शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
8
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
10
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
11
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
12
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
13
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
14
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
15
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
16
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
17
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
20
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा

खाद्यतेलाच्या दरात वाढ सुरू, ग्राहक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : गेली सहा महिने खाद्यतेलाच्या दरावर निर्बंध नसल्यामुळे दरामध्ये सातत्याने वाढ सुरू आहे. १५० ते ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : गेली सहा महिने खाद्यतेलाच्या दरावर निर्बंध नसल्यामुळे दरामध्ये सातत्याने वाढ सुरू आहे. १५० ते १८० रुपये लिटर दराने खाद्यतेल विक्री सुरू आहे. सूर्यफूल १५० ते १६० रुपये, तर शेंगदाणा तेल १८० रुपये लिटर दराने विक्री सुरू आहे. वाढत्या दरामुळे फोडणीही महागली आहे.

साखरेचे दर स्थिर असून, ३५ रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. कडधान्य व डाळींच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. हिरवा वाटाणा १२० रुपये, तर सफेद वाटाणा ८० रुपये किलो, चना डाळ ८० रुपये, मसूर ८० रुपये, चवळी १०० ते १२० रुपये किलो दराने विकण्यात येत आहे. वाशी व कोल्हापूर येथून डाळी, कडधान्य, तेलाची आवक होत आहे. दीपावलीपासून दरातील वाढ सातत्याने सुरू आहे. एक महिन्यावर पावसाळा आहे. पावसासाठी बेगमीचे साहित्य खरेदी करण्यात येते. मात्र, महागाईमुळे दैनंदिन खर्च भागविणे अवघड बनले आहे.

जीवनावश्यक वस्तू विक्रीसाठी शासनाने परवानगी दिली आहे. भाजी विक्रेते गावोगावी विक्रीसाठी येत असले तरी दरात मात्र कमालीची वाढ झाली आहे. ७० ते ८० रुपये किलोच्या घरात भाज्यांची विक्री सुरू आहे. कांदा मात्र १५ ते १८ रुपये किलो, तर बटाटा २५ रुपये किलो, तर पालेभाज्या २० ते २५ रुपये जुडी दराने विक्री सुरू आहे.

उष्मा वाढल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे कलिंगड, टरबुजासाठी विशेष मागणी होत आहे. २५ ते ३० रुपये किलो दराने कलिंगड विक्री सुरू आहे. अननस मुबलक स्वरूपात विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

फळांचा राजा बाजारात विक्रीसाठी दाखल झाला आहे. ७०० ते १००० रुपये डझन दराने आंबा विक्री सुरू आहे. आंब्याच्या वर्गवारीनुसार दर आकारले जात आहेत. यावर्षी आंबा उत्पादन कमी असल्याने दर अद्याप चढेच आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत.

खाद्यतेलाच्या दरातील वाढ दीपावलीपासून अद्याप सुरू आहे. वाढत्या दरामुळे फोडणी कशाची द्यावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. वाढत्या दरावर नियंत्रण असणे आवश्यक आहे.

- कविता वाघ, गृहिणी

कोरोनामुळे लॉकडाऊनचा परिणाम सर्वसामान्यांच्या अर्थार्जनावर झाला असतानाच, महागाईने कंबरडेच मोडले आहे. महागाईवर शासनाने नियंत्रण आणण्याची आवश्यकता आहे.

- परिणिता माने, गृहिणी