शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
2
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
3
सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
4
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
5
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
6
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
7
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
8
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
9
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
10
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
11
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
12
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
13
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
14
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
15
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
16
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
17
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
18
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
19
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
20
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल

गणेशोत्सव काळात विभागातील शिवशाही बसेस धावणार सुसाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:35 IST

मेहरून नाकाडे लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनामुळे ब्रेक लागलेली एस. टी. सेवा हळूहळू पूवर्वपदावर येऊ लागली आहे. लाॅकडाऊन ...

मेहरून नाकाडे

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोनामुळे ब्रेक लागलेली एस. टी. सेवा हळूहळू पूवर्वपदावर येऊ लागली आहे. लाॅकडाऊन काळात रत्नागिरी विभागातील ५० वातानुकूलित शिवशाही बसेस बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, अनलाॅकनंतर १० शिवशाही बसेस दापोली, खेड, चिपळूण आगारातून सुरू करण्यात आल्या असल्या तरी अन्य आगारातील शिवशाही बसेस मात्र अद्याप बंद आहेत.

मुंबई, बोरिवली, पुणे, कोल्हापूर मार्गांवर शिवशाही बसेस सोडण्यात येतात. या मार्गांवरील शिवशाही बसेसना चांगला प्रतिसाद मिळत आहे. शिवशाही शयनयान बससेवा उपलब्ध असली तरी कोरोनामुळे महामंडळाच्या सूचनेनुसार सर्व शिवशाही बसेस बंद ठेवण्यात आल्या होत्या. अनलाॅकनंतर आंतरजिल्हा वाहतुकीला परवानगी मिळाल्यानंतर लालपरी सुरू करताना शिवशाही बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, दापोली, खेड व चिपळूण आगारातूनच शिवशाही बसेस सुरू केल्या आहेत. अन्य सहा आगारांतील शिवशाही बसेस बंद आहेत. परंतु, गणेशोत्सवात ग्रामीण, शहरी मार्गावरील वाहतुकीचा विस्तार करत असतानाच सर्व आगारातील बंद शिवशाही बससेवा सुरू करण्याचा निश्चय रत्नागिरी विभागाने केला आहे.

गणेशोत्सवासाठी मुंबईतून जादा गाड्यांचे आगमन होत असतानाच, नऊ आगारांमधून परतीसाठी जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. १,११० गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले असले तरी प्रवाशांच्या सोयीसाठी परतीसाठी मुंबई, बोरिवली मार्गावर वातानुकूलित शिवशाही बसेस सुरू करण्यात येणार आहेत.

शिवशाहीतून प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला मास्क सक्तीचा करण्यात आला आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी शिवशाही बसेस लवकरच कार्यान्वित होणार आहेत.

या मार्गावर सुरु आहेत शिवशाही

दापोली - मुंबई

चिपळूण - मुंबई

चिपळूण - पुणे

खेड - बोरिवली

दापोली - पुणे

गणेशोत्सवात अन्य आगारातील शिवशाही बसेस सुरू होणार आहेत.

राज्य परिवहन महामंडळाच्या सूचनेनुसार कोरोना काळात वातानुकूलित शिवशाही बसेस बंद ठेवण्यात आल्या होत्या. अनलाॅकनंतर तीन आगारांनी प्राधान्याने शिवशाही बसेस सुरू केल्या. परंतु, अन्य सहा आगारांतील शिवशाही बसेस गणेशोत्त्सवात सुरू करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी सर्व गाड्यांची दुरूस्तीची कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

- सुनील भोकरे, विभाग नियंत्रक, रत्नागिरी.

बसेसचे दरराेज सॅनिटायझेशन

कोरोनामुळे प्रवाशांच्या आरोग्य सुरक्षेसाठी प्रत्येक फेरीनंतर बसचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. शिवशाही नव्हे तर शहरी २८०, ग्रामीण मार्गावरील ३,२०० फेऱ्या सुरू आहेत. प्रत्येक आगारात सॅनिटायझेशन सुविधा उपलब्ध आहे.