शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
5
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
6
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
7
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
8
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
9
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
10
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
15
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
16
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
19
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
20
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे

आठवडाभरात प्रति लीटर पेट्रोल ७९ आणि डिझेल ८७ पैशाने वधारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:38 IST

रत्नागिरी : कोरोनाच्या अनुषंगाने वाहतुकीवर काहीअंशी अंकुश आलेला असला तरीही पेट्रोल आणि डिझेलचे दर भरमसाठ वाढू लागले आहेत. गेल्या ...

रत्नागिरी : कोरोनाच्या अनुषंगाने वाहतुकीवर काहीअंशी अंकुश आलेला असला तरीही पेट्रोल आणि डिझेलचे दर भरमसाठ वाढू लागले आहेत. गेल्या आठवडाभरात पेट्रोल प्रति लीटर ७९ पैसे तर डिझेल प्रति लीटर ८७ पैशाने वाढले आहे. मात्र, या दरांवर नियंत्रण नसल्याने वाहनचालकांचे मात्र आर्थिक कंबरडे मोडले आहे. सातत्याने होत असलेल्या इंधन दरवाढीचा आलेख वाढता असल्याने यावर सरकारचे नियंत्रण कधी येणार, असा प्रश्न उभा राहिला आहे.

गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून पेट्रोल आणि डिझेलचे दर भरमसाठ वाढू लागले आहेत. १५ मे रोजी पेट्रोलचा दर १०० रूपये प्रति लीटर आणि डिझेलचा दर ९० रूपये प्रति लीटर इतका होता. साधारणत: पुढच्या पंधरा दिवसांत हा दर कमी - जास्त होत होता. १ जून रोजी पेट्रोलचा दर प्रति लीटर १०२ रूपये १७ पैशांवर पोहोचला तर डिझेलचा दर ९२ रूपये ६९ पैशांवर गेला. गेल्या काही महिन्यांपासूून पेट्रोल - डिझेलच्या दरात लक्षणीय वाढ होत आहे.

दि. ४ जून रोजी पुन्हा पेट्रोलचा दर प्रति लीटर १०२ रूपये ४३ पैसे इतका झाला. म्हणजे तीन दिवसातच लीटरमागे २६ पैशांनी पेट्रोल महागले. ५ जून रोजी पुन्हा पेट्रोल आणि डिझेल दोन्हीही इंधनात पुन्हा वाढ झाली आहे. पेट्रोलचा दर प्रति लीटर १०२ रूपये ९६ पैसे इतका दर वाढला. म्हणजेच पेट्रोल पुन्हा ५३ पैशांनी वाढले तर डिझेलचाही दर ९२ रूपये ६९ पैसे इतका झाला आहे. म्हणजेच आठवड्यात तब्बल ८७ पैसे प्रति लीटर डिझेलचा दर वाढला आहे. सध्या कोरोनाच्या काळात रूग्णांची वाहतूक करण्यासाठी अथवा गंभीर रूग्णांना हलविण्यासाठी ॲम्ब्युलन्स अथवा खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. मात्र, इंधन दरवाढीचा फटका या वाहतुकीलाही बसत आहे.

सध्या जिल्ह्यासह राज्यात लाॅकडाऊन सुरू आहे. काही जिल्ह्यांच्या सीमाही बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, तरीही या काळात पेट्रोल आणि डिझेल या इंधनात अधिकाधिक वाढ होऊ लागल्याने वाहनधारकांना वाहने चालविणे जिकरीचे झाले आहे. त्यामुळे इंधन दरवाढीचा चटका असह्य होऊ लागल्याने निदान आता तरी सरकारने त्यावर नियंत्रण आणायला हवे, अशा प्रतिक्रिया जनतेतून व्यक्त होत आहेत.