शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
3
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
4
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
5
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
6
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
7
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
8
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
9
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
10
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
11
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
12
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
13
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
14
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
15
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
16
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
17
जीएसटी 2.0चा धमाका : क्वीड vs एसप्रेसो vs अल्टो, देशातील सर्वात स्वस्तकार कोणती? 'या' कारवर मिळेल सर्वाधिक फायदा
18
Kieron Pollard: किरॉन पोलार्डचा वर्ल्ड रेकॉर्ड! 'असा' पराक्रम करणारा जगातील पहिलाच
19
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
20
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?

वातावरण हापूसला पोषक

By admin | Updated: November 23, 2015 00:23 IST

कमी पाऊस : प्रकाश संश्लेषणामुळे पानात अन्नरस तयार

शिवाजी गोरे -- दापोली -यावर्षी कमी पाऊस पडल्याने आंबा पिकाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. पाऊस लवकर गेल्यामुळे स्वच्छ व शुभ्र वातावरणामुळे आंब्यावर अधिक प्रकाशकिरणे पडली. प्रकाश संश्लेषण योग्य पद्धतीने झाल्यामुळे आंब्याच्या पानात अधिक अन्नरस तयार झाला असून यावर्षीच्या हंगामातील वातावरण हापूस आंब्याला पोषक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.दरवर्षीपेक्षा यावर्षी ४० टक्के कमी पाऊस झाला आहे. या कमी पावसाचा आंबा पिकावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही. याचे कारण म्हणजे जमिनीत अजूनही ओलावा आहे. आकाश पांढरे शुभ्र व हवामान पिकाला पोषक असल्याने आंब्याच्या पिकाला लागणाऱ्या अन्न घटकांची योग्यप्रकारे वाढ झाली आहे. दरवर्षी पावसाचे हंगामात ही वाढ होत असते. त्यामुळे वातावरण ढगाळ असते. तसेच पाऊस पडत असतो. त्यामुळे आंब्याच्या पिकाला लागणारे योग्य अन्नघटक पुरेशा प्रमाणात निर्माण होत नाहीत. त्यामुळे दरवर्षी आंब्याच्या पिकात घट होते. परंतु, यावर्षी योग्य प्रकाश संश्लेषण झाल्याने हापूसला ‘अच्छे दिन’ येण्याची शक्यता आहे.आंबा कलमांना पालवी फुटल्याने आता शेतकऱ्यांना पालवीची प्रतीक्षा आहे. येत्या दोन आठवड्यात कलमावर मोहर येण्याची शक्यता आहे. मोहर आल्यावर वातावरण कोणत्या पद्धतीचे राहील यावर बरंच काही अवलंबून आहे. मात्र, सध्यातरी पानामध्ये अन्नरस योग्य पद्धतीने निर्माण झाला आहे. कलमावरील पालवी मोहरास योग्य झाल्याने थंडीची सुरुवात होताच आंबा कलमांना मोहर येण्याची शक्यता आहे. परंतु, ही थंडी लवकर जायला हवी. अधिककाळ थंडीची लाट राहिल्यास आंबा कलमावरील मोहरावर विविध रोगांचा प्रादूर्भाव होईल. यामुळे आंबा हंगाम लांबण्याची शक्यता अधिक आहे.हवामानातील बदलाचा आंबा कलमावर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी सप्टेंबर-आॅक्टोबर महिन्यात शेतकऱ्याने पहिली फवारणी करणे गरजेचे होते. शेतकऱ्याने पहिली फवारणी योग्यवेळी केली असेल त्यानंतर त्याने दुसरी फवारणी करणे गरजेचे आहे. कारण मोहर आल्यानंतर तुडतुडे मोहरातील कोवळ्या फळातील रस शोषून घेतात. त्यामुळे मोहोर गळून पडतो. याशिवाय तुडतुडे मधासारखा चिकट पदार्थ शरीरावाटे बाहेर टाकतात. तो पानावर पडून नंतर काळी बुरशी वाढते. त्यामुळे झाडे व फळे काळी पडतात. आंबा पिकाला उत्तम निचऱ्याची जमीन लागते. थोड्याशा आम्लयुक्त जमिनीत या पिकाची वाढ चांगली होते. कोकणातील डोंगर उताराच्या व वरकस पडीक जमिनी या पिकास योग्य आहेत. भारी चिकणमातीच्या पाणी साठून राहणाऱ्या तसेच खार जमिनी या पिकाच्या लागवडीस योग्य नाहीत. मोहर येण्याच्या कालावधीत चांगले वातावरण असेल व पाऊस नसेल तर आंबा पिकाला याचा फायदा होणार आहे. थंडी उशिरा सुरु झाल्याने यावर्षी आंब्याचा हंगाम लांबण्याची शक्यता आहे.- जे. एम. घोडके,उपविभागीय कृषी अधिकारी, दापोली.