शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' माशांना वाचवण्यासाठी बांगलादेशनं उतरवलं सैन्य दल; बंगालच्या खाडीत पाठवल्या १७ युद्धनौका
2
‘कोस्टल’वर थेट १४० चा हायस्पीड: ...तर मग गुन्हाच होईल दाखल; वाहतूक पोलिसांकडून दिवसाला ५०० ई-चालानची कारवाई
3
FD करुन तुम्ही कधीही श्रीमंत होणार नाही? CA ने दिला इशारा, म्हणाले खऱ्या कमाईसाठी गुंतवणूक धोरण बदला
4
Video - अरे बापरे! ऑर्डर केला iPhone 16; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत अजब भानगड
5
Tata Capital IPO: प्रतीक्षा संपली! तुमच्या खिशात आहेत का १४,९९६ रुपये? तर बनू शकता टाटांच्या कंपनीचे प्रॉफिट पार्टनर
6
इवलीशी मुंबई झाली महाकाय ! त्या त्या भागानुसार प्रति स्क्वेअर फुटाचा दर काय... पहाल तर...
7
"प्यार मे सौदेबाजी...", अरबाज खान दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर मलायका अरोराची क्रिप्टिक पोस्ट
8
सोनम वांगचुक यांच्या अटकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, पत्नीने दाखल केली याचिका
9
Kantara Chapter 1: साऊथने पुन्हा एकदा करून दाखवलं! फक्त ४ दिवसांत 'कांतारा'ने कमावले ३०० कोटी
10
पतीच्या मृत्यूनंतर पुन्हा जोडीदाराची इच्छा पडली महागात; मॅट्रिमोनियल साइटवरून शिक्षिकेला कोट्यवधींचा गंडा!
11
Post Office Scheme: दर महिन्याला होईल ₹६१,००० ची कमाई; जबरदस्त आहे ही सरकारी स्कीम, कोट्यधीशही बनवेल
12
Jaipur Hospital Fire: जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
13
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, Nifty २४,९१० च्या वर; सरकारी बँकांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी
14
Jaipur Hospital Fire: '२० मिनिटांपूर्वी आगीची माहिती दिली, पण डॉक्टर पळून गेले'; SMS रुग्णालयातील प्रत्यक्षदर्शींचा धक्कादायक दावा
15
Video:...तर भारताच्या 'या' खेळाडूला मारायचंय; पाकिस्तानी स्पिनर अबरार अहमदचं विधान चर्चेत
16
पती अन् दोन मुलांना सोडून शेजाऱ्यासोबत सुरू होतं अफेअर; 'ओयो'मध्ये प्रियकर गर्लफ्रेंडसोबत दिसला अन्...
17
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
18
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
19
उत्खनन क्षेत्रात छत्तीसगडची ऐतिहासिक झेप; खनिज महसूल २५ वर्षांत ३४ पटीने वाढला!
20
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा

दुसऱ्या डोसला उशीर झाला तरी अजिबात घाबरू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:34 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : सर्वत्र १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लस देण्यास केंद्र सरकारने सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : सर्वत्र १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लस देण्यास केंद्र सरकारने सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य यंत्रणेतील डाॅक्टर्स तसेच परिचारिका यांना लसीकरण करण्यात आले. त्यानंतर पहिल्या फळीतील पोलीस, महसूल आदी कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. त्यानंतर १ मार्चपासून कोमाॅर्बिड आणि ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, लसचा अपुरा साठा असतानाही आता केंद्र सरकारने १८ वर्षांवरील व्यक्तींना लस देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे ज्यांचा पहिला डोस झाला आहे, त्यांना आपल्याला दुसरा डोस मिळेल ना, ही चिंता मोठ्या प्रमाणावर लागून राहिली आहे. मात्र, दुसऱ्या डोसला उशीर झाला तरी घाबरण्याचे कारण नाही, असा दिलासा आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने सुरक्षा कवच म्हणून लसीकरण हा प्रभावी उपाय असल्याने केंद्र सरकारच्या सूचनेनुसार राज्य सरकारने आता लसीकरण मोहिमेवर लक्ष केंद्रीत केले आहे. मात्र, सध्या लसचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे.

त्यातच आता केंद्र सरकारने १८ ते ४४ वयोगटांतील सर्व व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सध्या ४५ वर्षांवरील व्यक्तींसाठी पहिला डोस थांबविण्यात आला असून दुसरा डोस घेणाऱ्यांनाही सध्या डोस मिळेनासा झाला आहे.

राज्यात कोरोना लसचा पुरवठा कमी असल्याने आता दुसरा डोस घेणाऱ्यांना आपला दुसरा डोस वेळेत मिळेल ना, ही चिंता लागून राहिली आहे. मात्र, दुसऱ्या डोससाठी वेळ लागला तरी घाबरू नका, असा सल्ला आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

पूर्वी पहिली लस घेतल्यानंतर २८ दिवसांनंतर दुसरी लस घ्यावी, असे म्हटले जात होते. मात्र, पहिली लस घेतल्यानंतर किमान १४ दिवसांनंतर त्या व्यक्तीच्या शरीरात ॲंटिबाॅडिज निर्माण होतात. त्यामुळे आता दोन लसीमधील कालावधी वाढविण्यात आला आहे. लसीचा प्रभाव वाढण्यासाठी दोन लसीमध्ये अगदी सहा आठवड्यांचा किंवा दोन महिन्यांचा कालावधी जरी गेला तरीही घाबरण्याचे कारण नाही, अशी प्रतिक्रिया जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. संघमित्रा फुले यांनी व्यक्त केली आहे.

दुसऱ्या डोससाठी एक आठवडा थांबा

राज्यात लसचा अपुरा साठा सध्या असला तरी थोड्याच दिवसांत आणखी लस जिल्ह्यासाठीही उपलब्ध होणार आहे. दुसऱ्या डोससाठी आठवडाभरात पुरेशी लस येण्याची शक्यता आरोग्य विभागाने वर्तविली आहे.