शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांवर शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:31 IST

रत्नागिरी : कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे सर्वच क्षेत्रांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले ...

रत्नागिरी : कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे सर्वच क्षेत्रांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे महत्त्वाच्या कामाव्यतिरिक्त बाहेर फिरणाऱ्यांची संख्या फार कमी झाली आहे. त्यामुळे रस्त्यांवर शुकशुकाट आहे.

पोलीस यंत्रणा राबतेय सुरक्षिततेसाठी

रत्नागिरी : कोरोनाच्या कालावधीत शासनाने निर्बंध लादलेले असतानाही अनेकजण रस्त्यांवर फिरताना दिसत होते. त्यामुळे विनाकारण रस्त्यांवर फिरताना आढळणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात येत आहे. तसेच त्यांची कोरोना चाचणीही करण्यात येत आहे. तरीही पोलीस यंत्रणा लोकांच्या सुरक्षिततेसाठी २४ तास राबत आहे.

खोदाईचे काम शुक्रवारी बंद

रत्नागिरी : शहरात पाईपलाईन घालण्याचे काम जोरात सुरु आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या कामाची गती कमी झाली आहे. तरीही हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने ठेकेदार प्रयत्नशील आहे. शुक्रवारी रत्नागिरी - मजगाव रस्त्यावर सुरु असलेले खोदाईचे काम बंद ठेवण्यात आले होते.

रस्त्यावर ठिकठिकाणी फळविक्रेते

रत्नागिरी : हातावर पोट असणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. दररोजच्या कमाईवर रोजचा जिन्नस आणून संसार चालविणारे अनेक जण आहेत. कोरोनामुळे अत्यावश्यक सेवा मर्यादित वेळेसाठी सुरु ठेवण्यात आल्या आहेत. शहर परिसरामध्ये फळविक्रेते हातगाड्या घेऊन फिरतानाचे चित्र पाहावयास मिळते.

सर्वच गार्डन बंद

रत्नागिरी : नेहमी सायंकाळच्या सुमारास गजबजणारी गार्डन कोरोनामुळे बंद ठेवण्यात आली आहेत. लोक नेहमीच सायंकाळी शांत वातावरणात फिरण्यासाठी गार्डनमध्ये जात होते. हजारो लोक शहरातील वेगवेगळया गार्डनमध्ये फिरताना दिसत होते. मात्र, ही गार्डन सध्या बंद ठेवण्यात आली आहेत.

खासगी दवाखान्यांमध्ये रुग्ण घटले

रत्नागिरी : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने भीतीमुळे लोकांनी खासगी डॉक्टरांकडे आजारपणातही जाणे कमी केले आहे. खासगी डॉक्टरकडे रुग्ण उपचारासाठी गेल्यावर त्यांनी शासनाला कळविल्यास कोरोना रुग्ण समजून घेऊन जातील, असा गैरसमज लोकांमध्ये पसरला आहे.

थंड पेयांचा व्यवसाय ठप्प

रत्नागिरी : कडक उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये थंड पेये, बाटली बंद पाणी यांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. गतवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने एप्रिल, मे मध्ये थंड पेयांच्या व्यवसायावर संक्रांत आली होती. त्याप्रमाणेच यंदाही कोरोनामुळे थंड पेयांचा व्यवसाय ठप्प झाला आहे.