शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

उपरच्या वाऱ्यामुळे समुद्र खवळलेलाच

By admin | Updated: December 24, 2015 00:34 IST

मच्छिमारीवर गंभीर परिणाम : जोर कमी होण्याची प्रतीक्षा; खराब वातावरणामुळे नौका बंदरात उभ्या

देवगड : देवगड तालुक्यात दुसऱ्या दिवशीही उपरच्या वाऱ्यामुळे समुद्र खवळलेला असून, या वातावरणामुळे मच्छिमारी व्यवसायावर गंभीर परिणाम झाला आहे. वाऱ्याचा जोर कमी झाल्यानंतरच समुद्रातील मच्छिमारी पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.उपरच्या वाऱ्यामुळे सध्या समुद्र खवळला आहे. या खराब वातावरणामुळे समुद्रात मच्छिमारीसाठी गेलेल्या नौकाही बंदरात परत येत आहेत. दरवर्षीप्रमाणे यात्रा सुरू झाल्यावर उपरचा वारा जोरात वाहू लागतो. मात्र, वातावरण निवळल्यावर मच्छिमारांना मासळी चांगल्या प्रमाणात मिळते, असा मच्छिमारांचा अनुभव आहे. नारळी पौर्णिमेनंतर काही नौकामालकांनी आपल्या नौका समुद्रात लोटल्या. परंतु, वातावरणात अचानक झालेल्या बदलामुळे समुद्रातील वातावरणही बिघडले व पर्यायाने या वातावरणाचा परिणाम मच्छिमारी व्यवसायावर झाला.मच्छिमारी व्यवसाय करणाऱ्या मोठ्या नौकाधारकांना कर्मचाऱ्यांचा पगार तसेच जेवणखाणे यांचा खर्च मोठा असल्याने व मासळीचे प्रमाण कमी झाल्यामुळे आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. समुद्रातील वातावरणातही वारंवार होत असलेल्या बदलाचा मच्छिमारीवर परिणाम होत असून, या वातावरणामुळे नौका मच्छिमारीसाठी न पाठवता बंदरातच उभ्या करून ठेवाव्या लागत आहेत.खाडीमध्येही पारंपरिक मच्छिमारी करणाऱ्या मच्छिमारांना मासळी मिळण्याचे प्रमाण कमी झाल्याने हा व्यवसायही संकटात आहे. खाडीत मिळणारे मुळे, तिसरे यांचे प्रमाणही कमी झाल्याने मच्छिमारीलाच पूरक असणारे हे छोटे व्यवसायही सध्या बंद आहेत. (प्रतिनिधी)दरवर्षीप्रमाणे यात्रा सुरू झाल्यावर वारा जोरात.अचानक झालेल्या बदलामुळे वातावरणातही बदल.मच्छिमारांना मासळी मिळण्याचे प्रमाण कमी.छोटे व्यवसायही सध्या बंद आहेत.