शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
2
Pahalgam Terror Attack : दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
3
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
4
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
5
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
6
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
7
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
8
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
9
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
10
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
11
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
12
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
13
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
14
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
15
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
16
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
17
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
18
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
19
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
20
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता

तीन वर्षांनंतरच्या निवडणुका स्वबळावर लढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:43 IST

चिपळूण : देशभरात तळागाळातील लाेकांपर्यंत काँग्रेस पक्ष पोहोचला आहे. काँग्रेस पक्षाशी जोडलेले घटक गेल्या काही वर्षांत दुरावलेले आहेत. त्यांना ...

चिपळूण : देशभरात तळागाळातील लाेकांपर्यंत काँग्रेस पक्ष पोहोचला आहे. काँग्रेस पक्षाशी जोडलेले घटक गेल्या काही वर्षांत दुरावलेले आहेत. त्यांना पुन्हा संघटित करण्याचे काम सुरू आहे. पुढे तीन वर्षांनंतर होणाऱ्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे धोरण सुरू आहे. मुख्यमंत्री काँग्रेसचा बसावा, ही आमची भूमिका आहे. देशपातळीवर भाजपला केवळ काँग्रेस हाच सक्षम पर्याय आहे. त्यासाठीच तळागाळात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी सर्व नेत्यांचे दौरे सुरू असल्याचे मत काँग्रेसचे ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पक्ष संघटन वाढीकरिता जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी ते दौऱ्यावर आले आहेत. कापसाळ येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, काँग्रेसच्या वरिष्ठांनी महाराष्ट्रात पक्ष संघटन मजबूत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. बारा बलुतेदारांचा घटक वर्षानुवर्षे काँग्रेससोबत जोडलेला होता. मात्र, काही राजकीय पक्षांनी या घटकाची दिशाभूल केल्याने ते पक्षापासून दुरावले आहेत. त्यांना संघटित करण्याचे काम सुरू आहे.

केंद्र सरकार खासगीकरणाची भूमिका घेत असून, सरकारी कंपन्या, उद्योग बंद करण्याचा सपाटा लावला आहे. सरकारी कंपन्या शिल्लक राहत नसल्याने तिथे ओबीसींना आरक्षण मिळत नाही. हे केंद्र सरकार ओबीसींच्या विरोधात निर्णय घेत असल्याची टीका त्यांनी केली. प्रत्येक राजकीय पक्ष विस्तार करण्यासाठी धडपडत आहे. काँग्रेसने स्वबळाची भूमिका घेण्याचे ठरवले आहे. या धोरणामुळे महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण होणार नाही. विधानसभा निवडणुकीला तीन वर्षांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळेच आगामी निवडणुकीसाठी सध्या मशागत करण्याचे काम तळागाळातील कार्यकर्त्यांकडून केले जात आहे, असे त्यांनी सांगितले.

चिपळूणसह जिल्ह्यात काँग्रेसमध्ये नेहमीच गटतट होते. पक्षवाढीसाठी झटणारे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जाते. यावर ते म्हणाले की, गटतट ही बाब जिवंत असल्याची लक्षणे आहेत. घर म्हणजे भांड्याला भांडे लागणारच. राज्यात पक्ष बळकट करावयाचा असल्याने सर्वांना सोबत घेऊनच काम करावे लागेल. जिल्हाध्यक्ष प्रकाश साळवी यांनी दिलेला राजीनामा मंजूर झालेला नाही. सध्या त्यांच्याकडेच जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आहे. पक्षवाढीसाठी त्यांना पुढील काळात ताकद देण्यात येईल.

यावेळी प्रदेशाध्यक्ष माळी यांचे आगमन होताच तालुकाध्यक्ष प्रशांत यादव व त्यांच्या सहकाऱ्यांनी फटाक्यांच्या आतषबाजीने जल्लोषात स्वागत केले. यावेळी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष प्रकाश साळवी, युवक शहराध्यक्ष फैसल पिलपिले, महेश कदम यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.