शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमुक्ती योजनेमुळे जिल्ह्यात १४,७९४ खाती झाली निरंक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:32 IST

रत्नागिरी : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत एकूण अपलोड केलेल्या १८,२०४ शेतकऱ्यांच्या खात्यांपैकी ...

रत्नागिरी : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत एकूण अपलोड केलेल्या १८,२०४ शेतकऱ्यांच्या खात्यांपैकी १५,६९१ शेतकऱ्यांचे अर्ज (२५ मार्चपर्यंत) पात्र ठरले आहेत. त्यापैकी आधार प्रमाणीकरण झालेली खाती १५,१३५ असून ५५५ खात्यांचे प्रमाणीकरण व्हायचे आहे. आतापर्यंत १४,७९४ खात्यांवरील कर्ज माफ झाले असून या शेतकऱ्यांना एकूण ६३ कोटी १६ लाख रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. उर्वरित खात्यांना कर्जमाफीची प्रक्रिया सुरू आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ९४०० खातेदारांना २६ कोटी २५ लाख ३१ हजार ९३० रुपयांची कर्जमाफी झाली आहे. उर्वरित खाती राष्ट्रीय बँका, खासगी बँका, सहकारी बँका यांची आहेत. आधार प्रमाणीकरण न केलेल्या शेतकऱ्यांना १५ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. या कालावधीत प्रमाणीकरण केलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत १४,७९४ शेतकऱ्यांना ६३ कोटी १६ लाख रुपयांची कर्जमाफी झाली आहे. धार प्रमाणीकरण करताना शेतकऱ्यांनी दुसरा आधार क्रमांक, मयत झालेले शेतकरी, वारस तपास रखडलेले अशी खाती यामुळे अडचणी येत आहेत.

- सुधीर कांबळे, अधीक्षक, जिल्हा निबंधक कार्यालय

जिल्हा बँकेची महत्त्वपूर्ण भूमिका

जिल्हा मध्यवर्ती बँक प्रत्येक गावात असल्याने शेतकऱ्यांनी या बँकेत खाती उघडली आहेत. या बँकेच्या माध्यमातून सर्व तालुक्यांमध्ये महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ सर्वाधिक मिळवून देण्यात आला आहे. आतापर्यंत कर्जमुक्ती झालेल्या १४,७९४ शेतकऱ्यांपैकी जिल्हा बँकेकडून ९,४०० शेतकऱ्यांना २६ कोटी २५ लाख ३१ हजार रुपयांची कर्जमाफी झाली.