शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

पावसाअभावी पुराचा धोका टळला

By admin | Updated: November 1, 2015 22:55 IST

राजापूरची पूर समस्या : पुराची टांगती तलवार कायम; गाळाचा प्रश्न ‘जैसे थे’

राजापूर : सरत्या पावसाळ्यात नेहमीपेक्षा कमी पाऊस पडल्याने यावर्षी एकदाही पुराचे पाणी शहरात भरले नाही. तरीही भविष्यातील पुराची टांगती तलवार काही दूर झालेली नाही. त्यामुळे नदीपात्रातील गाळाचा उपसा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत राजापूरकरांवरील पुराचे संकट कायम आहे. त्यामुळे आगामी काळात तरी शहरातील गाळ उपश्याचे अर्धवट राहिलेले काम मार्गी लागेल का हाच खरा सवाल आहे. मागील अनेक वर्षे राजापूर शहराला पुराच्या विळख्याचा त्रास सहन करावा लागत असून, दरवर्षी पावसाळ्यातून किमान चार ते पाचवेळा राजापूरवासियांना या अग्नीदिव्यातून जावे लागते. त्याचा परिणाम हा संपूर्ण शहराच्या जनजीवनावर होतो. सन १९८२ व सन १९९७मध्ये सर्वात मोठा पुराचा फटका या शहराला बसला होता. त्यामुळे पावसाळा सुरु झाला की, राजापूरच्या नदीकाठावरील समस्त नागरिक व व्यापारी यांना रात्रन्रात्र जागून काढावी लागते. मागील अनेक वर्षात या पुराने राजापूरवासियांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. नेमकी हीच अडचण लक्षात घेऊन राजापूरचे तत्कालीन आमदार गणपत कदम यांनी याबाबत सातत्याने आवाज उठवत शासनाकडे पाठपुरावा सुरुच ठेवला होता व अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. शासनाने कोदवली व अर्जुना या दोन नद्यांतील गाळ उपशाला सुरूवात करण्यात आली. त्यासाठी शासनाने सुमारे दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला. हे काम शासनाकडून कोल्हापूरच्या जलसंपदा अभियांत्रिकी विभाग, तिलारी यांनी देण्यात आले. तिलारी विभाग स्वत:कडील यंत्रसामुग्री वापरणार असल्याने शासनाला केवळ इंधनाचा खर्च द्यावा लागणार होता. त्यानुसार नियोजित कामाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले व एकूण १ लाख ९८ हजार ७७२ घनमीटर एवढा उपसा करण्याचे ठरले. २००९ साली प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली. त्यावेळी केवळ ६५हजार घनमीटर गाळाचा उपसा करण्यात आला. मात्र, पुढील तीन वर्षात कामात थोडी गती आली व जवळपास ९८हजार घनमीटर गाळाचा उपसा झाला. त्यासाठी ४१ लाख ६१ हजार १४३ एवढा खर्च झाला होता. अजून एक लाख घनमीटर गाळाचा उपसा बाकी होता. या कालावधीत उपसलेला गाळ नद्यांच्या दुतर्फा डंपिंग करुन ठेवण्यात आला. मात्र, त्यानंतर आलेल्या पुराच्या पाण्यात बराचसा गाळ पुन्हा नदीपात्रात सामावला. त्यानंतर मागील पाच ते सहा वर्षात गाळ उपशाच्या कामाला सुरूवात झालेली नाही. शहरातील पुराला कारणीभूत ठरणाऱ्या दोन नदीपात्रांतील गाळाचा उपसा करण्यात आल्यानंतर शहरात घुसणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी झाले होते. यापूर्वी ज्या वेगाने पुराचे पाणी शहरात घुसायचे तेवढी गती नंतर राहिली नाही. त्यामुळे शासनाने राहिलेल्या गाळाचा उपसा तत्काळ केल्यास राजापूरकरांवरील पुराचे संकट कायमचे दूर होईल. (प्रतिनिधी) पुराची समस्या : शहराच्या जनजीवनावर परिणाम राजापूर शहरातील पुराची समस्या कायम आहे. सन १९८२ आणि १९९७ मध्ये शहरात सर्वात मोठा पूर आला होता. या पुराचा फटका शहरातील व्यापाऱ्यांना अनेकवेळा बसला आहे. खर्ली पात्रातून हे पुराचे पाणी जवाहर चौकापर्यंत येऊन शहराला पुराचा विळखा बसतो. त्यामुळे जनजीवन विस्कळीत होते.