शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान चाचणी करायला गेला...! आपल्याच मिसाईलपासून थोडक्यात वाचला, अणु केंद्राजवळ कोसळली
2
लाच घेताना व्हिडीओ बनवायला सुरुवात केली, मोबाईल हिसकावण्याच प्रयत्न; मुंबईतील ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल
3
Wife Crime: तिने पतीला घरातच पुरलं, पण एका चुकीमुळे सगळं उघडं पडलं; नालासोपारातील हत्येची Inside Story
4
हे आहेत ८८ वर्षांचे माजी IPS अधिकारी, रोज सकाळी स्वच्छतेसाठी उतरतात रस्त्यावर; Video पाहून तुम्हीही भावुक व्हाल...
5
'वृत्तपत्रातून पती-सासऱ्याची माफी मागा', पदाचा गैरवापर करणाऱ्या IPS पत्नीला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले
6
Crime News : पत्नी पतीसमोर प्रियकरासोबत शारीरिक संबंध ठेवायची; नाराज पतीने उचलले टोकाचे पाऊल
7
मुकेश अंबानींच्या रिलायन्सविरोधात सरकार सर्वोच्च न्यायालयात, जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
'देश चालवण्यासाठी भीक मागावी लागते', युनूस यांनी विमान अपघाताबाबत केलेल्या पोस्टवर लोक संतापले
9
Post Office च्या 'या' स्कीममध्ये मिळतंय सर्वाधिक व्याज; गॅरंटीड रिटर्न सोबत बनेल पैसाच पैसा
10
अरे देवा! ट्रेनमधून चोरीला गेल्या भाजपा नेत्याच्या आईच्या अस्थी; चोराला रंगेहाथ पकडलं अन्...
11
स्पेसमध्ये शारीरिक संबंध ठेवण्यास NASA नं मनाई का केलीय, अंतराळात प्रेग्नेंट झाल्यास काय होईल?
12
Kanwar Yatra Accident: गंगेचं पाणी घेऊन निघाले अन् मृत्यूने गाठले; भाविकांच्या जत्थ्यात घुसली कार; ४ जागीच ठार
13
बायकोच्या नावावर घर? फक्त प्रेम नाही, आता 'लाखोंचा फायदा' होणार! स्टँप ड्युटीपासून टॅक्सपर्यंत मोठी बचत फिक्स
14
"आम्ही शत्रू नाही..." CM देवेंद्र फडणवीस यांनी मानले उद्धव ठाकरे-शरद पवारांचे आभार, पण का?
15
Deep Amavasya 2025: दीप अमावस्येला मुलांना औक्षण करण्यामागे आहे 'ही' कृष्णकथा!
16
गुरुपुष्यामृतयोग: सद्गुरू सेवा शक्य नाही? १० मिनिटांत होणारे स्तोत्र म्हणा; पूर्ण पुण्य मिळवा
17
"आपणही विश्वास तोडला..."; रॅपिडो राइड दरम्यान महिलेनं स्वतःच रेकॉर्ड केला अपळा अॅक्सीडेंट - बघघा VIDEO
18
हॉलिवूडवर पसरली शोककळा, लोकप्रिय गायकाचं निधन; रणवीर सिंहनेही व्यक्त केली हळहळ
19
छोट्या दुकानदारांनी UPI QR कोड काढले, बंगळुरूतील प्रकारानंतर व्यापारी भयभीत, नेमकं काय घडले?
20
गुरुपुष्यामृतयोग म्हणजे काय? अशुभतेपासून रक्षण, पुण्य फलदायी लक्ष्मी पूजन; सुख-सुबत्ता वृद्धी

