आद्यकर्तव्य बनले आहे. पर्यावरण रक्षणासाठी आपण वृक्षलागवड करणे, औषधी वनस्पतींची लागवड करणे, जंगलांचे संरक्षण करणे, सौरऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देणे, ग्लोबल वॉर्मिंग याविषयी जनजागृती करणे, फुलपाखरांना मिल्कवीड प्लांट्स लागवड करणे, आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे समस्यांचे निराकरण करणे या व इतर अनेक बाबींचे अनुकरण करणे गरजेचे आहे. कोरोना टाळेबंदीमुळे अनेक जागतिक शहरांची प्रदूषण पातळी खाली आली आहे. कोरोनामुक्त महाराष्ट्र राज्य करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, टास्क फोर्स, डॉक्टर, परिचारिका, पोलीस, शिक्षक कोविड योद्ध्यांची भूमिका बजावत आहेत. हे सर्व पर्यावरणाचे जणू रक्षक आहेत. त्याप्रमाणे आपण पर्यावरणाचे रक्षण केल्यास या जागतिक पर्यावरण दिनी ते कोरोनामुक्तीचे लक्षण ठरू शकेल. संपूर्ण विश्वच कोरोनामुक्त होऊ शकेल.

- प्रा. हनुमंत लोखंडे, आडिवरे हायस्कूल, राजापूर