शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

चाकरमान्यांची कोरोना चाचणी करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:38 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : मुंबईत कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे तेथून येणाऱ्यांमुळे कोरोना संसर्ग वाढणार नाही, तरी ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : मुंबईत कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे तेथून येणाऱ्यांमुळे कोरोना संसर्ग वाढणार नाही, तरी गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची कोरोना चाचणी करू नका, अशा सूचना आपण जिल्हा प्रशासनाला केल्याची माहिती आमदार भास्कर जाधव यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

एकीकडे गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी प्रशासनाकडून कोरोना चाचणीचा अहवाल अथवा दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानंतर, त्यामध्ये बदल करत गावातच चाचणी करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. त्यामुळे सर्वत्र संभ्रम असतानाच, सोमवारी आमदार जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना कुठेही रस्त्यात थांबवून त्यांची आरटीपीसीआर चाचणी किंवा अँटिजन चाचणी केली जाणार नाही. त्यांची कोणत्याही प्रकारची अडवणूक किंवा पिळवणूक केली जाणार नाही. याबाबतची स्पष्ट चर्चा स्थानिक जिल्हा प्रशासनाशी करण्यात आलेली आहे, शिवाय कोकणात आल्यावर कोणती अडचण आल्यास आपल्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही जाधव यांनी केले आहे.