शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर वीज अटकाव यंत्रणा

By admin | Updated: July 16, 2017 18:13 IST

तीन इमारतींसह ११० ते २०० मीटरचा परिसर संभाव्य धोक्यांपासून सुरक्षित

आॅनलाईन लोकमत/शोभना कांबळेरत्नागिरी, दि. १५ :जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांच्या संकल्पनेतून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जुन्या इमारतीवर अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित वीज अटकाव यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रमुख तीन इमारतींसह ११० ते २०० मीटरचा परिसर विजेच्या संभाव्य धोक्यांपासून सुरक्षित झाला आहे. जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी ई - आॅफिसची संकल्पना सत्यात उतरवली आहे. जनतेच्या कामांचा जलदगतीने निपटारा होण्यासाठी गतिमान प्रशासन करण्याकडे त्यांची वाटचाल सुरू आहे. यासाठी काही दिवसांपूर्वीच अद्ययावत तक्रार निवारण केंद्राची निर्मितीही करण्यात आली आहे. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित यंत्रणा राबवली जात आहे. ही यंत्रणा सुरक्षित राहणे तितकेच गरजेचे आहे.

कोकणात पावसाळापूर्व तसेच पावसाळा संपतासंपता विजेच्या गडगडाटासह जोरदार पाऊस पडतो. यावेळी संगणक, दूरध्वनी तसेच इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, विजेवर आधारित महत्त्वाच्या यंत्रणा यांना धोका होण्याची शक्यताही दिवसेंदिवस वाढू लागली आहे. अनेक ठिकाणी वीज पडण्याबरोबरच लाखोंची मालमत्ता, उपकरणे यांनाही मोठ्या प्रमाणावर हानी पोहोचत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यान्वित असलेल्या विविध वातानुकूलीत यंत्रणा, संगणक, प्रिंटर, सर्व्हर यांचे विजेपासून संरक्षण व्हावे, हा यामागील हेतू आहे. लाखो रूपयांच्या मालमत्तेसह जिल्हाधिकारी कार्यालयाबरोबरच अन्य कार्यालयांत येणाऱ्या असंख्य नागरिकांचे संरक्षण व्हावे, या उद्देशाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत ही वीज अटकाव यंत्रणा  कार्यान्वित करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जुन्या इमारतीवर १८ फूट उंचीच्या रॉडवर हे परदेशी बनावटीचे ‘ईएसई एअर टर्मिनल’ बसवण्यात आले आहे. या टर्मिनलपासून जमिनीपर्यंत तांब्याच्या तीन वाहिनींद्वारे ‘अर्थिंग सिस्टीम’ टाकण्यात आली असून, यासोबतच अर्थिंगची पट्टी टाकून हे बांधकामही सुरक्षित करण्यात आले आहे.

वीज कडकडाटावेळी २०० मीटर परिसराचे त्यापासून संरक्षण होणार असून, धोक्याच्यावेळी अगदी मोठ्या क्षमतेच्या विजेचा लोळ खेचून तो भूमिगत करण्याचे कार्य ही यंत्रणा करणार आहे. परिणामी विविध यंत्रसामुग्रींसह जीवितहानीही टळणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात बसवण्यात आलेल्या या उपकरणाचा फायदा २०० मीटर परिसरालाही होणार आहे.