शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या डोसला उशीर झाला तरी अजिबात घाबरू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:34 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : सर्वत्र १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लस देण्यास केंद्र सरकारने सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : सर्वत्र १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लस देण्यास केंद्र सरकारने सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य यंत्रणेतील डाॅक्टर्स तसेच परिचारिका यांना लसीकरण करण्यात आले. त्यानंतर पहिल्या फळीतील पोलीस, महसूल आदी कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. त्यानंतर १ मार्चपासून कोमाॅर्बिड आणि ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, लसचा अपुरा साठा असतानाही आता केंद्र सरकारने १८ वर्षांवरील व्यक्तींना लस देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे ज्यांचा पहिला डोस झाला आहे, त्यांना आपल्याला दुसरा डोस मिळेल ना, ही चिंता मोठ्या प्रमाणावर लागून राहिली आहे. मात्र, दुसऱ्या डोसला उशीर झाला तरी घाबरण्याचे कारण नाही, असा दिलासा आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने सुरक्षा कवच म्हणून लसीकरण हा प्रभावी उपाय असल्याने केंद्र सरकारच्या सूचनेनुसार राज्य सरकारने आता लसीकरण मोहिमेवर लक्ष केंद्रीत केले आहे. मात्र, सध्या लसचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे.

त्यातच आता केंद्र सरकारने १८ ते ४४ वयोगटांतील सर्व व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सध्या ४५ वर्षांवरील व्यक्तींसाठी पहिला डोस थांबविण्यात आला असून दुसरा डोस घेणाऱ्यांनाही सध्या डोस मिळेनासा झाला आहे.

राज्यात कोरोना लसचा पुरवठा कमी असल्याने आता दुसरा डोस घेणाऱ्यांना आपला दुसरा डोस वेळेत मिळेल ना, ही चिंता लागून राहिली आहे. मात्र, दुसऱ्या डोससाठी वेळ लागला तरी घाबरू नका, असा सल्ला आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

पूर्वी पहिली लस घेतल्यानंतर २८ दिवसांनंतर दुसरी लस घ्यावी, असे म्हटले जात होते. मात्र, पहिली लस घेतल्यानंतर किमान १४ दिवसांनंतर त्या व्यक्तीच्या शरीरात ॲंटिबाॅडिज निर्माण होतात. त्यामुळे आता दोन लसीमधील कालावधी वाढविण्यात आला आहे. लसीचा प्रभाव वाढण्यासाठी दोन लसीमध्ये अगदी सहा आठवड्यांचा किंवा दोन महिन्यांचा कालावधी जरी गेला तरीही घाबरण्याचे कारण नाही, अशी प्रतिक्रिया जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. संघमित्रा फुले यांनी व्यक्त केली आहे.

दुसऱ्या डोससाठी एक आठवडा थांबा

राज्यात लसचा अपुरा साठा सध्या असला तरी थोड्याच दिवसांत आणखी लस जिल्ह्यासाठीही उपलब्ध होणार आहे. दुसऱ्या डोससाठी आठवडाभरात पुरेशी लस येण्याची शक्यता आरोग्य विभागाने वर्तविली आहे.