शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

पर्यावरण रक्षण, कोरोनामुक्तीचे लक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:23 IST

‘पर्यावरण’ म्हणजे आपल्या आजूबाजूला असणारे वृक्ष, प्राणी, पक्षी, हवा, जमीन यासारख्या आपल्या जीवनावर परिणाम करणाऱ्या सर्व गोष्टी. पर्यावरणातून मानव ...

‘पर्यावरण’ म्हणजे आपल्या आजूबाजूला असणारे वृक्ष, प्राणी, पक्षी, हवा, जमीन यासारख्या आपल्या जीवनावर परिणाम करणाऱ्या सर्व गोष्टी. पर्यावरणातून मानव मूलभूत गरजांची पूर्तता करून जीवनावश्यक गोष्टी (फळे, फुले, अन्न, पाणी, लाकूड आणि इंधन इत्यादी) मिळवतो. तसे पाहिले तर मानव आणि पर्यावरण यांचा प्राचीन काळापासून संबंध आहे. प्राचीन काळापासून मानवाने प्लास्टिकसारख्या व इतर चैनीच्या वस्तू बनवून पर्यावरणाची हानी केली आहे. अमेरिकेतील शास्त्रज्ञांच्या मते कोरोनाचा हा विषाणू चिनी शास्त्रज्ञांनी ‘युहान’ येथील प्रयोगशाळेत तयार केला आहे. त्या शास्त्रज्ञांच्या मतानुसार हा विषाणू जर मानवनिर्मित असेल तर मात्र पृथ्वीवर मानवाप्रमाणे इतर प्राण्यांचा मृत्यू कोरोनाने झाल्याने पर्यावरणाची मोठी हानी या कोरोनाने सुद्धा झाली आहे. कोरोनामुळेच निसर्गप्रेमी असणाऱ्या बहुगुणा यांचाही मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आत्तापर्यंत महाराष्ट्रातील एक लाख, भारतामधील साडेतीन लाख तर जगामधील छत्त्तीस लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. या आकडेवारीनुसार जणू पृथ्वीवरील जीवसृष्टीच धोक्यात आली आहे.

पर्यावरणामध्ये मानव हाच सर्वात बुद्धिमान प्राणी आहे. असे असले तरीही पर्यावरणाची मोठी हानीसुद्धा मानवानेच केली आहे. यापूर्वी प्लेगसारख्या किंवा इतर अनेक महामारीने पर्यावरणाचा समतोल ढासळल्याचे मानवाने अनुभवले आहे. सध्या तर कोरोना महामारीने संपूर्ण विश्वातच थैमान घातले आहे. कोरोनाबाधित लोक ऑक्सिजन बेडअभावी आपले जीवन संपवताहेत. तसेच गंगा व यमुना नदीकिनारी फेकलेल्या कोरोनाबाधित प्रेतांमुळे पर्यावरणामध्ये दुर्गंधी पसरुन पर्यावरणाची हानी झाली आहे. त्याचप्रमाणे ग्लोबल वॉर्मिंग, मोठ्या प्रमाणात होत असलेली वृक्षतोड, विविध इंधनांचा अतिवापर, टॉक्सिक केमिकलने मरणारे कीटक व मधमाशा, समुद्रातील वाढत चाललेले प्रदूषण तसेच समुद्रातील नष्ट होणारी जैवविविधता या सर्व बाबींमुळे पर्यावरणाची मोठी हानी होत आहे.

आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने कोरोनामुक्ती करून पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करणे हे आपले आद्यकर्तव्य बनले आहे. पर्यावरण रक्षणासाठी आपण वृक्षलागवड करणे, औषधी वनस्पतींची लागवड करणे, जंगलांचे संरक्षण करणे, सौरऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देणे, ग्लोबल वॉर्मिंग याविषयी जनजागृती करणे, फुलपाखरांना मिल्कवीड प्लांट्स लागवड करणे, आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे समस्यांचे निराकरण करणे या व इतर अनेक बाबींचे अनुकरण करणे गरजेचे आहे. कोरोना टाळेबंदीमुळे अनेक जागतिक शहरांची प्रदूषण पातळी खाली आली आहे. कोरोनामुक्त महाराष्ट्र राज्य करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, टास्क फोर्स, डॉक्टर, परिचारिका, पोलीस, शिक्षक कोविड योद्ध्यांची भूमिका बजावत आहेत. हे सर्व पर्यावरणाचे जणू रक्षक आहेत. त्याप्रमाणे आपण पर्यावरणाचे रक्षण केल्यास या जागतिक पर्यावरण दिनी ते कोरोनामुक्तीचे लक्षण ठरू शकेल. संपूर्ण विश्वच कोरोनामुक्त होऊ शकेल.

- प्रा. हनुमंत लोखंडे, आडिवरे हायस्कूल, राजापूर