शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यातील खोदाईमुळे पावसाळ्यात रत्नागिरीकरांचे हाेणार हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:29 IST

रत्नागिरी : शहरातील सुधारित नळपाणी याेजनेचे काम लवकरच पूर्ण हाेऊन खराब रस्त्यातून रत्नागिरीकरांची लवकरच सुटका हाेण्याची आशा हाेती. नगराध्यक्षांनीही ...

रत्नागिरी : शहरातील सुधारित नळपाणी याेजनेचे काम लवकरच पूर्ण हाेऊन खराब रस्त्यातून रत्नागिरीकरांची लवकरच सुटका हाेण्याची आशा हाेती. नगराध्यक्षांनीही दाेन महिन्यात रत्नागिरीतील रस्ते गुळगुळीत करण्याचे आश्वासन दिल्याने आशा पल्लवीत झाल्या हाेत्या. मात्र, या कामासाठी डिसेंबरपर्यंत मुदत वाढ देण्यात आल्याने रत्नागिरीकरांना पावसाळ्यात चिखलमय रस्त्याचा त्रास सहन करावा लागणार आहे.

रत्नागिरी नगरपरिषदेतर्फे शहराला करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्याची पाइप लाइन खराब झाल्याने नवीन सुधारित नळपाणी याेजनेचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी शहरातील अनेक भागांत रस्त्याच्या बाजूला खोदाईचे काम करण्यात आले. या खोदाईमुळे अनेक ठिकाणी अर्धा रस्ताच गायब झाला आहे. या नळपाणी याेजनेबराेबरच शहरात गॅस लाइन आणि केबल टाकण्याचे काम हाती घेण्यात आले हाेते. ही कामे पूर्णत्वाला गेली असून, अजूनही नळपाणी याेजनेचे काम पूर्ण झालेले नाही. शीळपासून हे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम ३१ मार्चपर्यंत पूर्ण हाेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले हाेते. त्यामुळे नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांनी दाेन महिन्यांतच शहरातील सर्व रस्ते गुळगुळीत करून नागरिकांचा त्रास कमी करण्याचे आश्वासन दिले हाेते.

नगराध्यक्षांच्या या आश्वासनामुळे पावसाळ्यापूर्वी सर्व रस्ते गुळगुळीत हाेऊन प्रवास सुखकर हाेण्याची आशा निर्माण झाली हाेती. मात्र, नळपाणी याेजनेच्या कामासाठी ठेकेदाराने ३१ डिसेंबरपर्यंत मुदत वाढ मागितली आहे. नगरपरिषदेने ही मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत पावसाळ्याच्या कालावधीत काम करणे मुश्कील हाेणार आहे. त्यातच पावसाळ्यात रस्ता डांबरीकरणाची कामे न करण्याचे निर्देश शासनाकडून दिलेले आहेत. काम पूर्ण झाल्याशिवाय मारलेला चर बुजविताना येणार नाही. अनेक ठिकाणी अजूनही चरामधील माती तशीच ठेवण्यात आली आहे. काही ठिकाणी माती टाकल्याने उंचवटे तयार झाले आहेत. पावसाळ्यातही हे चर, तसेच राहणार असल्याने रस्ता चिखलमय हाेण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे नागरिकांना चिखलमय रस्त्यातूनच प्रवास करावा लागणार आहे.

चाैकट

अपघातांचा धाेका अधिक

अर्धवट राहिलेल्या चरांमधील माती पावसाळ्यात आणखी खाली जाऊन त्याठिकाणी खड्डा पडण्याची भीती अधिक आहे. या खड्डयात पाणी साचल्याच नागरिकांच्या ताे लक्षात येणार नाही. त्यामुळे त्यात वाहन फसण्याचा किंवा पादचारी अडकून पडण्याचा धाेका अधिक आहे. त्यामुळे अपघातांचा धाेका वाढणार आहे.