शहरं
Join us  
Trending Stories
1
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
2
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
3
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
4
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
5
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
6
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
7
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
8
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
9
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
10
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
11
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक
12
ई-बस प्रवाशांसाठी STकडून मासिक, त्रैमासिक पास योजना सुरू; प्रताप सरनाईकांनी दिली माहिती
13
महिलांसाठी आनंदाची बातमी! 'या' राज्यात आता १२ दिवसांची मासिक पाळी रजा मिळणार, सरकारची घोषणा
14
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
15
Nobel Prize : साहित्यातील नोबेल पुरस्काराची घोषणा, हंगेरीचे लास्झलो क्रास्नाहोरकाई ठरले मानकरी
16
Astro Tips: १० ऑक्टोबरला रात्री ठीक १० वाजून १० मिनिटांनी इच्छापूर्तीसाठी करा 'हे' काम!
17
बाजाराचं जोरदार कमबॅक! एका दिवसात गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फायदा, 'हे' शेअर्स होते टॉप गेनर्स
18
Smriti Mandhana World Record: 'वनडे क्वीन' स्मृतीची विश्व विक्रमाला गवसणी; २८ वर्षांनी असं घडलं
19
IAS Ambika Raina : कमाल! स्वित्झर्लंडची लाखोंची नोकरी सोडून स्वप्न केलं साकार; दोनदा अपयश, तिसऱ्यांदा झाली IAS
20
"कंटेनर वेगाने मागे आला असता तर...", अपघातातून थोडक्यात बचावली रुपाली भोसले, सांगितला भयानक प्रसंग

भीती वाढवण्यापेक्षा आरटीपीसीआरवर भर द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:31 IST

रत्नागिरी : ज्या ॲण्टिजेन चाचणीमधून सर्वाधिक चुकीचा रिझल्ट येण्याची शक्यता आहे, त्या चाचण्या जिल्ह्यात सरसकट करण्यापेक्षा खात्रीशीर असलेल्या आरटीपीसीआर ...

रत्नागिरी : ज्या ॲण्टिजेन चाचणीमधून सर्वाधिक चुकीचा रिझल्ट येण्याची शक्यता आहे, त्या चाचण्या जिल्ह्यात सरसकट करण्यापेक्षा खात्रीशीर असलेल्या आरटीपीसीआर चाचण्याच केल्या जाव्यात. सरसकट ॲण्टिजेन चाचण्यांमुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येत असून, सर्वसामान्यांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आरटीपीसीआरवर भर द्यावा, जेणेकरून आरोग्य यंत्रणेवरील ताण आणि जनतेतील भीती कमी होईल, अशी सूचना माजी खासदार नीलेश राणे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांत अचानक रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. यात सर्वाधिक रुग्णसंख्या ॲण्टिजेन चाचणीमधील असल्याचे दिसून आले आहे. मुळात कोरोनासाठी तीन प्रकारच्या चाचण्या केल्या जातात. एक आरटीपीसीआर, दुसरी ॲण्टिजेन आणि तिसरी ॲण्टिबॉडी टेस्ट. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) नेही सुरुवातीपासून कोविडच्या चाचण्यांसंबंधी नियम बनवून दिलेत. आरटीपीसीआर टेस्ट ही कोरोनाचा संसर्ग झालाय की नाही, हे खात्रीशीर पद्धतीने सांगू शकते. आयसीएमआरने या चाचणीला टेस्टिंगचा गोल्ड स्टँडर्ड असे म्हटले आहे. शरीरात कोरोनाचा संसर्ग कमी प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात असला, तरी तो या चाचणीमार्फत कळू शकतो. रत्नागिरी जिल्ह्यात आरटीपीसीआरसाठीची करोडो रुपये खर्चून उभारलेली यंत्रणा असताना ती यंत्रणा पूर्ण क्षमतेने वापरावी, असे नीलेश राणे यांनी सांगितले.

याउलट रॅपिड ॲण्टिजेन या चाचणीचे आहे. या चाचणीमधून फॉल्स निगेटिव्ह म्हणजे चुकीचा नकारात्मक रिझल्ट येण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे ॲण्टिजेनमध्ये निगेटिव्ह आलेल्या व्यक्तीची आरटीपीसीआर चाचणीसुद्धा करवून घ्यावी, असे खुद्द आयसीएमआरने सांगितले आहे. असे असताना रत्नागिरी जिल्ह्यात सरसकट ॲण्टिजेन चाचण्या होत आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात आरोग्य विभागाकडून शुक्रवारी सायंकाळी आलेल्या अहवालात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५१३ एवढी होती. त्यात ३४४ एवढे रुग्ण ॲण्टिजेन टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आले. याशिवाय, निगेटिव्ह रुग्णांची संख्या खूप आहे. या ॲण्टिजेन चाचणीमुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण निर्माण झाला असून जिल्हा प्रशासनाने योग्य नियोजन करून आरटीपीसीआर चाचण्या वाढवल्या पाहिजे. त्यामुळे ताण कमी होईल आणि लोकांमधील भीतीही कमी होईल, असे त्यांनी आपल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.