शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

यंदा जुलैअखेर १२८२ मिलिमीटर पाऊस अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:29 IST

रत्नागिरी : जुलैअखेर जिल्ह्यामध्ये सरासरी २६३२.८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षीपेक्षा यावर्षी जुलै अखेरपर्यंत सरासरी १,२८२ मिलिमीटर जास्त ...

रत्नागिरी : जुलैअखेर जिल्ह्यामध्ये सरासरी २६३२.८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षीपेक्षा यावर्षी जुलै अखेरपर्यंत सरासरी १,२८२ मिलिमीटर जास्त पाऊस झाला आहे. सध्या जिल्ह्यात ऊन-पावसाचा खेळ सुरू झाला आहे. अतिवृष्टी झालेल्या तालुक्‍यांमधील प्राथमिक अंदाजानुसार, १७८७ हेक्‍टर शेतीक्षेत्राचे नुकसान झाले आहे. या नुकसान झालेल्या भागातील ७० टक्के पंचनामे पूर्ण झाले असून, कृषी विभागाकडून पंचनामे करण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

गेला आठवडाभर पावसाने विश्रांती घेण्यास सुरूवात केली आहे. हवामान खात्याने दि. २९ जुलै ते १ ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला होता. शनिवारी सकाळी पावसाला जोरदार सुरूवात झाल्याने पाऊस दिवसभर जोर धरणार, असे वाटत होते. मात्र, थोड्याच वेळात पावसाने दडी मारली. आभाळ मात्र अंधारून आल्याने दुपारच्या वेळात जोरदार पाऊस पडेल, असे वाटत होते. मात्र, सायंकाळी उन्हाची किरणे दिसू लागली.

गेला आठवडाभर पावसाने विश्रांती घेतली आहे. शनिवारी १ जून ते जुलैअखेर जिल्ह्यात २६३२.८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यंदा जुलैअखेर १,२८२ मिलिमीटर अधिक पाऊस झाला आहे.

ऑगस्ट महिन्यात काही प्रमाणात पावसाची गरज असते. त्यामुळे आता ऑगस्टमध्ये पावसाचे सातत्य कसे रहाणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, चिपळूण आणि खेड या दोन तालुक्यांमधील पूरपरिस्थितीनंतर प्रशासन आणि जिल्ह्यातील तसेच अन्य जिल्ह्यांतील सुमारे ५५ सामाजिक संस्था आणि कार्यकर्ते यांच्या सहकार्याने मदतकार्य सुरू आहे.

अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या ६७ गावांमधील एकूण १,३०२ कुटुंबांना १३०.२० क्विंटल गहू व तांदळाचे वाटप करण्यात आले आहे. तसेच एकूण २९ गावांमधील २१७ कुटुंबांना १०८५ लीटर केरोसीनचे वाटप करण्यात आले आहे.