शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

आंबा हंगामाची अखेर

By admin | Updated: May 28, 2014 01:32 IST

नेपाळी गुरख्यांचा परतीचा प्रवास सुरु

उमेश पाटणकर ल्ल रत्नागिरी मुंबईकरांना हापूसची चव मनमुराद चाखता यावी, यासाठी थंडी, वारा, ऊन, जंगली श्वापद यांची तमा न बाळगता प्रसंगी स्वत:चे प्राणही पणाला लावणारे राखणदार आपल्या घराकडे परतू लागले आहेत. रत्नागिरीमधून त्यांच्या गावाजवळ जाण्यासाठी रेल्वेची सोय असली तरी कोल्हापूर मार्गे जाणे त्यांनी पसंत केलेय. प्रामाणिक कामगार म्हणून नावलौकीक असणारे नेपाळी गुरखे यावर्षीचा आंबा हंगाम संपल्याने नेपाळकडे परतू लागले आहेत. कोकणचा आर्थिक गाडा सांभाळणार्‍या हापूसचा हंगाम सर्वसाधारपणे नवरात्र - दिवाळी दरम्यान सुरु होतो. झाडांवर कैरी दिसू लागताच बागायतदारांची राखणीसाठी धावपळ सुरु होते. कारण माकडांचा याच काळात उपद्रव मोठ्या प्रमाणात सुरू होतो. अशावेळी त्यांच्या नजरेसमोर येतो तो गुरखा. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात नेपाळी नागरिक कोकणात मोठ्या प्रमाणात येतात. आंबा बागेच्या राखणीसाठी त्यांचा कल असला तरी बागायतदार जुन्या गुरख्यांनाच राखणीसाठी ठेवतात. नव्याने आलेले गुरखे राखणदारीचे काम मिळाले नाही म्हणून नाराज न होता अन्य कामेही करु लागले. १५ ते २० वर्षांपूर्वी केवळ बागायतींची राखणी जीवापाड करणारे गुरखे गेल्या चार-पाच वर्षांत औषध फवारणीसह आंब्याची काढणीही करु लागले. उंच झाडांवर शेंड्यापर्यंत जाण्यास घाबरणार्‍या स्थानिक कामगाराची जागा गुरख्यांनी कधी घेतली हे स्थानिकांना कळलेच नाही. या नेपाळी युवकांनी आपल्या कामाची प्रगती यापुढेही नेत आंबा हाताळणी, पेट्या भरणे, वाहतूक करण्यासाठी चारचाकी गाड्या चालवण्यापर्यंत मजल मारली आहे. येत्या काही दिवसांत पावसाला सुरुवात होईल. नेपाळमध्येही जूनच्या मध्यापर्यंत पाऊस सुरु होत असल्याने तत्पूर्वी गावाकडे पोहोचून शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण करण्यासाठी गुरखे माघारी निघाले आहेत. आज रहाटाघर बसस्थानकातून किमान १०० गुरखे कोल्हापूरकडे रवाना झाले, तर रेल्वेस्टेशनकडून १५० पेक्षा जास्त गुरखे दिल्लीकडे गेले.