वातावरण हापूसला पोषक

By admin | Updated: November 23, 2015 00:23 IST

कमी पाऊस : प्रकाश संश्लेषणामुळे पानात अन्नरस तयार

शिवाजी गोरे -- दापोली -यावर्षी कमी पाऊस पडल्याने आंबा पिकाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. पाऊस लवकर गेल्यामुळे स्वच्छ व शुभ्र वातावरणामुळे आंब्यावर अधिक प्रकाशकिरणे पडली. प्रकाश संश्लेषण योग्य पद्धतीने झाल्यामुळे आंब्याच्या पानात अधिक अन्नरस तयार झाला असून यावर्षीच्या हंगामातील वातावरण हापूस आंब्याला पोषक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.दरवर्षीपेक्षा यावर्षी ४० टक्के कमी पाऊस झाला आहे. या कमी पावसाचा आंबा पिकावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही. याचे कारण म्हणजे जमिनीत अजूनही ओलावा आहे. आकाश पांढरे शुभ्र व हवामान पिकाला पोषक असल्याने आंब्याच्या पिकाला लागणाऱ्या अन्न घटकांची योग्यप्रकारे वाढ झाली आहे. दरवर्षी पावसाचे हंगामात ही वाढ होत असते. त्यामुळे वातावरण ढगाळ असते. तसेच पाऊस पडत असतो. त्यामुळे आंब्याच्या पिकाला लागणारे योग्य अन्नघटक पुरेशा प्रमाणात निर्माण होत नाहीत. त्यामुळे दरवर्षी आंब्याच्या पिकात घट होते. परंतु, यावर्षी योग्य प्रकाश संश्लेषण झाल्याने हापूसला ‘अच्छे दिन’ येण्याची शक्यता आहे.आंबा कलमांना पालवी फुटल्याने आता शेतकऱ्यांना पालवीची प्रतीक्षा आहे. येत्या दोन आठवड्यात कलमावर मोहर येण्याची शक्यता आहे. मोहर आल्यावर वातावरण कोणत्या पद्धतीचे राहील यावर बरंच काही अवलंबून आहे. मात्र, सध्यातरी पानामध्ये अन्नरस योग्य पद्धतीने निर्माण झाला आहे. कलमावरील पालवी मोहरास योग्य झाल्याने थंडीची सुरुवात होताच आंबा कलमांना मोहर येण्याची शक्यता आहे. परंतु, ही थंडी लवकर जायला हवी. अधिककाळ थंडीची लाट राहिल्यास आंबा कलमावरील मोहरावर विविध रोगांचा प्रादूर्भाव होईल. यामुळे आंबा हंगाम लांबण्याची शक्यता अधिक आहे.हवामानातील बदलाचा आंबा कलमावर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी सप्टेंबर-आॅक्टोबर महिन्यात शेतकऱ्याने पहिली फवारणी करणे गरजेचे होते. शेतकऱ्याने पहिली फवारणी योग्यवेळी केली असेल त्यानंतर त्याने दुसरी फवारणी करणे गरजेचे आहे. कारण मोहर आल्यानंतर तुडतुडे मोहरातील कोवळ्या फळातील रस शोषून घेतात. त्यामुळे मोहोर गळून पडतो. याशिवाय तुडतुडे मधासारखा चिकट पदार्थ शरीरावाटे बाहेर टाकतात. तो पानावर पडून नंतर काळी बुरशी वाढते. त्यामुळे झाडे व फळे काळी पडतात. आंबा पिकाला उत्तम निचऱ्याची जमीन लागते. थोड्याशा आम्लयुक्त जमिनीत या पिकाची वाढ चांगली होते. कोकणातील डोंगर उताराच्या व वरकस पडीक जमिनी या पिकास योग्य आहेत. भारी चिकणमातीच्या पाणी साठून राहणाऱ्या तसेच खार जमिनी या पिकाच्या लागवडीस योग्य नाहीत. मोहर येण्याच्या कालावधीत चांगले वातावरण असेल व पाऊस नसेल तर आंबा पिकाला याचा फायदा होणार आहे. थंडी उशिरा सुरु झाल्याने यावर्षी आंब्याचा हंगाम लांबण्याची शक्यता आहे.- जे. एम. घोडके,उपविभागीय कृषी अधिकारी, दापोली.