शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
3
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
4
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
5
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
6
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
7
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
8
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
9
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
10
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
11
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
12
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
13
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
14
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
15
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
16
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
17
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
18
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
19
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
20
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?

कर्जमुक्ती योजनेमुळे जिल्ह्यात १४,७९४ खाती झाली निरंक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:32 IST

रत्नागिरी : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत एकूण अपलोड केलेल्या १८,२०४ शेतकऱ्यांच्या खात्यांपैकी ...

रत्नागिरी : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत एकूण अपलोड केलेल्या १८,२०४ शेतकऱ्यांच्या खात्यांपैकी १५,६९१ शेतकऱ्यांचे अर्ज (२५ मार्चपर्यंत) पात्र ठरले आहेत. त्यापैकी आधार प्रमाणीकरण झालेली खाती १५,१३५ असून ५५५ खात्यांचे प्रमाणीकरण व्हायचे आहे. आतापर्यंत १४,७९४ खात्यांवरील कर्ज माफ झाले असून या शेतकऱ्यांना एकूण ६३ कोटी १६ लाख रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. उर्वरित खात्यांना कर्जमाफीची प्रक्रिया सुरू आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ९४०० खातेदारांना २६ कोटी २५ लाख ३१ हजार ९३० रुपयांची कर्जमाफी झाली आहे. उर्वरित खाती राष्ट्रीय बँका, खासगी बँका, सहकारी बँका यांची आहेत. आधार प्रमाणीकरण न केलेल्या शेतकऱ्यांना १५ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. या कालावधीत प्रमाणीकरण केलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत १४,७९४ शेतकऱ्यांना ६३ कोटी १६ लाख रुपयांची कर्जमाफी झाली आहे. धार प्रमाणीकरण करताना शेतकऱ्यांनी दुसरा आधार क्रमांक, मयत झालेले शेतकरी, वारस तपास रखडलेले अशी खाती यामुळे अडचणी येत आहेत.

- सुधीर कांबळे, अधीक्षक, जिल्हा निबंधक कार्यालय

जिल्हा बँकेची महत्त्वपूर्ण भूमिका

जिल्हा मध्यवर्ती बँक प्रत्येक गावात असल्याने शेतकऱ्यांनी या बँकेत खाती उघडली आहेत. या बँकेच्या माध्यमातून सर्व तालुक्यांमध्ये महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ सर्वाधिक मिळवून देण्यात आला आहे. आतापर्यंत कर्जमुक्ती झालेल्या १४,७९४ शेतकऱ्यांपैकी जिल्हा बँकेकडून ९,४०० शेतकऱ्यांना २६ कोटी २५ लाख ३१ हजार रुपयांची कर्जमाफी झाली.