शहरं
Join us  
Trending Stories
1
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
2
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
3
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
5
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
6
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
7
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
8
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
9
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
10
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
11
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
12
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
13
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
14
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
15
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
16
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
17
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
18
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
19
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
20
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत

यंदा जुलैअखेर १२८२ मिलिमीटर पाऊस अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:29 IST

रत्नागिरी : जुलैअखेर जिल्ह्यामध्ये सरासरी २६३२.८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षीपेक्षा यावर्षी जुलै अखेरपर्यंत सरासरी १,२८२ मिलिमीटर जास्त ...

रत्नागिरी : जुलैअखेर जिल्ह्यामध्ये सरासरी २६३२.८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षीपेक्षा यावर्षी जुलै अखेरपर्यंत सरासरी १,२८२ मिलिमीटर जास्त पाऊस झाला आहे. सध्या जिल्ह्यात ऊन-पावसाचा खेळ सुरू झाला आहे. अतिवृष्टी झालेल्या तालुक्‍यांमधील प्राथमिक अंदाजानुसार, १७८७ हेक्‍टर शेतीक्षेत्राचे नुकसान झाले आहे. या नुकसान झालेल्या भागातील ७० टक्के पंचनामे पूर्ण झाले असून, कृषी विभागाकडून पंचनामे करण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

गेला आठवडाभर पावसाने विश्रांती घेण्यास सुरूवात केली आहे. हवामान खात्याने दि. २९ जुलै ते १ ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला होता. शनिवारी सकाळी पावसाला जोरदार सुरूवात झाल्याने पाऊस दिवसभर जोर धरणार, असे वाटत होते. मात्र, थोड्याच वेळात पावसाने दडी मारली. आभाळ मात्र अंधारून आल्याने दुपारच्या वेळात जोरदार पाऊस पडेल, असे वाटत होते. मात्र, सायंकाळी उन्हाची किरणे दिसू लागली.

गेला आठवडाभर पावसाने विश्रांती घेतली आहे. शनिवारी १ जून ते जुलैअखेर जिल्ह्यात २६३२.८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यंदा जुलैअखेर १,२८२ मिलिमीटर अधिक पाऊस झाला आहे.

ऑगस्ट महिन्यात काही प्रमाणात पावसाची गरज असते. त्यामुळे आता ऑगस्टमध्ये पावसाचे सातत्य कसे रहाणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, चिपळूण आणि खेड या दोन तालुक्यांमधील पूरपरिस्थितीनंतर प्रशासन आणि जिल्ह्यातील तसेच अन्य जिल्ह्यांतील सुमारे ५५ सामाजिक संस्था आणि कार्यकर्ते यांच्या सहकार्याने मदतकार्य सुरू आहे.

अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या ६७ गावांमधील एकूण १,३०२ कुटुंबांना १३०.२० क्विंटल गहू व तांदळाचे वाटप करण्यात आले आहे. तसेच एकूण २९ गावांमधील २१७ कुटुंबांना १०८५ लीटर केरोसीनचे वाटप करण्यात आले आहे.