शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

दुसऱ्या डोसला उशीर झाला तरी अजिबात घाबरू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:34 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : सर्वत्र १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लस देण्यास केंद्र सरकारने सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : सर्वत्र १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लस देण्यास केंद्र सरकारने सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य यंत्रणेतील डाॅक्टर्स तसेच परिचारिका यांना लसीकरण करण्यात आले. त्यानंतर पहिल्या फळीतील पोलीस, महसूल आदी कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. त्यानंतर १ मार्चपासून कोमाॅर्बिड आणि ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, लसचा अपुरा साठा असतानाही आता केंद्र सरकारने १८ वर्षांवरील व्यक्तींना लस देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे ज्यांचा पहिला डोस झाला आहे, त्यांना आपल्याला दुसरा डोस मिळेल ना, ही चिंता मोठ्या प्रमाणावर लागून राहिली आहे. मात्र, दुसऱ्या डोसला उशीर झाला तरी घाबरण्याचे कारण नाही, असा दिलासा आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने सुरक्षा कवच म्हणून लसीकरण हा प्रभावी उपाय असल्याने केंद्र सरकारच्या सूचनेनुसार राज्य सरकारने आता लसीकरण मोहिमेवर लक्ष केंद्रीत केले आहे. मात्र, सध्या लसचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे.

त्यातच आता केंद्र सरकारने १८ ते ४४ वयोगटांतील सर्व व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सध्या ४५ वर्षांवरील व्यक्तींसाठी पहिला डोस थांबविण्यात आला असून दुसरा डोस घेणाऱ्यांनाही सध्या डोस मिळेनासा झाला आहे.

राज्यात कोरोना लसचा पुरवठा कमी असल्याने आता दुसरा डोस घेणाऱ्यांना आपला दुसरा डोस वेळेत मिळेल ना, ही चिंता लागून राहिली आहे. मात्र, दुसऱ्या डोससाठी वेळ लागला तरी घाबरू नका, असा सल्ला आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

पूर्वी पहिली लस घेतल्यानंतर २८ दिवसांनंतर दुसरी लस घ्यावी, असे म्हटले जात होते. मात्र, पहिली लस घेतल्यानंतर किमान १४ दिवसांनंतर त्या व्यक्तीच्या शरीरात ॲंटिबाॅडिज निर्माण होतात. त्यामुळे आता दोन लसीमधील कालावधी वाढविण्यात आला आहे. लसीचा प्रभाव वाढण्यासाठी दोन लसीमध्ये अगदी सहा आठवड्यांचा किंवा दोन महिन्यांचा कालावधी जरी गेला तरीही घाबरण्याचे कारण नाही, अशी प्रतिक्रिया जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. संघमित्रा फुले यांनी व्यक्त केली आहे.

दुसऱ्या डोससाठी एक आठवडा थांबा

राज्यात लसचा अपुरा साठा सध्या असला तरी थोड्याच दिवसांत आणखी लस जिल्ह्यासाठीही उपलब्ध होणार आहे. दुसऱ्या डोससाठी आठवडाभरात पुरेशी लस येण्याची शक्यता आरोग्य विभागाने वर्तविली आहे.