शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
3
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
4
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
5
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
6
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
7
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
8
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
9
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
10
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
11
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
12
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
13
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
14
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
15
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
16
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
17
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

गणेशोत्सव काळात विभागातील शिवशाही बसेस धावणार सुसाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:35 IST

मेहरून नाकाडे लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनामुळे ब्रेक लागलेली एस. टी. सेवा हळूहळू पूवर्वपदावर येऊ लागली आहे. लाॅकडाऊन ...

मेहरून नाकाडे

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोनामुळे ब्रेक लागलेली एस. टी. सेवा हळूहळू पूवर्वपदावर येऊ लागली आहे. लाॅकडाऊन काळात रत्नागिरी विभागातील ५० वातानुकूलित शिवशाही बसेस बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, अनलाॅकनंतर १० शिवशाही बसेस दापोली, खेड, चिपळूण आगारातून सुरू करण्यात आल्या असल्या तरी अन्य आगारातील शिवशाही बसेस मात्र अद्याप बंद आहेत.

मुंबई, बोरिवली, पुणे, कोल्हापूर मार्गांवर शिवशाही बसेस सोडण्यात येतात. या मार्गांवरील शिवशाही बसेसना चांगला प्रतिसाद मिळत आहे. शिवशाही शयनयान बससेवा उपलब्ध असली तरी कोरोनामुळे महामंडळाच्या सूचनेनुसार सर्व शिवशाही बसेस बंद ठेवण्यात आल्या होत्या. अनलाॅकनंतर आंतरजिल्हा वाहतुकीला परवानगी मिळाल्यानंतर लालपरी सुरू करताना शिवशाही बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, दापोली, खेड व चिपळूण आगारातूनच शिवशाही बसेस सुरू केल्या आहेत. अन्य सहा आगारांतील शिवशाही बसेस बंद आहेत. परंतु, गणेशोत्सवात ग्रामीण, शहरी मार्गावरील वाहतुकीचा विस्तार करत असतानाच सर्व आगारातील बंद शिवशाही बससेवा सुरू करण्याचा निश्चय रत्नागिरी विभागाने केला आहे.

गणेशोत्सवासाठी मुंबईतून जादा गाड्यांचे आगमन होत असतानाच, नऊ आगारांमधून परतीसाठी जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. १,११० गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले असले तरी प्रवाशांच्या सोयीसाठी परतीसाठी मुंबई, बोरिवली मार्गावर वातानुकूलित शिवशाही बसेस सुरू करण्यात येणार आहेत.

शिवशाहीतून प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला मास्क सक्तीचा करण्यात आला आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी शिवशाही बसेस लवकरच कार्यान्वित होणार आहेत.

या मार्गावर सुरु आहेत शिवशाही

दापोली - मुंबई

चिपळूण - मुंबई

चिपळूण - पुणे

खेड - बोरिवली

दापोली - पुणे

गणेशोत्सवात अन्य आगारातील शिवशाही बसेस सुरू होणार आहेत.

राज्य परिवहन महामंडळाच्या सूचनेनुसार कोरोना काळात वातानुकूलित शिवशाही बसेस बंद ठेवण्यात आल्या होत्या. अनलाॅकनंतर तीन आगारांनी प्राधान्याने शिवशाही बसेस सुरू केल्या. परंतु, अन्य सहा आगारांतील शिवशाही बसेस गणेशोत्त्सवात सुरू करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी सर्व गाड्यांची दुरूस्तीची कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

- सुनील भोकरे, विभाग नियंत्रक, रत्नागिरी.

बसेसचे दरराेज सॅनिटायझेशन

कोरोनामुळे प्रवाशांच्या आरोग्य सुरक्षेसाठी प्रत्येक फेरीनंतर बसचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. शिवशाही नव्हे तर शहरी २८०, ग्रामीण मार्गावरील ३,२०० फेऱ्या सुरू आहेत. प्रत्येक आगारात सॅनिटायझेशन सुविधा उपलब्ध आहे.