शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
2
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
3
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
4
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
5
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
6
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
7
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
8
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
9
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
10
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
11
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
12
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
13
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
14
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
15
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
16
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
17
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
19
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
20
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...

कोणत्याही आमिषाला बळी पडू नका

By admin | Updated: August 28, 2014 22:23 IST

धोंडू पाष्टे : फोंडाघाट येथे कुणबी समाजाचा एकता मेळावा

कणकवली : कोकणात कुणबी समाज मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, या समाजाच्या परिस्थितीचा फायदा उठवत काही मंडळी आपला स्वार्थ साधत आहेत. परंतु यापुढे कुणाच्याही क्षणीक आमिषाला बळी न पडता समाजोन्नतीचा झेंडा हाती घेऊन एकजुटीने कार्यरत रहा, असे आवाहन धोंडू पाष्टे यांनी केले.कणकवली तालुका कुणबी समाजाच्यावतीने एकता मेळाव्याचे आयोजन फोंडाघाट येथील शांताराम मंगल कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. शाम भोवड, सुरेश भितम, रमेश गुंडये, सुरेश रांबाडे, संजय धुमक, एकनाथ पेंटकुलकर, मंगेश धुमाळ, रमेश जोगळे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना धोंडू पाष्टे म्हणाले, आपला स्वाभिमान जागवत कुणबी समाज संघटीत होत आहे, ही चांगली गोष्ट आहे. आपली प्रगती साधण्यासाठी आपापसातील तंटे बाजूला ठेवून एकजुटीसाठी प्रज्वलीत झालेली सामाजिक बांधिलकीची ज्योत समाजबांधवांनी यापुढेही कायम ठेवावी. त्यातूनच सर्वांगीण उन्नती साधता येईल.शिवराम जाधव म्हणाले, कुणबी बांधवांनी आता फक्त कष्टाचीच कामे करण्यापेक्षा आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून प्रगतशील शेतकरी बनावे. शासनाच्या योजनेचा फायदा घेऊन आपली उन्नती साधा. समाजाच्या प्रगतीसाठी तरूणांचे योगदान मोठ्या प्रमाणात असणे आवश्यक आहे. आता आरक्षणासाठी भांडायचे नाही तर लढायचे आहे. शासनकर्ते शामराव पेजेंसारख्यांचा अहवाल दडवून आरक्षणात आपल्यावर अन्याय करीत आहेत. कुणबी समाजाचा अभ्यास करून शासनाने आरक्षण दिले पाहिजे होते. मात्र, राजकारण्यांनी याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले आहे. आमच्या मतावर पोळी भाजणाऱ्या नेत्यांना आता त्यांची जागा दाखविण्याची वेळ आली आहे. मातीशी नाते असणाऱ्या व खऱ्या अर्थाने जनतेचा पोशिंदा असलेल्या कुणबी बांधवांना अद्याप न्याय मिळाला नसला तरी आता समाज संघटीत होत असल्याने ती वेळ दूर नाही. यावेळी विलास नावले, मंगेश धुमाळ, शाम भोवड, रमेश जोगळे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन विजय डोंगरे यांनी तर प्रास्ताविक सुरेश रांबाडे यांनी केले. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी मंगेश धुमाळ, भाई नराम, विजय सोलकर, भाऊ भिसे, विजय डोंगरे, रविंद्र सोलकर, संदीप शिवगण, संजय शिर्के यांनी विशेष प्रयत्न केले. (वार्ताहर)