शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

यंदा जुलैअखेर १२८२ मिलिमीटर पाऊस अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:29 IST

रत्नागिरी : जुलैअखेर जिल्ह्यामध्ये सरासरी २६३२.८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षीपेक्षा यावर्षी जुलै अखेरपर्यंत सरासरी १,२८२ मिलिमीटर जास्त ...

रत्नागिरी : जुलैअखेर जिल्ह्यामध्ये सरासरी २६३२.८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षीपेक्षा यावर्षी जुलै अखेरपर्यंत सरासरी १,२८२ मिलिमीटर जास्त पाऊस झाला आहे. सध्या जिल्ह्यात ऊन-पावसाचा खेळ सुरू झाला आहे. अतिवृष्टी झालेल्या तालुक्‍यांमधील प्राथमिक अंदाजानुसार, १७८७ हेक्‍टर शेतीक्षेत्राचे नुकसान झाले आहे. या नुकसान झालेल्या भागातील ७० टक्के पंचनामे पूर्ण झाले असून, कृषी विभागाकडून पंचनामे करण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

गेला आठवडाभर पावसाने विश्रांती घेण्यास सुरूवात केली आहे. हवामान खात्याने दि. २९ जुलै ते १ ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला होता. शनिवारी सकाळी पावसाला जोरदार सुरूवात झाल्याने पाऊस दिवसभर जोर धरणार, असे वाटत होते. मात्र, थोड्याच वेळात पावसाने दडी मारली. आभाळ मात्र अंधारून आल्याने दुपारच्या वेळात जोरदार पाऊस पडेल, असे वाटत होते. मात्र, सायंकाळी उन्हाची किरणे दिसू लागली.

गेला आठवडाभर पावसाने विश्रांती घेतली आहे. शनिवारी १ जून ते जुलैअखेर जिल्ह्यात २६३२.८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यंदा जुलैअखेर १,२८२ मिलिमीटर अधिक पाऊस झाला आहे.

ऑगस्ट महिन्यात काही प्रमाणात पावसाची गरज असते. त्यामुळे आता ऑगस्टमध्ये पावसाचे सातत्य कसे रहाणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, चिपळूण आणि खेड या दोन तालुक्यांमधील पूरपरिस्थितीनंतर प्रशासन आणि जिल्ह्यातील तसेच अन्य जिल्ह्यांतील सुमारे ५५ सामाजिक संस्था आणि कार्यकर्ते यांच्या सहकार्याने मदतकार्य सुरू आहे.

अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या ६७ गावांमधील एकूण १,३०२ कुटुंबांना १३०.२० क्विंटल गहू व तांदळाचे वाटप करण्यात आले आहे. तसेच एकूण २९ गावांमधील २१७ कुटुंबांना १०८५ लीटर केरोसीनचे वाटप करण्यात आले आहे.