शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचारी अधिवेशनात; विद्यार्थी स्थानकात

By admin | Updated: February 28, 2016 00:52 IST

एस. टी. महामंडळ : चिमुकल्या विद्यार्थ्यांचे हाल

रत्नागिरी : शहरी बस वाहतुकीचे काही वाहक, चालक नागपूर येथे अधिवेशनासाठी गेल्याने आज अचानक काही शहरी फेऱ्या रद्द करण्यात आल्या, तर काही उशिराने सुटल्या. यामुळे शहरी बसस्थानकात परिक्षार्थी आणि नागरिकांना बराच वेळ बसची प्रतीक्षा करत ताटकळत उभे राहावे लागले. यात विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. सध्या बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू आहे. त्यातच आज शनिवारचा आठवडा बाजार असल्याने शहराच्या आजूबाजूच्या भागातून आलेल्या नागरिकांचीही परत जाण्यासाठी सकाळपासूनच शहरी बसस्थानकावर गर्दी मोठ्या प्रमाणावर होत होती. शनिवारी बहुतांशी शाळाही लवकर सुटतात. दुपारी पेपर सुटल्यानंतर परिक्षार्थी विद्यार्थ्यांचीही एकच गर्दी या स्थानकावर होती. मात्र, बराच वेळ झाला तरी नेहमीच्या फेऱ्या सुटल्या नव्हत्या. याबाबत कुणाही प्रवाशाला कसलीही माहिती नव्हती. अखेर काही प्रवाशांनी शहर आगार व्यवस्थापकांकडे याबाबत चौकशी केली असता, त्याठिकाणी लावलेला सूचनेचा फलक दिसला. त्यावर काही अपरिहार्य कारणामुळे काही फेऱ्या रद्द होतील व काही फेऱ्या उशिरा सुटतील, असे लिहिलेले होते. त्याचे कारण काही प्रवाशांनी विचारले. मात्र, अधिकृतरित्या प्रवाशांना काहीही सांगण्यात आले नाही. मात्र, याबाबत अधिक माहिती घेतल्यानंतर नागपूर येथे होणाऱ्या अधिवेशनासाठी रत्नागिरीतील काही चालक व वाहक गेल्याचे कळले. अधिवेशनाला काही चालक-वाहक गेल्याने उर्वरित चालकांवर कामाचा अतिरिक्त ताण आल्याने आज शहरी वाहतूक प्रशासनाने काही फेऱ्या रद्द केल्या तर काही उशिरा सोडल्या. त्यामुळे शहर परिसरातील विविध भागात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह इतर प्रवाशांना तीन ते चार तास रखडावे लागले. सुरूवातीला काही प्रवाशांनी चालक-वाहकांनी पुन्हा अचानक संप केला की काय, अशी शंका घेतली. मात्र, काही कालावधीनंतर चालक व वाहकांचे अधिवेशनाला जाण्याचे वृत्त कळले. साहजिकच ऐन परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांसह इतर प्रवाशांची गैरसोय करून कुठलीही पूर्वसूचना न देता अधिवेशनाला जाणाऱ्या चालक व वाहकांबद्दल प्रवासीवर्गातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती. (प्रतिनिधी) पुन्हा मध्यवर्ती बसस्थानक : एस. टी.चा दोन दगडांवर पाय पूर्वी रहाटाघर येथून लांब पल्ल्याच्या गाड्या सुटत होत्या. मात्र, त्या अडचणीच्या असल्याने प्रवासीवर्गाकडून मध्यवर्ती स्थानकातून त्या सोडण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली होती. ही मागणी मान्य करून शनिवारपासून या सर्व गाड्या रहाटाघर येथून सोडण्यात येत असल्याचे स्थानकप्रमुखांकडून सांगण्यात आले. मात्र, कोल्हापूरला जाणाऱ्या गाड्या रहाटाघर येथूनच सुटणार आहेत.