शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

कट्टरतावादाची पाळंमुळं आर्थिक, राजकीय सत्तेत : काॅ. किरण मोघे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:37 IST

रत्नागिरी : कट्टरतावाद हा धर्माचे आवरण पांघरून येत असला तरी त्याची पाळंमुळं आर्थिक-राजकीय सत्तेत आहेत. आर्थिक राजकीय सत्ता ...

रत्नागिरी : कट्टरतावाद हा धर्माचे आवरण पांघरून येत असला तरी त्याची पाळंमुळं आर्थिक-राजकीय सत्तेत आहेत. आर्थिक राजकीय सत्ता काबीज करणं हा कट्टरतावादाचा हेतू आहे, धर्म केवळ निमित्तमात्र आहे, असे प्रतिपादन काॅ. किरण मोघे यांनी शहीद गौरी लंकेश यांच्या चौथ्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित केलेल्या ‘डाॅ. नरेंद्र दाभोलकर विचार जागर विशेषांका’च्या ऑनलाईन प्रकाशन कार्यक्रमात केले. त्या ‘कट्टरतावादाचे आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आव्हान’ या विषयावर बोलत होत्या.

कट्टरतावादामुळे महिला, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, कृष्णवर्णीय यांचे मानवी अधिकार हिरावले जाऊन त्यांचे जगणं मुश्कील होतं, या गोष्टीकडेही त्यांनी लक्ष वेधलं. अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या नरेंद्र दाभोलकर विचार जागर विशेषांकाचे प्रकाशन डाॅ. शैला दाभोलकर यांच्या हस्ते झाले. यावेळी शैला दाभाेलकर म्हणाल्या, डाॅ. नरेंद्र दाभोलकर गेल्यानंतर व कोविड काळात आपल्यासमोर अनेक अडचणी आल्या. मात्र, तुम्ही सर्वांनी त्यावर केलेली मात मी पाहिली आहे. विचाराला कृतीची जोड असली पाहिजे, यासाठी डाॅ. दाभोलकर आग्रही होते. त्याचे दर्शन या अंकातून घडत आहे. आज डाॅ. दाभोलकर आपल्यात असते तर त्यांनाही तुमचे कौतुक वाटले असते, असेही त्या म्हणाल्या.

प्रमुख वक्त्या काॅ. किरण मोघे यांनी कट्टरतावाद कसा पेरला जातो, त्याचा आर्थिक राजकीय हितसंबंधासाठी कसा वापर केला हे, सध्याच्या घडीला चर्चेत असलेल्या तालिबानी दहशतवादाची उदाहरणे देऊन स्पष्ट केले. भारतातील कट्टरतावादाविषयी बोलताना काॅ. किरण मोघे म्हणाल्या, ‘डॉ. दाभोलकर, काॅ. पानसरे, प्रा. कलबुर्गी, लंकेश यांच्या हत्याही याच कट्टरतावाद्यांनी थंड डोक्याने, नियोजनबद्धपणे केल्या आहेत. या चौघांसारखे इतर अनेक सर्वसामान्यही या कट्टरतावादाचे बळी आहेत. २०१४ ला मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर पुण्यात पहिले माॅब लिन्चिग मोहसिन शेख यांचे झाले. त्यानंतर अशा इतक्या घटना घडल्या आहेत की, अशा घटनांबाबत आपल्याला काहीच वाटेनासे झाले आहे. इतके निर्ढावलेपण कट्टरतावादाने आपल्यात निर्माण केले आहे. यावर उपाय म्हणजे जनतेच्या प्रश्नावर काम करणाऱ्या संघटनांनी एकजूट करून कट्टरतावादाला सत्तेपासून दूर ठेवले पाहिजे. तसेच वास्तव समजून घेण्यासाठी आपला अभ्यास, वाचन वाढविले पाहिजे’, असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील अंनिसचे कार्यकर्ते, हितचिंतक या कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी झाले हाेते. कार्यक्रमाची सुरुवात विनोद वायंगणकर यांनी चळवळीचे गीत म्हणून केली. प्रास्ताविक प्रभाकर नानावटी यांनी केले. सूत्रसंचालन राहुल थोरात यांनी केले. आभार अनिल चव्हाण यांनी मानले.