शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

आमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आणू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:30 IST

मंडणगड : दाेन दिवसांच्या वीकेंड लाॅकडाऊननंतर सोमवारी सुरू झालेली दुकाने प्रशासनाने बंद करायला लावल्यामुळे नाराज झालेल्या व्यावसायिकांनी प्रशासनाकडे आपल्या ...

मंडणगड : दाेन दिवसांच्या वीकेंड लाॅकडाऊननंतर सोमवारी सुरू झालेली दुकाने प्रशासनाने बंद करायला

लावल्यामुळे नाराज झालेल्या व्यावसायिकांनी प्रशासनाकडे आपल्या व्यथा मांडल्या. गतवर्षीचे लाॅकडाऊन आणि चक्रीवादळामुळे मेटाकुटीला आलेल्या व्यापाऱ्यांनी आता ‘आमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आणू नका’, असे प्रशासनाला सांगितले आहे.

गतवर्षी लॉकडाऊनमुळे सर्व व्यवसाय बंद होता. त्यानंतर

तालुक्यात आलेल्या चक्रीवादळामुळे तालुक्याचा व्यवसाय पूर्णपणे कोलमडला आहे.

वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या दुकानांची देखभाल-दुरुस्ती करण्यासाठी आजपर्यंत कमावलेली पुंजी खर्च करावी लागली. शासनाने दिलेली मदतही अपुरी पडली आहे. आधी असलेले दोन महिन्यांचे लॉकडाऊन आणि त्यात आलेलं

चक्रीवादळाचे संकट यामधून व्यावसायिकांची कंबर साफ मोडली आहे. व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाचा हप्ता थकीत राहिल्याने बँकांनी वसुलीसाठी तगादा लावला आहे. चक्रीवादळाच्या

पार्श्वभूमीवर शासनाने कुठल्याही प्रकारे कर्जमाफी केली नाही किंवा वीज बिलामध्ये कुठेही कमतरता केलेली नाही. गेल्या वर्षभरातील वीज बिले आणि कर्जाचे हप्ते जेमतेम भरून व्यवसायाला पुन्हा सुरुवात केली असतानाच पुन्हा एकदा शासनाने लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे तालुक्यातील व्यापारी अडचणीत सापडला आहे.

जिल्ह्याच्या तुलनेत

मंडणगड तालुक्यात रुग्णसंख्या कमी असूनही तालुक्यातील व्यावसायिक व जनतेने शासनाच्या नियमाप्रमाणे कडक लॉकडाऊन गतवर्षी सांभाळला होता. त्यानंतर

आलेल्या वादळामुळे तालुक्यातील जनतेचे आणि व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. त्याच दरम्यान तालुक्यातील चाकरमान्यांचे मुंबईसारख्या शहरात असलेले नोकरी-व्यवसायही बंद पडल्यामुळे तालुक्यातील आर्थिक स्थिती विस्कटलेली आहे. तालुक्‍यात रोजगाराचे अन्य कोणतेही साधन उपलब्ध

नसल्याने तालुक्यातील जनतेची आर्थिक स्थिती फार बिकट बनली आहे. गतवर्षी लॉकडाऊनला तालुक्यातील व्यावसायिकांनी यशस्वीपणे सहकार्य केले. मात्र, यावर्षी तालुक्यातील आलेल्या एकंदरीत नैसर्गिक संकटामुळे येथील व्यापाऱ्यांची परिस्थिती अतिशय बिकट झालेली आहे. या वेळेला प्रशासनाने व्यावसायिकांची बाजू लक्षात घेऊन नियम व अटींची शिथिलता

करून तालुक्यातील व्यवसाय सुरू करावा, अशी मागणी व्यावसायिक करत आहेत.