शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

नाट्य स्पर्धेच्या तिकिटांमधून दीड लाखांचा सूर

By admin | Updated: February 7, 2015 00:15 IST

राज्य संगीत नाट्य स्पर्धा : रत्नागिरीकर नाट्यरसिकांनी दिला भरभरून प्रतिसाद

रत्नागिरी : महाराष्ट्र् राज्य हौशी संगीत नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी रत्नागिरी केंद्रावरती पार पडली. १६ ते ४ फेब्रुवारीअखेर सादर करण्यात आलेल्या संगीत नाटकांची १ लाख ४८ हजार ५८५ रुपयांची तिकिट विक्री झाली आहे.संगीत नाट्य स्पर्धेसाठी प्रेक्षकांचा प्रतीसाद उत्स्फूर्त होता. तिकिटे संपल्यामुळे हाऊसफुल्लचे बोर्डही लावण्यात आले होते. अनेक नाट्यरसिकांना तिकिटे न मिळाल्यामुळे हिरमोडही झाला. संगीत मत्स्यगंधा हा प्रयोग दि. १६ रोजी आश्रय सेवा संस्थेने सादर केला. त्यादिवशी ९ हजार ८२० रूपयांची तिकिट विक्री झाली. १७ रोजी सौभद्र नाट्य प्रयोगाची ९ हजार ८६० रुपयांची तिकिटे संपली. १९ रोजी संत सोहिरोबानाथ नाटकाची ५ हजार १७० रुपये तर २० रोजी संगीत एकच प्याला नाटकाची ९ हजार ४७० रुपयांची तिकिटे संपली.दि. २१ रोजी खल्वायनने सादर केलेल्या प्रिती संगमची १० हजार ९८५ रुपयांची तिकिटे संपली. संगीत धन्य ते गायनी कला नाटकाची ५ हजार ९९५ रुपयांची तर संगीत तुक्याची आवली ४ हजार ९६५ रुपयांची तिकिट विक्री झाली. संगीत पंढरपूर ४ हजार ८९५, संगीत शारदा ८ हजार ९८०, संगीत स्वयंवर ११ हजार ३२५ रुपयांची तिकिट विक्री झाली. गीता गाती ज्ञानेश्वर नाटकाची ३,९३५ रुपयांची तिकिटे संपली. चंद्र लपला मेघावरी नाटकाची ५ हजार ३५ रुपये तर संगीत मत्स्यगंधाची ११ हजार ७८० रुपयांची तिकिटविक्री झाली. संगीत संशयकल्लोळची १० हजार ७२० तर लावणी भुलली अभंगाला १० हजार ४०, संगीत ययाती देवयानी नाटकाची १० हजार ३४५ रुपयांची तिकिटे संपली. लावणी भुलली अभंगाला या नाट्यप्रयोगाची ७ हजार ८१५ तर संगीत स्वर्गहरण नाटकाची ७ हजार ४२० रुपयांची तिकिट विक्री झाली. सर्वात अधिक तिकिट विक्री संगीत मत्स्यगंधा नाटकाची झाली. या स्पर्धेमुळे महाराष्ट्र शासन सांस्कृ तिक कार्य संचालनालयास ७४ हजार ७९४ रुपयांचा महसूल मिळाला आहे.गतवर्षी संगीत नाट्य स्पर्धेत खल्वायनने राज्यात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल संगीत नाट्य स्पर्धेचे यजमानपद परत रत्नागिरीकरांना प्राप्त झाले होते. गतवर्षीपासून दर्जेदार संगीत नाटकांचा आस्वाद रत्नागिरीकरांना मिळू लागला आहे. (प्रतिनिधी)