शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

एका अर्जामुळे विषय समितीच्या निवडीत रंगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:30 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या १२ सदस्यांसाठी १४ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवड प्रक्रियेत चुरस ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या १२ सदस्यांसाठी १४ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवड प्रक्रियेत चुरस निर्माण झाली होती. मात्र, अखेरीस सिद्धी पवार यांनी स्थायी आणि कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने सर्व निवडी बिनविराेध पार पडल्या. जिल्हा परिषदेच्या स्थायी, कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध विकास समिती, महिला व बाल कल्याण, समाजकल्याण समितीतील सदस्यांनी राजीनामे दिल्याने एकूण १२ पदे रिक्त हाेती. त्यातील स्थायी समितीच्या रिक्त २ जागांसाठी ३ तर कृषी समितीच्या ३ जागांसाठी ४ अर्ज दाखल झाले होते. या दोन्ही समितीसाठी सिद्धी पवार यांनी अर्ज दाखल केला होता. त्यांना दिशा दाभोलकर यांचे सूचक अनुमोदन होते.

स्थायीसह कृषी वगळता अन्य जागांसाठी मात्र रिक्त पदांएवढेच अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे स्थायी आणि कृषी समितीच्या निवडीबद्दल उत्सुकता लागली होती. मात्र, सिद्धी पवार यांनी आपले दोन्ही अर्ज मागे घेतल्यानंतर स्थायी, कृषीसह सर्व समिती सदस्य निवड बिनविरोध पार पडली.

स्थायी समितीमध्ये रोहन बने व महेश म्हाप यांची निवड झाली. कृषी समितीमध्ये जयसिंग माने, मानसी जगदाळे आणि संजना माने यांची निवड झाली. पशुसंवर्धन व दुग्धविकास समितीमध्ये मानसी आंबेकर व पूर्वी निमणूकर यांची निवड झाली आहे. महिला व बालकल्याण समितीमध्ये रजनी चिंगळे व ॠतुजा जाधव यांची निवड झाली आहे. समाजकल्याण समितीमध्ये महेश नाटेकर व सुनील मोरे यांची निवड झाली आहे. ही निवड प्रक्रिया जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.