शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
4
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
5
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
6
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
7
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
8
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
9
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
10
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
11
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
12
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
13
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
14
Navi Mumbai: तीन मित्रांच्या जीवावर बेतली पावसाळी सहल 
15
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
16
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
17
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
18
IPO: 'स्वप्न विकणारे' आयपीओ ठरले फसवे, रिटर्न्समध्ये गुंतवणूकदारांचा अपेक्षाभंग !
19
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
20
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली

काेराेनाकाळात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवरच कामाचा बाेजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:39 IST

टेंभ्ये : लॉकडाऊनमध्ये शासकीय निमशासकीय कार्यालये तसेच शिक्षण संस्था काही काळ पूर्ण बंद तर काही काही काळ उपस्थितीच्या टक्केवारीवर ...

टेंभ्ये : लॉकडाऊनमध्ये शासकीय निमशासकीय कार्यालये तसेच शिक्षण संस्था काही काळ पूर्ण बंद तर काही काही काळ उपस्थितीच्या टक्केवारीवर सुरू करण्यात आल्या. या काळामध्ये जिल्हा प्रशासनाकडून कोरोना प्रसारावर नियंत्रण घालण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची कामे निश्चित करण्यात आली. या सर्व कामांसाठी मार्च २० पासून आजपर्यंत केवळ शिक्षण विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीच वापरले जात आहेत. त्यामुळे शिक्षकांमधून नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

प्रत्येक जिल्ह्यातील अन्य आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोविडच्या नियमांप्रमाणे सवलती आहेत, पण आपत्कालीन काम करण्यासाठी केवळ शिक्षकच नियुक्त केले जात आहेत. ही बाब अन्यायकारक असल्याचा सूर शिक्षकांमधून उमटत आहे. कोविड १९ चा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून प्रत्येक जिल्ह्यामध्ये आरोग्य व पोलीस प्रशासनासोबत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अविरतपणे काम करत आहेत. कोविड सेंटर, क्वारंटाइन केंद्र, पोलीसमित्र, तपासणी नाके, आरोग्य केंद्रांमध्ये साहाय्यक इतकेच नाही तर अँटिजन चाचणी करण्यासाठीही साहाय्यक म्हणून शिक्षक काम करत आहेत.

लॉकडाऊनच्या काळामध्ये अन्य विभागांना उपस्थितीचे नियम घालून देण्यात आले. त्या प्रमाणातच संबंधित कर्मचारी कार्यालयांमध्ये उपस्थित राहून काम करत होते. या वेळी शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन व ऑफलाइन शिक्षण देत होतेच. त्याबरोबरच ते कोविड संदर्भातील सर्व कामकाजही करत होते. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनाही शिक्षकांचे पालकत्व स्वीकारण्यापेक्षा त्यांना ड्युटी लावण्यामध्येच जास्त आनंद मिळत असल्याची टीका काही शिक्षकांमधून हाेत आहे. शाळा बंद आहेत म्हणून शिक्षकांना ड्युटी लावली जात असेल तर २५, ५० टक्के उपस्थितीच्या नियमाप्रमाणे अनुपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्यांना ड्युटी का लावली जात नाही? पोलीस व आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणेच केवळ शिक्षकांनीच ही कामे करणे अपेक्षित आहे का, असे प्रश्न विचारले जात आहेत.

-------------------------

पोस्ट कोविड ट्रीटमेंट सुरू असतानाही ड्युटी !

कोरोना आजारातून बरे झालेल्या रुग्णांना पोस्ट कोविडचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. अनेकांमध्ये लाँग कोविडची लक्षणे दिसत आहेत. याला शिक्षकही अपवाद नाहीत. प्रत्यक्षात मात्र पोस्ट कोविडची ट्रीटमेंट सुरू असतानाही शिक्षकांना कोविड ड्युटी लावली जात आहे. सर्वसामान्य नागरिकांना मात्र काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. शिक्षकांना मात्र ड्युटी लावली जाते.