शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
4
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
5
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
6
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
7
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
8
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
9
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
10
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
11
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
12
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
13
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
14
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
15
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
16
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
17
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
18
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
19
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

पुढच्या वर्षीही लवकर या...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 23:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : ‘गणपत्ती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या गजरात गुरूवारी आवडत्या बाप्पाला भक्तांनी जड अंत:करणाने निरोप दिला. जिल्ह्यातील एक लाख १६ हजार २८ घरगुती आणि १७ सार्वजनिक गणेशांचे तसेच गौरींचे गुरुवारी विसर्जन करण्यात आले.यावर्षी गणरायाचा सात दिवस मुक्काम होता. यापूर्वी दीड आणि पाच दिवसांच्या गणपतींचे विसर्जन करण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : ‘गणपत्ती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या गजरात गुरूवारी आवडत्या बाप्पाला भक्तांनी जड अंत:करणाने निरोप दिला. जिल्ह्यातील एक लाख १६ हजार २८ घरगुती आणि १७ सार्वजनिक गणेशांचे तसेच गौरींचे गुरुवारी विसर्जन करण्यात आले.यावर्षी गणरायाचा सात दिवस मुक्काम होता. यापूर्वी दीड आणि पाच दिवसांच्या गणपतींचे विसर्जन करण्यात आले आहे. गुरुवारी सातव्या दिवशी जिल्ह्यातील एकूण १ लाख १६ हजार ४५ गणेशमूर्तींचे गौरींसह विसर्जन करण्यात आले. दुपारनंतर विसर्जनासाठी मूर्तींना बाहेर आणण्यात आले. यावर्षी डॉल्बी किंवा डीजे याच्यावर बंदी असल्याने विसर्जन मिरवणूक ढोल - ताशांच्या साथीने काढण्यात आली. काल बुधवारपासून पावसाने विश्रांती घेतल्याने वाजतगाजत विघ्नहर्त्याला निरोप देण्यात आला. बाप्पाच्या आगमनाने गजबजलेले घर आता त्याच्या जाण्याने रिते होणार, या कल्पनेने बहुतांशी महिलावर्गाचे डोळे भरून येत होते. आरती झाल्यानंतर मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत विसर्जन मिरवणुका सुरू होत्या. रत्नागिरी शहर पोलीस स्थानकाच्या हद्दीत घरगुती ५,६२८ तर सार्वजनिक ४, ग्रामीण पोलीस स्थानकाचे हद्दीत घरगुती ७,६९४ गणपतींचे विसर्जन करण्यात आले.जिल्हा पोलीस प्रशासनाने विसर्जनस्थळी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली होती. जिल्ह्यातील १३ प्रमुख विसर्जनस्थळांवर व ३९८ घाटांवर सीसीटीव्ही कॅमºयांद्वारे लक्ष ठेवण्यात आले होते. प्रमुख किनाºयांवर जीवरक्षकांना अत्याधुनिक सामुग्रीसह सज्ज ठेवण्यात आले होते. निर्माल्य संकलनासाठी नगराध्यक्ष राहुल पंडित यांच्यासह रोटरी क्लब तसेच अन्य संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.निर्माल्य संकलन : विविध सामाजिक संस्थांचा उपक्रमात सहभागजिल्ह्यातील एक लाख १६ हजार २८ घरगुती आणि १७ सार्वजनिक गणेशांचे विसर्जन.यावर्षी गौरी-गणपतीचा सात दिवस मुक्काम.डॉल्बी किंवा डीजे यांच्या वापरावर बंदी.विसर्जन मिरवणूक ढोल - ताशांच्या गजरात.पावसाने विश्रांती घेतली असल्याने वाजतगाजत विघ्नहर्त्याला निरोप.रात्री उशिरापर्यंत मिरवणुका सुरु.रत्नागिरी शहरातील मांडवी समुद्रकिनारी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, भारतीय पर्यावरण व तंत्रज्ञान संस्था तसेच विविध सामाजिक संस्था, शाळा - महाविद्यालये यांच्या सहकार्याने विसर्जनाच्या ठिकाणी निर्माल्य संकलन करण्यात आले. शहरातील भक्तांनीही या उपक्रमाला सहकार्य केले.