शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

एस.टी.च्या अपघातात घट

By admin | Updated: December 20, 2014 23:36 IST

परिवहन महामंडळ : गेल्या आठ महिन्यात झाले ८८ अपघात

रत्नागिरी : चालकांसाठी प्रशिक्षण, योग्य नियोजन, गाड्यांची वेळच्यावेळी दुरूस्ती, जुन्या गाड्या भंगारात काढून नवीन गाड्यांचा समावेश शिवाय दररोज घेण्यात येणाऱ्या आढावा यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या अपघातामध्ये घट होत असल्याचे दिसून येत आहे. गतवर्षी वर्षभरात १२० अपघात झाले होते तर चालू वर्षी गेल्या आठ महिन्यात ८८ अपघात घडले आहेत.गेल्या वर्षभरातील एकूण १२० अपघातापैकी १७ प्राणांतिक अपघात असून ९६ अपघात गंभीर आहेत तर किरकोळ अपघात ७ आहेत. तर चालू वर्षात एप्रिल ते नोव्हेंबर अखेर प्राणांतिक अपघात ९ असून गंभर अपघात ७३ तसेच किरकोळ अपघात ६ आहेत.गतवर्षापेक्षा यावर्षी अपघातामध्ये घट झाल्याचे दिसून येत आहे. एस. टी.च्या अपघातानंतर अपघाताच्या स्वरूपावर जखमी, मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना मदत निधी देण्यात येतो. अपघातानंतर चालकाची चौकशी केली जाते. शिवाय त्याला प्रशिक्षणासही पाठविण्यात येते. रत्नागिरी विभागाात सध्या २४० चालक प्रशिक्षणार्थींचे प्रशिक्षण सुरू आहे. लवकरच प्रशिक्षण पूर्ण करून चालक सेवेत हजर होणार आहेत. त्यामुळे सध्या चालकांवर येणाऱ्या दुहेरी ड्युटीचा ताणदेखील कमी होणार आहे. त्यामुुळे अपघात होत असले तरीही गेल्या काही महिन्यात ते प्रमाण कमी झाले आहे. एस. टी.चा कारभार आता हळूहळू सुधारत असल्याचे दिसून येत आहे.रत्नागिरी आगारात एस. टी.च्या ७९० गाड्या असून, त्यामध्ये लवकरच नवीन १०० गाड्यांची भर पडणार आहे. दररोज एस. टी.च्या ४५०० फेऱ्यांव्दारे २ लाख १६ हजार किलोमीटर प्रवास होतो.दररोज एस. टी. एकूण ५० हजार लीटर डिझेल लागते. त्यासाठी किमान ३० लाख १५ हजार ५०० रूपये खर्च येतो. प्रतिदिन विभागास ६५ लाख रूपये खर्च येतो. विभागात १४७३ चालक, १६०० वाहक असून, दरमहा ५ ते १७ फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यात येत असून, गेल्या दहा महिन्यात १३९ फुकट्या प्रवाशांवर कारवाई करून ३१ हजार ७८४ रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.रत्नागिरी विभागाचे पूर्वी प्रतिदिन ५० लाखांपर्यंत उत्पन्न होते. परंतु सध्या उत्पन्नात वाढ झाली असून, ६५ लाख इतके झाले आहे. अनेक ठिकाणी सुमारे ५० हून अधिक जादा गाड्यांच्या फेऱ्या वाढल्या आहेत.गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, निवडणूक, तसेच उन्हाळी सुटीचे योग्य नियोजन करण्यात आल्याने विभागाला नुकतीच ‘अ’ श्रेणी प्राप्त झाली आहे. विनाअपघात सेवा, स्वच्छ व सुंदर गाड्या या योजना राबविण्यात येत आहेत. नवीन वर्षात ‘मागेल त्याला एस. टी.’ ही योजना राबविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)