शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

कारणाशिवाय मुंबईतून येऊ नका : जिल्हाधिकारी यांचे चाकरमान्यांना आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:31 IST

रत्नागिरी : सध्या रत्नागिरीत कोरोनाचा प्रादुर्भाव जलद गतीने वाढत आहे. त्याचबरोबर कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे. कोरोनाच्या ...

रत्नागिरी : सध्या रत्नागिरीत कोरोनाचा प्रादुर्भाव जलद गतीने वाढत आहे. त्याचबरोबर कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे. कोरोनाच्या या भयावह स्थितीचा विचार करून मुंबईकरांनी कारण नसेल तर गावाला येऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले आहे.

गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर मे महिन्यात लाॅकडाऊन शिथिल झाल्यानंतर मुंबईकर मोठ्या संख्येने आपल्या गावी परतल्याने मे महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या भरमसाट वाढत गेली. त्यानंतर गणपती उत्सवासाठी आलेल्या मुंबईकरांमुळे ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यातही पुन्हा संख्या दुपटीपेक्षाही अधिक झाली. त्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पुन्हा रुग्णसंख्या कमी झाली.

मात्र, मध्यंतरीच्या काळात लोकांनी दाखविलेली बेफिकिरी तसेच मास्क, सॅनिटायझर यांचा टाळलेला वापर, सोशल डिस्टन्सिंगचा विसर यामुळे फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात वाढू लागला आहे. त्यात भर पडली ती मार्च महिन्यातील शिमगोत्सवासाठी आलेल्या मुंबइकरांची कोरोनाचे हाॅटस्पाॅट असलेल्या मुंबई-पुण्यातून मोठ्या प्रमाणावर नागरिक रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाल्याने मार्चपासून ही संख्या वाढू लागली आहे. १ ते १५ मार्च २६७ रुग्ण तर १६ ते ३१ मार्च या काळात तब्बल ७८८ रुग्ण सापडले. १ ते १५ एप्रिल या कालावधीत रुग्ण संख्येने तब्बल ३ हजारांचा टप्पा ओलांडला असून ही संख्या ३००९ वर पोहोचली आहे. तर या पंधरवड्यात मृत्यूची संख्या ३४ झाली आहे.

जिल्ह्यात कोरोनाची स्थिती चिंताजनक होऊ लागल्याने आता जिल्हा प्रशासनाने लाॅकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या मुंबईत रुग्णसंख्या वाढू लागल्याने जिल्ह्यात येणाऱ्या मुंबईकरांमुळे संसर्ग वेगाने वाढत आहे. भविष्यात ही संख्या सध्याच्या चौपट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी मिश्रा यांनी मुंबईहून येणाऱ्यांनी महत्त्वाचे कारण असेल तरच यावे, अन्यथा सध्या येणे टाळावे, असे आवाहन केले आहे. मुंबईसह अन्य भागातून येणाऱ्या वाहनांची कडक तपासणी प्रत्येक नाक्यावर होणार असून व्यक्तींचीही तपासणी करण्यात येणार आहे. प्रत्येक व्यक्तीसाठी कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे. पाॅझिटिव्ह येणाऱ्यांना आयसोलेटेड करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.