शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना कुणाची? आता सुप्रीम कोर्टात पुढच्याच वर्षी अंतिम सुनावणी होणार; आजची तारीख पुढे ढकलली
2
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
3
बिहार निवडणुकीत NDA पराभूत झाल्यास निफ्टी ७% पर्यंत घसरू शकतो? ब्रोकरेज फर्मने दिला इशारा
4
सोनम-राजाचं लग्न ते बेवफाई अन् हत्या... सगळं समोर येणार! राजा रघुवंशी हत्या प्रकरणात कुणी दिली पहिली साक्ष?
5
'पैसे दुप्पट' करणारा ते अल फलाह युनिव्हर्सिटीचा मालक; हा जावेद अहमद सिद्दीकी कोण?
6
Delhi blast: हाडे तुटली, आतडी फाटली अन्...; दिल्ली स्फोटातील मृतकांचे भयावह पोस्टमोर्टम रिपोर्ट
7
Shreeji Global FMCG Shares: पहिल्याच दिवशी शेअरची स्थिती खराब; १२५ रुपयांचा शेअर आला ९९ रुपयांवर, गुंतवणूकदारांवर डोकं धरण्याची वेळ
8
दिल्ली नाही, टार्गेटवर होते अयोध्या-काशी; चौकशीत नवीन धक्कादायक माहिती समोर आली
9
Delhi Blast: शाहीन शाहीदचा महाराष्ट्रातील डॉ. हयात जफर सोबत घटस्फोट का झालेला, कोणत्या मुद्द्यावरून बिनसलेलं?
10
शेख हसीना बांगलादेशला परतण्यास तयार, परतीसाठीच्या अटी सांगितल्या; मोहम्मद युनूस यांच्यावर केली टीका
11
PM Modi: भूतानहून परतताच मोदींनी एलएनजेपी रुग्णालय गाठलं, दिल्ली बॉम्बस्फोटातील जखमींना भेटले!
12
दिल्ली स्फोटात 'डबल ॲटॅक'चा संशय! घटनास्थळी अमोनियम नायट्रेटसह 'दुसरे शक्तिशाली' स्फोटक आढळले
13
पार्सल, मनी ऑर्डर, इन्शुरन्स प्रीमिअम : सर्व कामं एका क्लिकवर; पोस्ट ऑफिसची नवी 'सेवा' 
14
एका गॅरेजमधून सुरुवात! आज स्वित्झर्लंडमध्ये २००० टन सोने शुद्ध करणारी कंपनी; ६० देशांमध्ये व्यवसाय
15
“५१ वर्षे ठाकरेंशी प्रामाणिक अन् एका क्षणात...”; बड्या नेत्याचा उद्धवसेनेला ‘जय महाराष्ट्र’
16
VIDEO: घोडा बनला 'डान्सिंग स्टार' !! 'राणा' घोड्याचा अफलातून डान्स, सारेच होताहेत अवाक्
17
काय सांगता! २० हजारांचे पॉकेट, 'Apple' ने लाँच केलेल्या उत्पादनाची जोरदार चर्चा
18
"ती कट्टर मुस्लीम नव्हती" जैशची लेडी कमांडर डॉ. शाहीनशी संसार मोडणाऱ्या नवऱ्याने केला खुलासा
19
पैसा काय, जीव वाचणे महत्वाचे...! दुचाकीस्वारांसाठी एअरबॅग भारतात लाँच; एकदा उघडली तरी...
20
बापरे! लांब निमूळती सुंदर नखं फॅशन नाही तर भयानक 'बॅक्टेरियाचं घर'; जेवताना पोटात जाते घाण आणि..

दबावाला भीक घालणार नाही : गावडे

By admin | Updated: February 26, 2015 00:15 IST

त्यावेळी पोलिसांनी तेथील कर्मचाऱ्यांना दमदाटी करत तेथील काही दस्तऐवज राजापूर तहसीलदारांच्या परवानगीशिवाय ताब्यात घेतला होता.

राजापूर : बनावट दाखले प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे पुढील काही दिवसातच या प्रकरणाचा छडा लागेल, असा विश्वास पोलीस निरीक्षक विकास गावडे त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला आहे. या बोगस दाखले प्रकरणामध्ये अजून काहीजणांना अटक होण्याची शक्यता आहे. कोणताही दबाव न जुमानता दोषींवर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.प्रांतांच्या खोट्या सह्या करून बोगस दाखले दिल्याचे प्रकरण गेल्या दोन आठवड्यांपासून चांगलेच गाजत आहे. या प्रकरणाच्या राजापूर पोलिसांच्या तपासाबाबत समाजाच्या सर्वच स्तरातून शंका व्यक्त केली जात होती. राजापूर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करताना पहिल्यापासूनच मुख्य सूत्रधाराला मोकळे सोडून या प्रकरणातील सत्य पोलिसांना उजेडातच आणावयाचे नाही, असा आरोप सर्वसामान्य जनतेतून करण्यात येत होता. दुसरीकडे या प्रकरणाचे धागेदोरे शोधताना या बोगस दाखल्यांची कनेक्टिव्हीटी प्रथम पाचल व नंतर नाटे महा-ई-सेवा केंद्र्रापर्यंत असल्याचे उघड झाले होते. त्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक पत्रकारांशी बोलत होते. या प्रकरणामध्ये आतापर्यंत एकूण तिघांना अटक झालेली असून त्यांची पोलीस कोठडी संपलेली आहे, तर महा-ई-सेवा केंद्र्राच्या संचालिका झोया खलिफे यांना अंतरिम जामीन मंजूर झाला आहे. या प्रकरणामध्ये अजून काही संशयित आरोपी आहेत. राजापूर पोलीस त्यांच्यापर्यंत लवकरच पोहोचतील व त्यांना कायदेशीररित्या अटक केली जाईल, असा विश्वास गावडे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला आहे.या बोगस दाखले प्रकरणाचा तपास करताना राजापूर पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी राजापूर सेतू कार्यालयाच्या दिशेने आपला मोर्चा वळवला होता. त्यावेळी पोलिसांनी तेथील कर्मचाऱ्यांना दमदाटी करत तेथील काही दस्तऐवज राजापूर तहसीलदारांच्या परवानगीशिवाय ताब्यात घेतला होता. तो दस्तऐवज पुन्हा तहसीलदारांकडे परत केला जाईल व त्यानंतर रितसर लेखी पत्र देऊन संबंधित तपासाकामी हवा असलेला दस्तऐवज पंचासमक्ष ताब्यात घेतला जाईल, असेही यावेळी गावडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. (प्रतिनिधी)1राजापूर पोलिसांनी आपल्या कार्यालयातील सेतूमध्ये घुसून तेथील कर्मचाऱ्यांना दमदाटी करत काही दस्तऐवज आपल्या परवानगीशिवाय नेला असल्याची तक्रार जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार गुरूनाथ हुन्नरे यांनी दिली.2नाटे येथील महा-ई सेवा केंद्राचे संचालक विलास नारकर यानी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर निर्णय देताना न्यायालयाने त्यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. याबाबतचे म्हणणे मांडण्यासाठी पोलिसांना ३ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली.3बोगस दाखलेप्रकरणी पाचल येथील सिध्देश नथुराम नारकर यांनीही जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता, त्यावर निर्णय देताना न्यायालयाने नारकर यांना अटक करताना ७२ तासांची नोटीस देऊन मगच अटक करावी, असे आदेश पोलिसांना दिले आहेत.