शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

एका अर्जामुळे विषय समितीच्या निवडीत रंगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:30 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या १२ सदस्यांसाठी १४ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवड प्रक्रियेत चुरस ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या १२ सदस्यांसाठी १४ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवड प्रक्रियेत चुरस निर्माण झाली होती. मात्र, अखेरीस सिद्धी पवार यांनी स्थायी आणि कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने सर्व निवडी बिनविराेध पार पडल्या. जिल्हा परिषदेच्या स्थायी, कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध विकास समिती, महिला व बाल कल्याण, समाजकल्याण समितीतील सदस्यांनी राजीनामे दिल्याने एकूण १२ पदे रिक्त हाेती. त्यातील स्थायी समितीच्या रिक्त २ जागांसाठी ३ तर कृषी समितीच्या ३ जागांसाठी ४ अर्ज दाखल झाले होते. या दोन्ही समितीसाठी सिद्धी पवार यांनी अर्ज दाखल केला होता. त्यांना दिशा दाभोलकर यांचे सूचक अनुमोदन होते.

स्थायीसह कृषी वगळता अन्य जागांसाठी मात्र रिक्त पदांएवढेच अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे स्थायी आणि कृषी समितीच्या निवडीबद्दल उत्सुकता लागली होती. मात्र, सिद्धी पवार यांनी आपले दोन्ही अर्ज मागे घेतल्यानंतर स्थायी, कृषीसह सर्व समिती सदस्य निवड बिनविरोध पार पडली.

स्थायी समितीमध्ये रोहन बने व महेश म्हाप यांची निवड झाली. कृषी समितीमध्ये जयसिंग माने, मानसी जगदाळे आणि संजना माने यांची निवड झाली. पशुसंवर्धन व दुग्धविकास समितीमध्ये मानसी आंबेकर व पूर्वी निमणूकर यांची निवड झाली आहे. महिला व बालकल्याण समितीमध्ये रजनी चिंगळे व ॠतुजा जाधव यांची निवड झाली आहे. समाजकल्याण समितीमध्ये महेश नाटेकर व सुनील मोरे यांची निवड झाली आहे. ही निवड प्रक्रिया जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.