शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

पुढच्या वर्षीही लवकर या...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 23:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : ‘गणपत्ती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या गजरात गुरूवारी आवडत्या बाप्पाला भक्तांनी जड अंत:करणाने निरोप दिला. जिल्ह्यातील एक लाख १६ हजार २८ घरगुती आणि १७ सार्वजनिक गणेशांचे तसेच गौरींचे गुरुवारी विसर्जन करण्यात आले.यावर्षी गणरायाचा सात दिवस मुक्काम होता. यापूर्वी दीड आणि पाच दिवसांच्या गणपतींचे विसर्जन करण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : ‘गणपत्ती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या गजरात गुरूवारी आवडत्या बाप्पाला भक्तांनी जड अंत:करणाने निरोप दिला. जिल्ह्यातील एक लाख १६ हजार २८ घरगुती आणि १७ सार्वजनिक गणेशांचे तसेच गौरींचे गुरुवारी विसर्जन करण्यात आले.यावर्षी गणरायाचा सात दिवस मुक्काम होता. यापूर्वी दीड आणि पाच दिवसांच्या गणपतींचे विसर्जन करण्यात आले आहे. गुरुवारी सातव्या दिवशी जिल्ह्यातील एकूण १ लाख १६ हजार ४५ गणेशमूर्तींचे गौरींसह विसर्जन करण्यात आले. दुपारनंतर विसर्जनासाठी मूर्तींना बाहेर आणण्यात आले. यावर्षी डॉल्बी किंवा डीजे याच्यावर बंदी असल्याने विसर्जन मिरवणूक ढोल - ताशांच्या साथीने काढण्यात आली. काल बुधवारपासून पावसाने विश्रांती घेतल्याने वाजतगाजत विघ्नहर्त्याला निरोप देण्यात आला. बाप्पाच्या आगमनाने गजबजलेले घर आता त्याच्या जाण्याने रिते होणार, या कल्पनेने बहुतांशी महिलावर्गाचे डोळे भरून येत होते. आरती झाल्यानंतर मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत विसर्जन मिरवणुका सुरू होत्या. रत्नागिरी शहर पोलीस स्थानकाच्या हद्दीत घरगुती ५,६२८ तर सार्वजनिक ४, ग्रामीण पोलीस स्थानकाचे हद्दीत घरगुती ७,६९४ गणपतींचे विसर्जन करण्यात आले.जिल्हा पोलीस प्रशासनाने विसर्जनस्थळी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली होती. जिल्ह्यातील १३ प्रमुख विसर्जनस्थळांवर व ३९८ घाटांवर सीसीटीव्ही कॅमºयांद्वारे लक्ष ठेवण्यात आले होते. प्रमुख किनाºयांवर जीवरक्षकांना अत्याधुनिक सामुग्रीसह सज्ज ठेवण्यात आले होते. निर्माल्य संकलनासाठी नगराध्यक्ष राहुल पंडित यांच्यासह रोटरी क्लब तसेच अन्य संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.निर्माल्य संकलन : विविध सामाजिक संस्थांचा उपक्रमात सहभागजिल्ह्यातील एक लाख १६ हजार २८ घरगुती आणि १७ सार्वजनिक गणेशांचे विसर्जन.यावर्षी गौरी-गणपतीचा सात दिवस मुक्काम.डॉल्बी किंवा डीजे यांच्या वापरावर बंदी.विसर्जन मिरवणूक ढोल - ताशांच्या गजरात.पावसाने विश्रांती घेतली असल्याने वाजतगाजत विघ्नहर्त्याला निरोप.रात्री उशिरापर्यंत मिरवणुका सुरु.रत्नागिरी शहरातील मांडवी समुद्रकिनारी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, भारतीय पर्यावरण व तंत्रज्ञान संस्था तसेच विविध सामाजिक संस्था, शाळा - महाविद्यालये यांच्या सहकार्याने विसर्जनाच्या ठिकाणी निर्माल्य संकलन करण्यात आले. शहरातील भक्तांनीही या उपक्रमाला सहकार्य केले.