शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

गणेशोत्सवामुळे छोट्या विक्रेत्यांनाही मोठे बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:37 IST

रत्नागिरी : गणेशोत्सवामुळे केवळ दुकानदार आणि मोठे व्यापारीच नाहीत, तर छोट्या विक्रेत्यांनाही चांगले आर्थिक बळ मिळाले आहे. या काळात ...

रत्नागिरी : गणेशोत्सवामुळे केवळ दुकानदार आणि मोठे व्यापारीच नाहीत, तर छोट्या विक्रेत्यांनाही चांगले आर्थिक बळ मिळाले आहे. या काळात मिठाई आणि मोठ्या खरेदीबरोबरच लहान लहान गोष्टींची विक्रीही मोठ्या प्रमाणात झाली आहे.

भाज्यांना मागणी

ऋषीपंचमी, गौरीपूजनासाठी विविध भाज्या, वरीचे तांदूळ, तयार मोदक, वडेपीठ, केळीची पाने, हळदीची पाने, काकडी, चिबूड, नारळ यांचाही खप सर्वाधिक असल्याने उलाढाल बऱ्यापैकी होते. पालेभाज्या, फळभाज्यांना मागणी अधिक होती. गणेशोत्सवामुळे जिल्ह्यातील घरे गजबजलेली असल्याने उत्सवकाळात भाज्यांचा खपही बऱ्यापैकी झाला.

पूजा साहित्याचा खप

काही भाविकांकडे दीड दिवसांच्या गणपतींची प्रतिष्ठापना करण्यात येत असल्याने पहिल्याच दिवशी अन्यथा गणेशोत्सवात श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन केले जाते. अन्य भाविक मात्र गणेशोत्सवात सवडीनुसार श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करीत असतात. पूजेच्या साहित्यामध्ये धूप, अगरबत्ती, कापूर, वस्त्र, बुक्का, तुपाच्या तयार वाती प्रसादासाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी प्राधान्याने केली जाते.

दागिन्यांचीही खरेदी

उत्सवानिमित्त गौरी गणपतीसाठी काही भाविक सोन्या-चांदीचे दागिने, पूजेसाठी ताम्हण, निरांजन, तांब्या, पेला खरेदी करतात. काही भाविक इमिटीशन ज्वेलरी विकत घेत असतात. एकूणच गणेशोत्सवातील विविध वस्तूंच्या खरेदीमुळे बाजारामध्ये कोट्यावधीच्या घरात आर्थिक उलाढाल होते. दरवर्षी संपूर्ण उलाढाल दहा ते बारा कोटीच्या घरात असते. गतवर्षी फारसा प्रतिसाद नव्हता. मात्र, यावर्षी नेहमीप्रमाणे दहा ते बारा कोटींची उलाढाल झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.

.........................

गणेशमूर्ती विक्री व्यवसाय रोखीत असतो. कोरोनामुळे गतवर्षी गणेशमूर्तीचे दर बदलण्यात आले नव्हते. मात्र, साहित्य दरवाढीमुळे ग्राहकांचा विचार करून दरात काही प्रमाणात वाढ करण्यात आली. इंधन दरात वाढ झाली की, शाडू मातीचे दर, उपलब्धता, रंगकाम, सजावट साहित्याच्या दरातही वाढ होते. यावर्षी तर इंधन दरात सातत्याने वाढ झाली असल्याने त्याचा परिणाम साहित्यावर झाला. पर्यायाने मूर्ती दरात वाढ करावी लागली.

- सुशांत गांगण, मूर्तिकार, रत्नागिरी

..................

कोकणात गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात येतो. यावर्षी कोरोना असतानाही बाजारात खरेदीसाठी बऱ्यापैकी गर्दी होती. गणेशोत्सवासाठी आणलेला माल संपला आहे. यावर्षी खरेदीसाठी ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दर्शविल्याने व्यवसाय समाधानकारक झाला.

- आदित्य हेळेकर, विक्रेता, रत्नागिरी

..................

कोरोनासारख्या महामारीमुळे गेले दीड वर्ष व्यापारी आर्थिक संकटात होते. गतवर्षी कोरोनाच्या धसक्याने खरेदीसाठी घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या कमी होती. परंतु यावर्षी कोरोना निर्बंधांचे पालन करीत खरेदीसाठी ग्राहकांनी दाखविलेल्या प्रतिसादामुळे गणेशोत्सवात बऱ्यापैकी उलाढाल झाली.

- सूर्यकांत जाधव, व्यावसायिक, रत्नागिरी