शहरं
Join us  
Trending Stories
1
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
4
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
5
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
6
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
7
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...
8
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
9
दसरा मेळाव्यानंतर नवा वाद! रामदास कदमांचा धक्कादायक दावा, संजय राऊतांचं संतप्त प्रत्युत्तर
10
माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय?
11
ITR चुकला? घाबरू नका, 'या' तारखेपर्यंत भरा बिलिटेड रिटर्न; पण, इतका दंड आणि व्याज भरावे लागणार
12
"भारतीय कंपन्या 'क्रोनीझम'ने नाही, तर..", राहुल गांधींचे कोलंबियातून भाजपवर टीकास्त्र
13
Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य
14
मारुतीचं साम्राज्य धोक्यात...? ह्यूंदाई-महिंद्राला पछाडत 'ही' कंपनी बनली देशातली No.2 ब्रँड! 'MS' पासून फक्त एक पाऊल दूर
15
हृदयद्रावक! कफ सिरप पिऊन झोपला अन् उठलाच नाही; मोफत औषधामुळे मुलाचा मृत्यू
16
Bigg Boss 19: आता खरी मजा येणार! भारतीय क्रिकेटरची बहीण 'बिग बॉस'च्या घरात येणार, कोण आहे ती?
17
पाशांकुश एकादशीला 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; काय घ्यावी काळजी? वाचा!
18
उद्धव ठाकरेंची सोडली साथ, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच राजन तेली म्हणाले, "दुर्दैवाने तिथे..."
19
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
20
एआयपासून बनलेली जगातील पहिली अभिनेत्री, ओळखून दाखवणं कठीण; कलाकारांकडून तीव्र निषेध!

ढोल-ताशांच्या गजरात रत्नागिरीत दुमदुमतोय शिमगोत्सव

By admin | Updated: March 20, 2016 23:55 IST

जयस्तंभपासून पालख्या मंदिरापर्यंत पायी नेल्या जात असल्याने सध्या शहरात वाहतुकीची कोंडी होत आहे.

रत्नागिरी : कोकणात शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. काही गावांमधून तेरसे तर काही ठिकाणी भद्रे शिमगे साजरे करण्यात येतात. शहराच्या आसपासच्या गावातील पालख्या बारा वाड्यांचे ग्रामदैवत असलेल्या श्री भैरीला भेटावयास येत असल्यामुळे दिवसभर शहरात ढोल-ताशांच्या गजरात आलेल्या पालख्यांमुळे शिमगोत्सवाचे उत्साही वातावरण तयार झाले आहे. फाक पंचमीनंतर ग्रामदेवतांना रूपे लावली जातात. त्यानंतर पालख्या बाहेर पडतात. या पालख्या शहरात श्री भैरीबुवाच्या भेटीला येतात. त्यानंतर त्या आपापल्या गावी शिमगोत्सवासाठी परततात. जवळपासच्या गावातील अनेक पालख्या पायी तर काही पालख्या टेम्पो अथवा ट्रकमधून येतात. जयस्तंभपासून पालख्या मंदिरापर्यंत पायी नेल्या जात असल्याने सध्या शहरात वाहतुकीची कोंडी होत आहे. जयस्तंभ, बसस्थानक परिसरातून वाहने मुंगीच्या पावलाने पुढे सरकत आहेत. दिनांक २३ मार्चपर्यंत शहरात विविध पालख्या येणार असल्यामुळे श्री भैरी देवस्थानतर्फे नियोजन करण्यात आले आहे.बच्चे कंपनीच्या पालख्याशिमगोत्सवामुळे बच्चे कंपनी देखील छोट्या पालख्या काढून परिसरातील घरोघरी घेऊन जात आहेत. पुठ्ठ्याच्या पालख्यात देवीचा फोटो ठेवून ढोल-ताशांच्या गजरात त्यांची मिरवणूक काढत आहेत. सध्या परीक्षांचा हंगाम असला तरी सुटीच्या दिवसात पालख्या नाचविण्यात येत आहेत.नमन व बहुरूपीशिमगोत्सवात गावोगावी नमन अथवा खेळे, संकासूर घरोघरी येतात. काही मिनिटांचा खेळ सादर करून दक्षिणा गोळा केली जाते. शिमगोत्सवात बहुरूपी देखील पोलिसांच्या वेशभूषेत येऊन बिदागी गोळा करत आहेत. शिमगोत्सव असल्यामुळे नागरिकही उत्साहाने काही पैसे हातात टेकवत आहेत.मुंबईकरांचे आगमनतेरसे शिमगोत्सवाला सुरूवात झाल्याने नोकरी, व्यवसायानिमित्त मुंबई व अन्य शहरात स्थायिक असलेली मंडळी गावी परतली आहेत. ग्रामदेवतेची पालखी घरी येत असल्यामुळे महिलावर्गामध्ये तर कमालीचा उत्साह निर्माण झाला आहे. देवीची पूजा, ओटी भरण्यासाठी मंडळी आवर्जून गावी दाखल झाली आहे. होळी, गुडफ्रायडे, चौथा शनिवार व रविवारची सुटी जोडून आल्याने अनेक मंडळी गावी आली आहेत. काही गावातून शिमगोत्सवानंतर सार्वजनिक पूजा, उत्सव साजरे करण्यात येत असल्याने सध्या सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. बारावी व महाविद्यालयीन परीक्षा संपल्या असल्या, तरी दहावीच्या परीक्षा अद्याप सुरू आहेत. शालेय परीक्षा होळीनंतर सुरू होणार असल्याने होळीसाठी कुटुंबातील एखादा सदस्य हजेरी लावत आहे. कोकण रेल्वे व एस. टी. महामंडळाने होळीसाठी खास जादा गाड्यांची सुविधा भाविकांना उपलब्ध करून दिली आहे. (प्रतिनिधी)