शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

रस्त्यांवर शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:31 IST

रत्नागिरी : कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे सर्वच क्षेत्रांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले ...

रत्नागिरी : कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे सर्वच क्षेत्रांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे महत्त्वाच्या कामाव्यतिरिक्त बाहेर फिरणाऱ्यांची संख्या फार कमी झाली आहे. त्यामुळे रस्त्यांवर शुकशुकाट आहे.

पोलीस यंत्रणा राबतेय सुरक्षिततेसाठी

रत्नागिरी : कोरोनाच्या कालावधीत शासनाने निर्बंध लादलेले असतानाही अनेकजण रस्त्यांवर फिरताना दिसत होते. त्यामुळे विनाकारण रस्त्यांवर फिरताना आढळणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात येत आहे. तसेच त्यांची कोरोना चाचणीही करण्यात येत आहे. तरीही पोलीस यंत्रणा लोकांच्या सुरक्षिततेसाठी २४ तास राबत आहे.

खोदाईचे काम शुक्रवारी बंद

रत्नागिरी : शहरात पाईपलाईन घालण्याचे काम जोरात सुरु आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या कामाची गती कमी झाली आहे. तरीही हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने ठेकेदार प्रयत्नशील आहे. शुक्रवारी रत्नागिरी - मजगाव रस्त्यावर सुरु असलेले खोदाईचे काम बंद ठेवण्यात आले होते.

रस्त्यावर ठिकठिकाणी फळविक्रेते

रत्नागिरी : हातावर पोट असणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. दररोजच्या कमाईवर रोजचा जिन्नस आणून संसार चालविणारे अनेक जण आहेत. कोरोनामुळे अत्यावश्यक सेवा मर्यादित वेळेसाठी सुरु ठेवण्यात आल्या आहेत. शहर परिसरामध्ये फळविक्रेते हातगाड्या घेऊन फिरतानाचे चित्र पाहावयास मिळते.

सर्वच गार्डन बंद

रत्नागिरी : नेहमी सायंकाळच्या सुमारास गजबजणारी गार्डन कोरोनामुळे बंद ठेवण्यात आली आहेत. लोक नेहमीच सायंकाळी शांत वातावरणात फिरण्यासाठी गार्डनमध्ये जात होते. हजारो लोक शहरातील वेगवेगळया गार्डनमध्ये फिरताना दिसत होते. मात्र, ही गार्डन सध्या बंद ठेवण्यात आली आहेत.

खासगी दवाखान्यांमध्ये रुग्ण घटले

रत्नागिरी : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने भीतीमुळे लोकांनी खासगी डॉक्टरांकडे आजारपणातही जाणे कमी केले आहे. खासगी डॉक्टरकडे रुग्ण उपचारासाठी गेल्यावर त्यांनी शासनाला कळविल्यास कोरोना रुग्ण समजून घेऊन जातील, असा गैरसमज लोकांमध्ये पसरला आहे.

थंड पेयांचा व्यवसाय ठप्प

रत्नागिरी : कडक उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये थंड पेये, बाटली बंद पाणी यांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. गतवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने एप्रिल, मे मध्ये थंड पेयांच्या व्यवसायावर संक्रांत आली होती. त्याप्रमाणेच यंदाही कोरोनामुळे थंड पेयांचा व्यवसाय ठप्प झाला आहे.