शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

दबावाला भीक घालणार नाही : गावडे

By admin | Updated: February 26, 2015 00:15 IST

त्यावेळी पोलिसांनी तेथील कर्मचाऱ्यांना दमदाटी करत तेथील काही दस्तऐवज राजापूर तहसीलदारांच्या परवानगीशिवाय ताब्यात घेतला होता.

राजापूर : बनावट दाखले प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे पुढील काही दिवसातच या प्रकरणाचा छडा लागेल, असा विश्वास पोलीस निरीक्षक विकास गावडे त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला आहे. या बोगस दाखले प्रकरणामध्ये अजून काहीजणांना अटक होण्याची शक्यता आहे. कोणताही दबाव न जुमानता दोषींवर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.प्रांतांच्या खोट्या सह्या करून बोगस दाखले दिल्याचे प्रकरण गेल्या दोन आठवड्यांपासून चांगलेच गाजत आहे. या प्रकरणाच्या राजापूर पोलिसांच्या तपासाबाबत समाजाच्या सर्वच स्तरातून शंका व्यक्त केली जात होती. राजापूर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करताना पहिल्यापासूनच मुख्य सूत्रधाराला मोकळे सोडून या प्रकरणातील सत्य पोलिसांना उजेडातच आणावयाचे नाही, असा आरोप सर्वसामान्य जनतेतून करण्यात येत होता. दुसरीकडे या प्रकरणाचे धागेदोरे शोधताना या बोगस दाखल्यांची कनेक्टिव्हीटी प्रथम पाचल व नंतर नाटे महा-ई-सेवा केंद्र्रापर्यंत असल्याचे उघड झाले होते. त्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक पत्रकारांशी बोलत होते. या प्रकरणामध्ये आतापर्यंत एकूण तिघांना अटक झालेली असून त्यांची पोलीस कोठडी संपलेली आहे, तर महा-ई-सेवा केंद्र्राच्या संचालिका झोया खलिफे यांना अंतरिम जामीन मंजूर झाला आहे. या प्रकरणामध्ये अजून काही संशयित आरोपी आहेत. राजापूर पोलीस त्यांच्यापर्यंत लवकरच पोहोचतील व त्यांना कायदेशीररित्या अटक केली जाईल, असा विश्वास गावडे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला आहे.या बोगस दाखले प्रकरणाचा तपास करताना राजापूर पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी राजापूर सेतू कार्यालयाच्या दिशेने आपला मोर्चा वळवला होता. त्यावेळी पोलिसांनी तेथील कर्मचाऱ्यांना दमदाटी करत तेथील काही दस्तऐवज राजापूर तहसीलदारांच्या परवानगीशिवाय ताब्यात घेतला होता. तो दस्तऐवज पुन्हा तहसीलदारांकडे परत केला जाईल व त्यानंतर रितसर लेखी पत्र देऊन संबंधित तपासाकामी हवा असलेला दस्तऐवज पंचासमक्ष ताब्यात घेतला जाईल, असेही यावेळी गावडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. (प्रतिनिधी)1राजापूर पोलिसांनी आपल्या कार्यालयातील सेतूमध्ये घुसून तेथील कर्मचाऱ्यांना दमदाटी करत काही दस्तऐवज आपल्या परवानगीशिवाय नेला असल्याची तक्रार जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार गुरूनाथ हुन्नरे यांनी दिली.2नाटे येथील महा-ई सेवा केंद्राचे संचालक विलास नारकर यानी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर निर्णय देताना न्यायालयाने त्यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. याबाबतचे म्हणणे मांडण्यासाठी पोलिसांना ३ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली.3बोगस दाखलेप्रकरणी पाचल येथील सिध्देश नथुराम नारकर यांनीही जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता, त्यावर निर्णय देताना न्यायालयाने नारकर यांना अटक करताना ७२ तासांची नोटीस देऊन मगच अटक करावी, असे आदेश पोलिसांना दिले आहेत.