शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

शाळांमधील शैक्षणिक उपक्रमांचे मूल्यांकन हवे

By admin | Updated: November 24, 2015 00:30 IST

रवींद्र वायकर : रत्नागिरीत शिक्षण समन्वय समितीची बैठक

रत्नागिरी : जिल्हा शिक्षण समन्वय समितीच्या माध्यमातून शाळांमध्ये राबविल्या जाणाऱ्या शैक्षणिक उपक्रमांचे मूल्यांकन करण्यात यावे. त्यामुळे उपक्रमांचे यशापयश समोर येईल, त्यातील त्रुटी दूर करता येतील. त्याद्वारे विद्यार्थ्यांच्या विकासासाठी भविष्यकालीन नियोजन अधिक सुटसुटीत करता येईल, असा विश्वास राज्याचे गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी व्यक्त केला. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा शिक्षण समन्वय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. ए. ए. आठल्ये, रत्नागिरीचे नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, चिपळूणच्या नगराध्यक्षा सावित्री होमकळस, राजापूरच्या नगराध्यक्षा मीना मालपेकर, खेडच्या नगराध्यक्षा उर्मिला शेट्ये, दापोलीचे नगराध्यक्ष जावेद मणियार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या माध्यमातून विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यास प्राधान्य देण्यात यावे. शिक्षण विभागाच्या या शैक्षणिक उपक्रमांना सर्व प्रकारचे सहकार्य देण्यात येईल. शालेयस्तरावर शासकीय योजनांची अंमलबजावणी ही विद्यार्थ्यांची प्रगती केंद्रस्थानी ठेवून करायला हवी. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाच्या शिक्षणाची सोय उपलब्ध करुन देतानाच त्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्यदेखील उपलब्ध व्हायला हवे. विद्यार्थ्यांना आवश्यक गणवेश, चांगल्या दर्जाचे शैक्षणिक साहित्य देण्यासाठी गरज पडल्यास प्रशासनाकडून निधी दिला जाईल. अपंग विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी त्यांना सहाय्यभूत ठरणारे साहित्य उपलब्ध करावे. यासाठी प्रशासनाकडून आणि वैयक्तीक पातळीवरुन आवश्यक मदत देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. तसेच जिल्हा परिषद शाळांमध्ये डिजीटल क्लासरुम, विद्यार्थी गुणवत्ता वाढ अशा क्षेत्रांमध्ये सहभागी होेऊ इच्छिणाऱ्या स्वंयसेवी संस्थांना विद्यार्थी सर्वांगीण विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करुन घ्यावे. हे करत असतानाच जिल्हा शिक्षण समन्वय समितीच्या माध्यमातून शैक्षणिक उपक्रमांचे मूल्यांकन करण्यात यावे. याद्वारे विद्यार्थ्यांच्या विकासासाठी भविष्यकालीन आवश्यक नियोजन करण्यास सहाय्य होईल, असे वायकर म्हणाले.(प्रतिनिधी)महावितरण, म्हाडाचा आढावासकाळच्या सत्रात पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी महावितरणमार्फत राबविण्यात येणाऱ्या व नव्या गृहनिर्माण धोरणाच्या अनुषंगाने म्हाडाच्या माध्यमातून जिल्ह्यात राबविता येऊ शकणाऱ्या योजनांचा आढावा घेतला. पोलीस वसाहतीचा पुनर्विकास म्हाडाच्या सहकार्यातून कशाप्रकारे करता येऊ शकेल, याबाबतही माहिती घेतली.