शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

आंबा हंगामाची अखेर

By admin | Updated: May 28, 2014 01:32 IST

नेपाळी गुरख्यांचा परतीचा प्रवास सुरु

उमेश पाटणकर ल्ल रत्नागिरी मुंबईकरांना हापूसची चव मनमुराद चाखता यावी, यासाठी थंडी, वारा, ऊन, जंगली श्वापद यांची तमा न बाळगता प्रसंगी स्वत:चे प्राणही पणाला लावणारे राखणदार आपल्या घराकडे परतू लागले आहेत. रत्नागिरीमधून त्यांच्या गावाजवळ जाण्यासाठी रेल्वेची सोय असली तरी कोल्हापूर मार्गे जाणे त्यांनी पसंत केलेय. प्रामाणिक कामगार म्हणून नावलौकीक असणारे नेपाळी गुरखे यावर्षीचा आंबा हंगाम संपल्याने नेपाळकडे परतू लागले आहेत. कोकणचा आर्थिक गाडा सांभाळणार्‍या हापूसचा हंगाम सर्वसाधारपणे नवरात्र - दिवाळी दरम्यान सुरु होतो. झाडांवर कैरी दिसू लागताच बागायतदारांची राखणीसाठी धावपळ सुरु होते. कारण माकडांचा याच काळात उपद्रव मोठ्या प्रमाणात सुरू होतो. अशावेळी त्यांच्या नजरेसमोर येतो तो गुरखा. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात नेपाळी नागरिक कोकणात मोठ्या प्रमाणात येतात. आंबा बागेच्या राखणीसाठी त्यांचा कल असला तरी बागायतदार जुन्या गुरख्यांनाच राखणीसाठी ठेवतात. नव्याने आलेले गुरखे राखणदारीचे काम मिळाले नाही म्हणून नाराज न होता अन्य कामेही करु लागले. १५ ते २० वर्षांपूर्वी केवळ बागायतींची राखणी जीवापाड करणारे गुरखे गेल्या चार-पाच वर्षांत औषध फवारणीसह आंब्याची काढणीही करु लागले. उंच झाडांवर शेंड्यापर्यंत जाण्यास घाबरणार्‍या स्थानिक कामगाराची जागा गुरख्यांनी कधी घेतली हे स्थानिकांना कळलेच नाही. या नेपाळी युवकांनी आपल्या कामाची प्रगती यापुढेही नेत आंबा हाताळणी, पेट्या भरणे, वाहतूक करण्यासाठी चारचाकी गाड्या चालवण्यापर्यंत मजल मारली आहे. येत्या काही दिवसांत पावसाला सुरुवात होईल. नेपाळमध्येही जूनच्या मध्यापर्यंत पाऊस सुरु होत असल्याने तत्पूर्वी गावाकडे पोहोचून शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण करण्यासाठी गुरखे माघारी निघाले आहेत. आज रहाटाघर बसस्थानकातून किमान १०० गुरखे कोल्हापूरकडे रवाना झाले, तर रेल्वेस्टेशनकडून १५० पेक्षा जास्त गुरखे दिल्लीकडे गेले.