शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
3
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
4
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
5
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
6
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
7
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
8
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
9
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?
10
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
11
पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?
12
या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  
13
Share Market Updates 7 August: ट्रम्प टॅरिफ बॉम्बमुळे शेअर बाजार कोसळला, Sensex ८०००० अंकांच्या खाली
14
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
15
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
16
Aashna Chaudhary : जिद्दीला सॅल्यूट! अपयशाने खचली नाही, IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण, आता मिळाली मोठी जबाबदारी
17
बेवफा सोनिया...! प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; १ वर्ष कुणालाही नाही कळलं, पण एका चुकीनं...
18
कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
19
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
20
Raksha Bandhan 2025 Wishes: रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा; प्रेमळ Messages, Status आणि भावपूर्ण Greetings पाठवा आपल्या बहीण-भावाला

रस्त्यांवर शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:31 IST

रत्नागिरी : कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे सर्वच क्षेत्रांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले ...

रत्नागिरी : कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे सर्वच क्षेत्रांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे महत्त्वाच्या कामाव्यतिरिक्त बाहेर फिरणाऱ्यांची संख्या फार कमी झाली आहे. त्यामुळे रस्त्यांवर शुकशुकाट आहे.

पोलीस यंत्रणा राबतेय सुरक्षिततेसाठी

रत्नागिरी : कोरोनाच्या कालावधीत शासनाने निर्बंध लादलेले असतानाही अनेकजण रस्त्यांवर फिरताना दिसत होते. त्यामुळे विनाकारण रस्त्यांवर फिरताना आढळणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात येत आहे. तसेच त्यांची कोरोना चाचणीही करण्यात येत आहे. तरीही पोलीस यंत्रणा लोकांच्या सुरक्षिततेसाठी २४ तास राबत आहे.

खोदाईचे काम शुक्रवारी बंद

रत्नागिरी : शहरात पाईपलाईन घालण्याचे काम जोरात सुरु आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या कामाची गती कमी झाली आहे. तरीही हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने ठेकेदार प्रयत्नशील आहे. शुक्रवारी रत्नागिरी - मजगाव रस्त्यावर सुरु असलेले खोदाईचे काम बंद ठेवण्यात आले होते.

रस्त्यावर ठिकठिकाणी फळविक्रेते

रत्नागिरी : हातावर पोट असणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. दररोजच्या कमाईवर रोजचा जिन्नस आणून संसार चालविणारे अनेक जण आहेत. कोरोनामुळे अत्यावश्यक सेवा मर्यादित वेळेसाठी सुरु ठेवण्यात आल्या आहेत. शहर परिसरामध्ये फळविक्रेते हातगाड्या घेऊन फिरतानाचे चित्र पाहावयास मिळते.

सर्वच गार्डन बंद

रत्नागिरी : नेहमी सायंकाळच्या सुमारास गजबजणारी गार्डन कोरोनामुळे बंद ठेवण्यात आली आहेत. लोक नेहमीच सायंकाळी शांत वातावरणात फिरण्यासाठी गार्डनमध्ये जात होते. हजारो लोक शहरातील वेगवेगळया गार्डनमध्ये फिरताना दिसत होते. मात्र, ही गार्डन सध्या बंद ठेवण्यात आली आहेत.

खासगी दवाखान्यांमध्ये रुग्ण घटले

रत्नागिरी : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने भीतीमुळे लोकांनी खासगी डॉक्टरांकडे आजारपणातही जाणे कमी केले आहे. खासगी डॉक्टरकडे रुग्ण उपचारासाठी गेल्यावर त्यांनी शासनाला कळविल्यास कोरोना रुग्ण समजून घेऊन जातील, असा गैरसमज लोकांमध्ये पसरला आहे.

थंड पेयांचा व्यवसाय ठप्प

रत्नागिरी : कडक उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये थंड पेये, बाटली बंद पाणी यांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. गतवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने एप्रिल, मे मध्ये थंड पेयांच्या व्यवसायावर संक्रांत आली होती. त्याप्रमाणेच यंदाही कोरोनामुळे थंड पेयांचा व्यवसाय ठप्प झाला आहे.