शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
2
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
3
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
4
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
5
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
6
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
7
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
8
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
9
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
10
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
11
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
12
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
13
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
14
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
15
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
16
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
17
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
18
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
19
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
20
'तो खोटं बोलला, हॉटेलमध्ये जाताच त्याने माझी...'; विधवा सासूने जावयावर केला खळबळजनक आरोप

शिक्षण विभाग अंधारात

By admin | Updated: July 31, 2014 23:22 IST

जिल्हा परिषद : वीजपुरवठा तोडल्याने काळोखात काम करण्याची वेळ

रत्नागिरी : तीन महिन्यांचे २८ हजार रुपयांचे विजेचे बिल थकल्याने जिल्हा परिषद माध्यमिक विभागाचा वीजपुरवठा महावितरण कंपनीने खंडित केला. त्यामुळे कर्मचारी आंधारात काम करीत आहेत.परिषद भवनाच्या आवारामध्ये लायब्ररी इमारत म्हणून नोंद असलेल्या दुमजली इमारतीमध्ये माध्यमिक शिक्षण विभाग, जलस्वराज विभाग आणि प्रधानमंत्री ग्रामसडक योजना यांची कार्यालये आहेत. माध्यमिक विभागामध्ये जिल्हाभरातून शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी, शिक्षक आणि इतर लोकांची सतत वर्दळ असते.वीजबिल न भरणाऱ्यांचा वीजपुरवठा तोडण्याची मोहीमच महावितरणने हाती घेतली आहे.त्यातून शासकीय, निमशासकीय, खासगी संस्थांची कार्यालयेही सुटलेली नाहीत. दोन महिन्यांपूर्वी रत्नागिरी पंचायत समितीचा वीज पुरवठा तोडण्यात आला होता. मात्र, वीजबिल भरल्यानंतर दुसऱ्या दिवशीच वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला होता. ही मोहीम शालेय पातळीवर राबवण्यात आल्यानंतर आता महावितरणने आता वक्रदृष्टी माध्यमिक शिक्षण विभागाकडे वळवली आहे. शिक्षण विभागावरही कारवाई केली असून त्यामुळे या विभागाचा वीजपुरवठा तोडण्यात आला आहे.माध्यमिक शिक्षण विभागाच्या इमारतीचे मार्चनंतरचे तीन महिन्यांचे वीजबिल भरलेले नाही. तीन महिन्यांचे वीजबिल २८ हजार २१० एवढे आहे. ते भरण्याबाबत महावितरणकडून जिल्हा परिषदेला वेळोवेळी सूचना देण्यात आली होती. मात्र, हे वीजबिल भरण्याची मुदत संपल्यानंतर अखेर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी लायब्ररी इमारतीचा वीजपुरवठा खंडित केला. त्यामुळे काल सायंकाळपासून माध्यमिक शिक्षण विभाग, जलस्वराज विभाग आणि प्रधानमंत्री ग्रामसडक योजना हे तिन्ही विभाग आंधारात आहेत.पावसाळ्याचे दिवस असल्याने या विभागातील कर्मचाऱ्यांना आंधारात चाचपडत काम करावे लागत आहे. त्यातच पावसाळा असल्याने वीजेची गरज असताना त्याचवेळी हा पुरवठा तोडण्यात आल्याने काम करायचे कसे? असा प्रश्न जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागासमोर उपस्थित झाला आहे. (शहर वार्ताहर)मार्च महिन्यानंतर शिक्षण संचालक कार्यालयाकडून आकस्मिक निधी आलेला नाही. त्यामुळे वीजबिल भरणा करण्यासाठी आपल्या विभागाकडे इतर कोणताही निधी नसल्याने वीजबिल थकीत आहे.- आर. एस. अहिरे, शिक्षणाधिकारी, माध्यमिक विभाग