शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

शैक्षणिक साहित्याची देणगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:32 IST

फळांना मागणी रत्नागिरी : रमजान सुरू असल्याने फळांना वाढती मागणी होत आहे. केळी, सफरचंद, चिकू, पेरू, डाळिंब, अननस, पपई, ...

फळांना मागणी

रत्नागिरी : रमजान सुरू असल्याने फळांना वाढती मागणी होत आहे. केळी, सफरचंद, चिकू, पेरू, डाळिंब, अननस, पपई, कलिंगड तसेच आंब्यासाठी मागणी होत आहे. मुंबईतून फळांची आवक होत असून लाॅकडाऊनमुळे आवक रोडावली आहे. त्यामुळे फळांचे दरही कडाडले आहेत.

पालकांना दिलासा

रत्नागिरी : कोरोना काळात शाळा बंद असून, काही शाळा ऑनलाईन पद्धतीने वर्ग भरवत आहेत. लॉकडाऊनमुळे अनेक पालकांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शैक्षणिक संस्थांना शुल्क कमी करण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने केल्या असल्याने पालकांना दिलासा मिळाला आहे.

रस्ता दुरुस्तीची मागणी

रत्नागिरी : तालुक्यातील बसणी ते गणपतीपुळे मार्गावरील रस्ते निकृष्ट झाले आहेत. ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. रस्ता दुरुस्तीसाठी निधी मंजूर झाला असला तरी प्रत्यक्षात काम केव्हा सुरू होणार याबाबत ग्रामस्थांना प्रतीक्षा लागली आहे. पावसाळ्यापूर्वी रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

परीक्षेच्या तारखा जाहीर कराव्यात

रत्नागिरी : शासनाने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या असल्या तरी बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याचे सांगितले आहे; मात्र याबाबत अद्याप तारखा व वेळापत्रक जाहीर केलेल्या नसल्याने पालक, विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. शासनाने परीक्षेच्या तारखा लवकरात लवकर जाहीर करण्याची मागणी होत आहे.

आर्थिक संकट

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरच्या कडेला बसून कोकणी मेवा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे. आंबे, काजूसह, फणस, करवंदे, जांभळे, जाम विक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या विक्रेत्यांवर उपासमार ओढावली आहे. गतवर्षीही विक्रेत्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले होते.

हमीभावाची मागणी

रत्नागिरी : यावर्षी आंबा उत्पादक कमी असल्याने कॅनिंगसाठी प्रक्रिया उद्योजकांनी अन्य राज्यांतून माल आणण्यापेक्षा स्थानिक माल विकत घ्यावा. दर्जेदार आंब्याला प्रतिकिलो किमान ४० रुपये भाव देण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून करण्यात येत आहे.

माकडांचा उपद्रव

रत्नागिरी : तालुक्यातील टेभ्ये, चांदेराई, हरचेरी परिसरात माकडांचा उपद्रव वाढला आहे. नारळी, आंबा बागायतीसह भाजीपाला पिकांची नासाडी करीत आहेत. कौलारू घरात शिरून अन्नपदार्थात खाऊन फस्त करीत आहेत. ग्रामस्थ हैराण झाले आहेत.

भूमिगत वाहिनीची कामे सुरू

रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पांतर्गत शहर तसेच आसपासच्या गावातून भूमिगत वाहिनीचे काम सुरू आहे. परटवणे ते शिरगावपर्यंत काम जोरात सुरू असल्याने वाहन चालकांना वाहन खबरदारी घेत चालवावे लागत आहे. लॉकडाऊनमुळे रस्त्यावरील वर्दळ कमी असल्याने कामाला वेग आला आहे.

भाज्यांची आवक रोडावली

रत्नागिरी : सध्या बाजारातून भाज्यांची आवक रोडावली आहे. पाण्याची पातळी खालावल्याने भाजी उत्पादनावर परिणाम झाला आहे. पालेभाज्यांसह कोथिंबीर आवक कमी झाल्याने दरात मात्र वाढ झाली आहे. २० ते २५ रुपये जुडी दराने विक्री सुरू आहे. अन्य भाज्यांचे दर शंभराच्या घरात असल्याने भाजीपाला खरेदीवर परिणाम झाला आहे.