शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर वीज अटकाव यंत्रणा

By admin | Updated: July 16, 2017 18:13 IST

तीन इमारतींसह ११० ते २०० मीटरचा परिसर संभाव्य धोक्यांपासून सुरक्षित

आॅनलाईन लोकमत/शोभना कांबळेरत्नागिरी, दि. १५ :जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांच्या संकल्पनेतून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जुन्या इमारतीवर अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित वीज अटकाव यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रमुख तीन इमारतींसह ११० ते २०० मीटरचा परिसर विजेच्या संभाव्य धोक्यांपासून सुरक्षित झाला आहे. जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी ई - आॅफिसची संकल्पना सत्यात उतरवली आहे. जनतेच्या कामांचा जलदगतीने निपटारा होण्यासाठी गतिमान प्रशासन करण्याकडे त्यांची वाटचाल सुरू आहे. यासाठी काही दिवसांपूर्वीच अद्ययावत तक्रार निवारण केंद्राची निर्मितीही करण्यात आली आहे. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित यंत्रणा राबवली जात आहे. ही यंत्रणा सुरक्षित राहणे तितकेच गरजेचे आहे.

कोकणात पावसाळापूर्व तसेच पावसाळा संपतासंपता विजेच्या गडगडाटासह जोरदार पाऊस पडतो. यावेळी संगणक, दूरध्वनी तसेच इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, विजेवर आधारित महत्त्वाच्या यंत्रणा यांना धोका होण्याची शक्यताही दिवसेंदिवस वाढू लागली आहे. अनेक ठिकाणी वीज पडण्याबरोबरच लाखोंची मालमत्ता, उपकरणे यांनाही मोठ्या प्रमाणावर हानी पोहोचत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यान्वित असलेल्या विविध वातानुकूलीत यंत्रणा, संगणक, प्रिंटर, सर्व्हर यांचे विजेपासून संरक्षण व्हावे, हा यामागील हेतू आहे. लाखो रूपयांच्या मालमत्तेसह जिल्हाधिकारी कार्यालयाबरोबरच अन्य कार्यालयांत येणाऱ्या असंख्य नागरिकांचे संरक्षण व्हावे, या उद्देशाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत ही वीज अटकाव यंत्रणा  कार्यान्वित करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जुन्या इमारतीवर १८ फूट उंचीच्या रॉडवर हे परदेशी बनावटीचे ‘ईएसई एअर टर्मिनल’ बसवण्यात आले आहे. या टर्मिनलपासून जमिनीपर्यंत तांब्याच्या तीन वाहिनींद्वारे ‘अर्थिंग सिस्टीम’ टाकण्यात आली असून, यासोबतच अर्थिंगची पट्टी टाकून हे बांधकामही सुरक्षित करण्यात आले आहे.

वीज कडकडाटावेळी २०० मीटर परिसराचे त्यापासून संरक्षण होणार असून, धोक्याच्यावेळी अगदी मोठ्या क्षमतेच्या विजेचा लोळ खेचून तो भूमिगत करण्याचे कार्य ही यंत्रणा करणार आहे. परिणामी विविध यंत्रसामुग्रींसह जीवितहानीही टळणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात बसवण्यात आलेल्या या उपकरणाचा फायदा २०० मीटर परिसरालाही होणार आहे.