शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी पुराचा धोका टळला

By admin | Updated: November 1, 2015 22:55 IST

राजापूरची पूर समस्या : पुराची टांगती तलवार कायम; गाळाचा प्रश्न ‘जैसे थे’

राजापूर : सरत्या पावसाळ्यात नेहमीपेक्षा कमी पाऊस पडल्याने यावर्षी एकदाही पुराचे पाणी शहरात भरले नाही. तरीही भविष्यातील पुराची टांगती तलवार काही दूर झालेली नाही. त्यामुळे नदीपात्रातील गाळाचा उपसा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत राजापूरकरांवरील पुराचे संकट कायम आहे. त्यामुळे आगामी काळात तरी शहरातील गाळ उपश्याचे अर्धवट राहिलेले काम मार्गी लागेल का हाच खरा सवाल आहे. मागील अनेक वर्षे राजापूर शहराला पुराच्या विळख्याचा त्रास सहन करावा लागत असून, दरवर्षी पावसाळ्यातून किमान चार ते पाचवेळा राजापूरवासियांना या अग्नीदिव्यातून जावे लागते. त्याचा परिणाम हा संपूर्ण शहराच्या जनजीवनावर होतो. सन १९८२ व सन १९९७मध्ये सर्वात मोठा पुराचा फटका या शहराला बसला होता. त्यामुळे पावसाळा सुरु झाला की, राजापूरच्या नदीकाठावरील समस्त नागरिक व व्यापारी यांना रात्रन्रात्र जागून काढावी लागते. मागील अनेक वर्षात या पुराने राजापूरवासियांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. नेमकी हीच अडचण लक्षात घेऊन राजापूरचे तत्कालीन आमदार गणपत कदम यांनी याबाबत सातत्याने आवाज उठवत शासनाकडे पाठपुरावा सुरुच ठेवला होता व अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. शासनाने कोदवली व अर्जुना या दोन नद्यांतील गाळ उपशाला सुरूवात करण्यात आली. त्यासाठी शासनाने सुमारे दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला. हे काम शासनाकडून कोल्हापूरच्या जलसंपदा अभियांत्रिकी विभाग, तिलारी यांनी देण्यात आले. तिलारी विभाग स्वत:कडील यंत्रसामुग्री वापरणार असल्याने शासनाला केवळ इंधनाचा खर्च द्यावा लागणार होता. त्यानुसार नियोजित कामाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले व एकूण १ लाख ९८ हजार ७७२ घनमीटर एवढा उपसा करण्याचे ठरले. २००९ साली प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली. त्यावेळी केवळ ६५हजार घनमीटर गाळाचा उपसा करण्यात आला. मात्र, पुढील तीन वर्षात कामात थोडी गती आली व जवळपास ९८हजार घनमीटर गाळाचा उपसा झाला. त्यासाठी ४१ लाख ६१ हजार १४३ एवढा खर्च झाला होता. अजून एक लाख घनमीटर गाळाचा उपसा बाकी होता. या कालावधीत उपसलेला गाळ नद्यांच्या दुतर्फा डंपिंग करुन ठेवण्यात आला. मात्र, त्यानंतर आलेल्या पुराच्या पाण्यात बराचसा गाळ पुन्हा नदीपात्रात सामावला. त्यानंतर मागील पाच ते सहा वर्षात गाळ उपशाच्या कामाला सुरूवात झालेली नाही. शहरातील पुराला कारणीभूत ठरणाऱ्या दोन नदीपात्रांतील गाळाचा उपसा करण्यात आल्यानंतर शहरात घुसणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी झाले होते. यापूर्वी ज्या वेगाने पुराचे पाणी शहरात घुसायचे तेवढी गती नंतर राहिली नाही. त्यामुळे शासनाने राहिलेल्या गाळाचा उपसा तत्काळ केल्यास राजापूरकरांवरील पुराचे संकट कायमचे दूर होईल. (प्रतिनिधी) पुराची समस्या : शहराच्या जनजीवनावर परिणाम राजापूर शहरातील पुराची समस्या कायम आहे. सन १९८२ आणि १९९७ मध्ये शहरात सर्वात मोठा पूर आला होता. या पुराचा फटका शहरातील व्यापाऱ्यांना अनेकवेळा बसला आहे. खर्ली पात्रातून हे पुराचे पाणी जवाहर चौकापर्यंत येऊन शहराला पुराचा विळखा बसतो. त्यामुळे जनजीवन विस्कळीत होते.