शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

कर्मचारी अधिवेशनात; विद्यार्थी स्थानकात

By admin | Updated: February 28, 2016 00:52 IST

एस. टी. महामंडळ : चिमुकल्या विद्यार्थ्यांचे हाल

रत्नागिरी : शहरी बस वाहतुकीचे काही वाहक, चालक नागपूर येथे अधिवेशनासाठी गेल्याने आज अचानक काही शहरी फेऱ्या रद्द करण्यात आल्या, तर काही उशिराने सुटल्या. यामुळे शहरी बसस्थानकात परिक्षार्थी आणि नागरिकांना बराच वेळ बसची प्रतीक्षा करत ताटकळत उभे राहावे लागले. यात विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. सध्या बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू आहे. त्यातच आज शनिवारचा आठवडा बाजार असल्याने शहराच्या आजूबाजूच्या भागातून आलेल्या नागरिकांचीही परत जाण्यासाठी सकाळपासूनच शहरी बसस्थानकावर गर्दी मोठ्या प्रमाणावर होत होती. शनिवारी बहुतांशी शाळाही लवकर सुटतात. दुपारी पेपर सुटल्यानंतर परिक्षार्थी विद्यार्थ्यांचीही एकच गर्दी या स्थानकावर होती. मात्र, बराच वेळ झाला तरी नेहमीच्या फेऱ्या सुटल्या नव्हत्या. याबाबत कुणाही प्रवाशाला कसलीही माहिती नव्हती. अखेर काही प्रवाशांनी शहर आगार व्यवस्थापकांकडे याबाबत चौकशी केली असता, त्याठिकाणी लावलेला सूचनेचा फलक दिसला. त्यावर काही अपरिहार्य कारणामुळे काही फेऱ्या रद्द होतील व काही फेऱ्या उशिरा सुटतील, असे लिहिलेले होते. त्याचे कारण काही प्रवाशांनी विचारले. मात्र, अधिकृतरित्या प्रवाशांना काहीही सांगण्यात आले नाही. मात्र, याबाबत अधिक माहिती घेतल्यानंतर नागपूर येथे होणाऱ्या अधिवेशनासाठी रत्नागिरीतील काही चालक व वाहक गेल्याचे कळले. अधिवेशनाला काही चालक-वाहक गेल्याने उर्वरित चालकांवर कामाचा अतिरिक्त ताण आल्याने आज शहरी वाहतूक प्रशासनाने काही फेऱ्या रद्द केल्या तर काही उशिरा सोडल्या. त्यामुळे शहर परिसरातील विविध भागात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह इतर प्रवाशांना तीन ते चार तास रखडावे लागले. सुरूवातीला काही प्रवाशांनी चालक-वाहकांनी पुन्हा अचानक संप केला की काय, अशी शंका घेतली. मात्र, काही कालावधीनंतर चालक व वाहकांचे अधिवेशनाला जाण्याचे वृत्त कळले. साहजिकच ऐन परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांसह इतर प्रवाशांची गैरसोय करून कुठलीही पूर्वसूचना न देता अधिवेशनाला जाणाऱ्या चालक व वाहकांबद्दल प्रवासीवर्गातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती. (प्रतिनिधी) पुन्हा मध्यवर्ती बसस्थानक : एस. टी.चा दोन दगडांवर पाय पूर्वी रहाटाघर येथून लांब पल्ल्याच्या गाड्या सुटत होत्या. मात्र, त्या अडचणीच्या असल्याने प्रवासीवर्गाकडून मध्यवर्ती स्थानकातून त्या सोडण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली होती. ही मागणी मान्य करून शनिवारपासून या सर्व गाड्या रहाटाघर येथून सोडण्यात येत असल्याचे स्थानकप्रमुखांकडून सांगण्यात आले. मात्र, कोल्हापूरला जाणाऱ्या गाड्या रहाटाघर येथूनच सुटणार आहेत.