शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
4
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
5
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
6
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
7
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
8
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
9
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
10
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
11
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
12
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
13
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
14
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
15
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
16
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
17
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
18
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
19
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
20
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 

रत्नागिरीत अखेर अठरा रस्त्यांची कामे सुरु

By admin | Updated: February 10, 2015 23:50 IST

मुहूर्त सापडला : शहरातील रस्त्यांची स्थिती सुधारणार

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील १८ रस्त्यांच्या डांबरीकरण कामाचा प्रातिनिधीक आरंभ आज (मंगळवार) सकाळी मजगाव रोड आयसीआयसीआय बॅँकेसमोरील कॉर्नरवर लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत झाला. त्यामुळे येत्या दोन ते तीन महिन्यांच्या काळात रत्नागिरीतील रस्ते गुळगुुळीत होणार आहेत. या कार्यक्रमाला नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, उपनगराध्यक्ष संजय साळवी, सेनेचे तालुकाप्रमुख बंड्या साळवी, नगरसेवक दत्तात्रय साळवी, नगरसेविका शीतल पावसकर, तन्वीर जमादार, सलील डाफळे, पल्लवी पाटील, शिल्पा सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते. गेले काही दिवस रत्नागिरी शहरातील रस्ते खड्ड्यात आकंठ बुडालेले होते. मात्र, आता ही रस्त्याची कामे सुरू झाल्याने रस्त्यांची स्थिती सुधारणार आहे.ठेकेदार व रत्नागिरी नगरपरिषद यांच्यातील वादामुळे गेल्या वर्षभरापासून रखडलेले २१ रस्त्यांचे डांबरीकरण आजपासून सुरू झाले आहे. यामध्ये दांडा फिशरिज ते साळवी स्टॉप या मुख्य रस्त्याचे ७ कोटी ९० लाख रुपये खर्चाचे काम होणार आहे. मारुती मंदिर ते नाचणादेवी मंदिरापर्यंतच्या रस्ता कामासाठी ४ कोटी, साळवी स्टॉप ते नाचणे रस्ता डांबरीकरणासाठी २ कोटी तर मारुती मंदिर ते किस्मत बेकरीपर्यंतच्या रस्त्यासाठी दीड कोटी रुपये खर्च येणार आहे. तसेच शहरातील आणखी चार रस्ते मिळून आठ रस्त्यांचे डांबरीकरण येत्या दीड महिन्यात होणे अपेक्षित आहे. उर्वरित कामे ही पावसाळ्याआधी करायची आहेत. (प्रतिनिधी)पंधरा कोटींचा निधी प्राप्तया १८ रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी १५ कोटी ३८ लाख रुपये खर्च येणार आहे. त्यातील १५ कोटींचा निधी शासनाकडून आल्याची माहिती नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी दिली. ज्या अन्य रस्त्यांचे डांबरीकरण होणार आहे, त्यात टिळकआळी, पोलीस स्टेशनसमोरील रस्ता, निवखोल घाटी रस्ता, आय. टी. आय.जवळील रस्ता, आझाद कॉलनी ते तांबटआळी, कारागृह-मच्छी मार्केट ते चर्चघाटी, एकता मार्ग ते आशियाना अपार्टमेंटपर्यंत व तेथून दिनकर पवार यांच्या घरापर्यंत, अभ्युदयनगरमध्ये ढेकणे कंपौडपर्यंत या सर्व रस्त्यांचा समावेश आहे.