शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
7
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
8
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
9
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
10
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
11
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
12
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
13
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
14
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
15
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
16
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
17
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
18
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
19
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
20
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी

तीन वर्षांनंतरच्या निवडणुका स्वबळावर लढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:43 IST

चिपळूण : देशभरात तळागाळातील लाेकांपर्यंत काँग्रेस पक्ष पोहोचला आहे. काँग्रेस पक्षाशी जोडलेले घटक गेल्या काही वर्षांत दुरावलेले आहेत. त्यांना ...

चिपळूण : देशभरात तळागाळातील लाेकांपर्यंत काँग्रेस पक्ष पोहोचला आहे. काँग्रेस पक्षाशी जोडलेले घटक गेल्या काही वर्षांत दुरावलेले आहेत. त्यांना पुन्हा संघटित करण्याचे काम सुरू आहे. पुढे तीन वर्षांनंतर होणाऱ्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे धोरण सुरू आहे. मुख्यमंत्री काँग्रेसचा बसावा, ही आमची भूमिका आहे. देशपातळीवर भाजपला केवळ काँग्रेस हाच सक्षम पर्याय आहे. त्यासाठीच तळागाळात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी सर्व नेत्यांचे दौरे सुरू असल्याचे मत काँग्रेसचे ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पक्ष संघटन वाढीकरिता जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी ते दौऱ्यावर आले आहेत. कापसाळ येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, काँग्रेसच्या वरिष्ठांनी महाराष्ट्रात पक्ष संघटन मजबूत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. बारा बलुतेदारांचा घटक वर्षानुवर्षे काँग्रेससोबत जोडलेला होता. मात्र, काही राजकीय पक्षांनी या घटकाची दिशाभूल केल्याने ते पक्षापासून दुरावले आहेत. त्यांना संघटित करण्याचे काम सुरू आहे.

केंद्र सरकार खासगीकरणाची भूमिका घेत असून, सरकारी कंपन्या, उद्योग बंद करण्याचा सपाटा लावला आहे. सरकारी कंपन्या शिल्लक राहत नसल्याने तिथे ओबीसींना आरक्षण मिळत नाही. हे केंद्र सरकार ओबीसींच्या विरोधात निर्णय घेत असल्याची टीका त्यांनी केली. प्रत्येक राजकीय पक्ष विस्तार करण्यासाठी धडपडत आहे. काँग्रेसने स्वबळाची भूमिका घेण्याचे ठरवले आहे. या धोरणामुळे महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण होणार नाही. विधानसभा निवडणुकीला तीन वर्षांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळेच आगामी निवडणुकीसाठी सध्या मशागत करण्याचे काम तळागाळातील कार्यकर्त्यांकडून केले जात आहे, असे त्यांनी सांगितले.

चिपळूणसह जिल्ह्यात काँग्रेसमध्ये नेहमीच गटतट होते. पक्षवाढीसाठी झटणारे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जाते. यावर ते म्हणाले की, गटतट ही बाब जिवंत असल्याची लक्षणे आहेत. घर म्हणजे भांड्याला भांडे लागणारच. राज्यात पक्ष बळकट करावयाचा असल्याने सर्वांना सोबत घेऊनच काम करावे लागेल. जिल्हाध्यक्ष प्रकाश साळवी यांनी दिलेला राजीनामा मंजूर झालेला नाही. सध्या त्यांच्याकडेच जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आहे. पक्षवाढीसाठी त्यांना पुढील काळात ताकद देण्यात येईल.

यावेळी प्रदेशाध्यक्ष माळी यांचे आगमन होताच तालुकाध्यक्ष प्रशांत यादव व त्यांच्या सहकाऱ्यांनी फटाक्यांच्या आतषबाजीने जल्लोषात स्वागत केले. यावेळी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष प्रकाश साळवी, युवक शहराध्यक्ष फैसल पिलपिले, महेश कदम यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.